शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

कामांची गती वाढवा

By admin | Updated: April 14, 2017 01:20 IST

शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.

आमदारांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावाकुरखेडा : शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाला कधीच निधीची कमतरता भासणार नाही. जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. राज्य शासनाच्या निर्देशासनुसार आ. क्रिष्णा गजबे यांनी कुरखेडा पंचायत समितीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला एसडीओ शुभांगी आंधळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भुजबळ, पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम, तहसीलदार अजय चरडे, तालुका कृषी अधिकारी खंडाळे, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, नाजूक पुराम, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले, उल्हास देशमुख, वनपरिक्षेत्राधिकारी, बँक व्यवस्थापक उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानावर राज्य शासनाने शेकडो कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र काही जिल्ह्यांमधील कामे नियोजनाअभावी ठप्प पडली असल्याचे शासनाच्या लक्षात आले. या कामांना गती देण्याच्या उद्देशाने प्रत्येक आमदाराने आपल्या क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. काही गावांनी अजूनही कामे सुरू केली नसल्याचे दिसून आले. तर काही गावांमधील नागरिकांनी योग्य नियोजन केल्याने तेथील कामे पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत. जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती कामे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामे करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सदर बाब आपल्या लक्षात आणून द्यावी, ती अडचण सोडविण्यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू, असे मार्गदर्शन केले. वीज व पाणी समस्येवर केली चर्चाउन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात वीज व पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदारांनी कुरखेडा येथील विश्रामगृहात तालुक्यातील वीज व पाणी समस्येचा आढावा घेतला. यावेळीसुद्धा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी ज्या गावातील हातपंप बंद आहेत, तेथील हातपंप तत्काळ दुरूस्त करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.