शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

सापळे पीक पद्धतीतून कारल्यांची नाविन्यपूर्ण शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:45 IST

अतुल बुराडे विसोरा : धानपट्ट्यातील शेतकरीही आता आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करायला लागले आहेत. किन्हाळा या गावातील एका शेतकऱ्याने ...

अतुल बुराडे

विसोरा : धानपट्ट्यातील शेतकरीही आता आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करायला लागले आहेत. किन्हाळा या गावातील एका शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनात असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग करत सापळे पद्धतीतून कारल्यांची लागवड केली. त्यात आंतरपीक म्हणून झेंडूच्या फुलांचे लागवड केली. त्यामुळे या शेतकऱ्यांला दुहेरी उत्पन्न मिळणार आहे. बेभरवशाची शेती म्हणून नेहमीच हिणवल्या जाणाऱ्या या व्यवसायातून तांत्रिक मार्गदर्शन आणि मेहनतीतून चांगले उत्पन्न घेता येऊ शकते, हेच यातून दिसून येते.

आता वर्षभरात कधीही पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा शेतातील अंदाज चुकतात. त्यात धान पट्ट्यातील शेतकरी धान पिकालाच अधिक प्राधान्य देतात. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातल्या पीक पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. विसोऱ्यापासून दक्षिणेस १० किमीवरच्या किन्हाळा येथील पुरुषोत्तम ठाकरे या शेतकऱ्याने कारली पिकासोबत सापळे पीक पद्धतीचा वापर केला. त्यात आंतरपीक म्हणून झेंडू फुलांची लागवड केली. एकाच खर्चात दोन उत्पन्नाचे स्रोत या शेतकऱ्याने निर्माण केले. विशेष म्हणजे, झेंडू लागवडीतून जमिनीसोबत पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे कामही होत असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.

सध्या कारली आणि झेंडू फुलांची रोजच तोडणी केली जात आहे. एकूणच या शेतकऱ्याने आर्थिक लाभ आणि जमिनीसोबत पर्यावरणीय संतुलन राखले आहे. हा शेती प्रयोग इतर अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे.

आता शेती नफ्याची राहिलेली नाही अशी ओरड शेतकरी वर्ग करीत असताना काही शेतकरी आहे त्याच परिस्थितीत नवीन दृष्टिकोन समोरे ठेवून शेती करताना दिसत आहेत. यासाठी तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम आणि एस.जी.रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

(बॉक्स)

झेंडूमुळे तिहेरी लाभ

कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून किन्हाळाच्या पुरुषोत्तम ठाकरे यांना कारलीच्या शेतामध्ये सापळे पीक पद्धतीचा वापर करण्याचे सुचले. कारली पिकाची लागवड केल्यावर जी जागा उरते त्या मोकळ्या जागेमध्ये ठाकरे यांनी झेंडू फुलांची लागवड केली. झेंडूची फुले मधमाशांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. त्यामुळे फुलांवरील परागीकरण चांगल्या प्रकारे होते. दुसरे झेंडूच्या मुळांमुळे जमिनीतील सूत्रकृमींचे नियंत्रण होते. सूत्रकृमी कोणत्याही पिकांच्या मुळांना नष्ट करू शकतात. आणि तिसरे झेंडू विक्रीतून उत्पन्नात भर, असा तिहेरी फायदा झेंडूच्या शेतीतून होतो.