शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीत कर्जवसुलीचा तगादा

By admin | Updated: January 24, 2016 01:10 IST

यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दरवर्षीच्या तुलनेत एकूण उत्पादनापैकी २० ते ३० टक्केच उत्पादन हाती आले आहे.

कर्जाचा भरणा करा, दिला दम! : बँकेच्या वसुली पथकाची शेतकऱ्यांच्या दारावर धडकगोपाल लाजुरकर गडचिरोलीयंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दरवर्षीच्या तुलनेत एकूण उत्पादनापैकी २० ते ३० टक्केच उत्पादन हाती आले आहे. शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती पाहता, शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील १३९८ गावांमध्ये दुष्काळ घोषित केला. मात्र राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांच्या कर्जवसुली पथकांच्या वतीने शेतकऱ्यांच्या दारी धडक देऊन कर्जाचा भरणा करण्यासाठी सांगितले जात आहे. नापिकीतही शेतकऱ्यांना बँकाकडून कर्जाचा भरणा करण्याचा तगादा लावला जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकाकरिता राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज उचलले होते. मात्र निसर्गाने साथ न दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत २० ते ३० टक्केच उत्पादन झाले, अशी स्थिती असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामासाठी बँका व पतसंस्थांकडून उचल केलेल्या कर्जाचा भरणा कसे करणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु बँकांच्या कर्ज वसुली पथकांकडून शेतकऱ्यांना गृहभेटी देऊन तसेच पत्र पाठवून ३० जानेवारीपर्यंत कर्जाचा भरणा करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे बजाविले जात आहे. त्यामुळे शेतकरी उद्विग्न होत असून कर्जाचा भरणा कसा करावा या विवंचनेत आहे. थकीत कर्जदार बँकेच्या टार्गेटवरमागील तीन-चार वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा यामुळे नापिकीचे दृष्टचक्र शेतकऱ्याच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वी घेतलेले बँकांचे कर्ज शेतकरी भरू शकले नाही. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात मोठी आहे. यंदाही नापिकीचे प्रचंड सावट असल्याने कर्ज भरण्याची त्यांची क्षमताच राहिलेली नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची बँकांनी स्वतंत्र यादी तयार केली असून बँकांचे कर्ज वसुली पथक मार्च २०१६ पर्यंत ही वसुली करण्याच्या कामानिमित्त शेतकऱ्यांच्या दारावर पोहोचत आहे. बँकेचे पथक घरी आल्यामुळे असलेल्या कर्जाचे हप्ते पाडून देण्याची विनंती शेतकरी करीत आहे. मात्र त्याच्यावरची असलेली थकबाकी पाहून बँकेच्या पथकातील अधिकारी याबाबत निर्णय घेत असल्याचे लोकमतने चौकशी केल्यावर निदर्शनास आले. काही शेतकरी दोन ते पाच हजार रूपयांपर्यंतची रक्कम देण्याची तयारी दाखवत असले तरी बँकेचे अधिकारी मात्र मोठ्या रकमेच्या भरण्यासाठीच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पठाणी पध्दतीमुळे शेतकरी पूरता खचलेला आहे. ३१ मार्चपर्यंत वसुलीचे टार्गेटही बँका पूर्ण करण्याच्या कामी लागलेल्या आहेत. २९ हजार शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज वितरण२०१५ च्या खरीप हंगामात २९ हजार खातेदार शेतकऱ्यांना १० बँकांनी ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. गेल्या महिन्यापर्यंत केवळ ५० लाख रूपयांच्या कर्जाची वसुली बँकांनी केली, अशी माहिती मिळाली होती. याशिवाय जवळपास ५० कोटीच्या आसपास थकीत कर्जही आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा प्रचंड तगादा शेतकऱ्यांच्या उरावर आहे. दुष्काळग्रस्त गावात कर्ज वसुली मोहीम थांबविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात कुठेही दिसून येत नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्याही अनेक बँकांचे कर्जवसुली पथक जिल्ह्यात दाखल झालेले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्यात येत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे चालू वर्षाचे पीक कर्ज आहे. त्यांना पत्र पाठवून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरून शासनाच्या शून्य टक्के पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चालू वर्षाचे ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे. त्यांना पाठविलेली नोटीस नसून तो पत्र आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. - सतीश आयलवार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली