शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

कामांची गती वाढवा

By admin | Updated: April 14, 2017 01:20 IST

शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.

आमदारांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावाकुरखेडा : शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाला कधीच निधीची कमतरता भासणार नाही. जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. राज्य शासनाच्या निर्देशासनुसार आ. क्रिष्णा गजबे यांनी कुरखेडा पंचायत समितीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला एसडीओ शुभांगी आंधळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भुजबळ, पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम, तहसीलदार अजय चरडे, तालुका कृषी अधिकारी खंडाळे, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, नाजूक पुराम, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले, उल्हास देशमुख, वनपरिक्षेत्राधिकारी, बँक व्यवस्थापक उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानावर राज्य शासनाने शेकडो कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र काही जिल्ह्यांमधील कामे नियोजनाअभावी ठप्प पडली असल्याचे शासनाच्या लक्षात आले. या कामांना गती देण्याच्या उद्देशाने प्रत्येक आमदाराने आपल्या क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. काही गावांनी अजूनही कामे सुरू केली नसल्याचे दिसून आले. तर काही गावांमधील नागरिकांनी योग्य नियोजन केल्याने तेथील कामे पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत. जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती कामे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामे करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सदर बाब आपल्या लक्षात आणून द्यावी, ती अडचण सोडविण्यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू, असे मार्गदर्शन केले. वीज व पाणी समस्येवर केली चर्चाउन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात वीज व पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदारांनी कुरखेडा येथील विश्रामगृहात तालुक्यातील वीज व पाणी समस्येचा आढावा घेतला. यावेळीसुद्धा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी ज्या गावातील हातपंप बंद आहेत, तेथील हातपंप तत्काळ दुरूस्त करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.