शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

नापिकीत कर्जवसुलीचा तगादा

By admin | Updated: January 24, 2016 01:10 IST

यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दरवर्षीच्या तुलनेत एकूण उत्पादनापैकी २० ते ३० टक्केच उत्पादन हाती आले आहे.

कर्जाचा भरणा करा, दिला दम! : बँकेच्या वसुली पथकाची शेतकऱ्यांच्या दारावर धडकगोपाल लाजुरकर गडचिरोलीयंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दरवर्षीच्या तुलनेत एकूण उत्पादनापैकी २० ते ३० टक्केच उत्पादन हाती आले आहे. शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती पाहता, शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील १३९८ गावांमध्ये दुष्काळ घोषित केला. मात्र राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांच्या कर्जवसुली पथकांच्या वतीने शेतकऱ्यांच्या दारी धडक देऊन कर्जाचा भरणा करण्यासाठी सांगितले जात आहे. नापिकीतही शेतकऱ्यांना बँकाकडून कर्जाचा भरणा करण्याचा तगादा लावला जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकाकरिता राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज उचलले होते. मात्र निसर्गाने साथ न दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत २० ते ३० टक्केच उत्पादन झाले, अशी स्थिती असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामासाठी बँका व पतसंस्थांकडून उचल केलेल्या कर्जाचा भरणा कसे करणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु बँकांच्या कर्ज वसुली पथकांकडून शेतकऱ्यांना गृहभेटी देऊन तसेच पत्र पाठवून ३० जानेवारीपर्यंत कर्जाचा भरणा करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे बजाविले जात आहे. त्यामुळे शेतकरी उद्विग्न होत असून कर्जाचा भरणा कसा करावा या विवंचनेत आहे. थकीत कर्जदार बँकेच्या टार्गेटवरमागील तीन-चार वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा यामुळे नापिकीचे दृष्टचक्र शेतकऱ्याच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वी घेतलेले बँकांचे कर्ज शेतकरी भरू शकले नाही. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात मोठी आहे. यंदाही नापिकीचे प्रचंड सावट असल्याने कर्ज भरण्याची त्यांची क्षमताच राहिलेली नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची बँकांनी स्वतंत्र यादी तयार केली असून बँकांचे कर्ज वसुली पथक मार्च २०१६ पर्यंत ही वसुली करण्याच्या कामानिमित्त शेतकऱ्यांच्या दारावर पोहोचत आहे. बँकेचे पथक घरी आल्यामुळे असलेल्या कर्जाचे हप्ते पाडून देण्याची विनंती शेतकरी करीत आहे. मात्र त्याच्यावरची असलेली थकबाकी पाहून बँकेच्या पथकातील अधिकारी याबाबत निर्णय घेत असल्याचे लोकमतने चौकशी केल्यावर निदर्शनास आले. काही शेतकरी दोन ते पाच हजार रूपयांपर्यंतची रक्कम देण्याची तयारी दाखवत असले तरी बँकेचे अधिकारी मात्र मोठ्या रकमेच्या भरण्यासाठीच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पठाणी पध्दतीमुळे शेतकरी पूरता खचलेला आहे. ३१ मार्चपर्यंत वसुलीचे टार्गेटही बँका पूर्ण करण्याच्या कामी लागलेल्या आहेत. २९ हजार शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज वितरण२०१५ च्या खरीप हंगामात २९ हजार खातेदार शेतकऱ्यांना १० बँकांनी ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. गेल्या महिन्यापर्यंत केवळ ५० लाख रूपयांच्या कर्जाची वसुली बँकांनी केली, अशी माहिती मिळाली होती. याशिवाय जवळपास ५० कोटीच्या आसपास थकीत कर्जही आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा प्रचंड तगादा शेतकऱ्यांच्या उरावर आहे. दुष्काळग्रस्त गावात कर्ज वसुली मोहीम थांबविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात कुठेही दिसून येत नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्याही अनेक बँकांचे कर्जवसुली पथक जिल्ह्यात दाखल झालेले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्यात येत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे चालू वर्षाचे पीक कर्ज आहे. त्यांना पत्र पाठवून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरून शासनाच्या शून्य टक्के पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चालू वर्षाचे ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे. त्यांना पाठविलेली नोटीस नसून तो पत्र आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. - सतीश आयलवार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली