शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कामांची गती वाढवा

By admin | Updated: April 14, 2017 01:20 IST

शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.

आमदारांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावाकुरखेडा : शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाला कधीच निधीची कमतरता भासणार नाही. जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. राज्य शासनाच्या निर्देशासनुसार आ. क्रिष्णा गजबे यांनी कुरखेडा पंचायत समितीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला एसडीओ शुभांगी आंधळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भुजबळ, पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम, तहसीलदार अजय चरडे, तालुका कृषी अधिकारी खंडाळे, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, नाजूक पुराम, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले, उल्हास देशमुख, वनपरिक्षेत्राधिकारी, बँक व्यवस्थापक उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानावर राज्य शासनाने शेकडो कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र काही जिल्ह्यांमधील कामे नियोजनाअभावी ठप्प पडली असल्याचे शासनाच्या लक्षात आले. या कामांना गती देण्याच्या उद्देशाने प्रत्येक आमदाराने आपल्या क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. काही गावांनी अजूनही कामे सुरू केली नसल्याचे दिसून आले. तर काही गावांमधील नागरिकांनी योग्य नियोजन केल्याने तेथील कामे पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत. जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती कामे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामे करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सदर बाब आपल्या लक्षात आणून द्यावी, ती अडचण सोडविण्यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू, असे मार्गदर्शन केले. वीज व पाणी समस्येवर केली चर्चाउन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात वीज व पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदारांनी कुरखेडा येथील विश्रामगृहात तालुक्यातील वीज व पाणी समस्येचा आढावा घेतला. यावेळीसुद्धा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी ज्या गावातील हातपंप बंद आहेत, तेथील हातपंप तत्काळ दुरूस्त करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.