शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

गडचिरोलीचा सिटी सर्वे तत्काळ करा

By admin | Updated: February 22, 2015 01:23 IST

वाढत्या लोकसंख्येनुसार नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नियोजन आराखडा आवश्यक आहे.

गडचिरोली : वाढत्या लोकसंख्येनुसार नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नियोजन आराखडा आवश्यक आहे. त्यासाठी न.प. प्रशासनाने तत्काळ सीटी सर्वे करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना आढावा सभेत दिले. खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नगर पालिकेत नगराध्यक्ष यांच्या कक्षात आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या आढावा सभेला प्रामुख्याने आ. डॉ. देवराव होळी, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, गडचिरोलीचे तहसीलदार डी. जी. जाधव, न.प. मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे, नगराध्यक्ष निर्मला मडके, पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, वित्त व नियोजन सभापती विजय गोरडवार, पाणी पुरवठा सभापती संजय मेश्राम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, नगर रचना कार्यालयाचे अधिकारी घाटेकर आदी उपस्थित होते. यावेळी खा. नेते यांनी न.प. अंतर्गत कोणत्या योजनेंतर्गत विकास कामांचे नियोजन करण्यात आले, अशी विचारणा केली असता, मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी शहरातील भूमीगत गटार लाईनचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी नगर विकास विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे सादर केला आहे. पाणी जोडणीला फिटर बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे सांगितले.वाढत्या लोकसंख्येनुसार सर्व नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगर पालिकेचा दर्जा वाढण्याचा मुद्दा बैठकीत चर्चेला आला. दरम्यान ब दर्जा श्रेणीत गडचिरोली नगर परिषद असल्याने मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे शक्य होत नाही. कारण निधीही कमी मिळतो. त्यामुळे गडचिरोली न.प. ला अ दर्जा मिळण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. अ दर्जा देण्याबाबत ५५ टक्के आस्थापना खर्चाची अट नगर विकास विभाग घालत असल्याची माहिती मुख्याधिकारी बन्नोरे यांनी दिली. यावर न.प. प्रशासनाने अ दर्जा देण्याचा मुख्यमंत्री, सचिव यांचेकडे प्रस्ताव सादर करावा, नक्षलग्रस्त भागातील पालिकेला आस्थापना खर्चाची अट शिथील करून अ दर्जा देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार अशी ग्वाही खा. नेते यांनी बैठकीत दिली. शहरातील सर्व झोपडपट्टी वस्तींमध्ये रमाई घरकूल योजना व वनहक्क पट्ट्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी न.प. प्रशासनाने सीटी सर्वे करून संरक्षित झोपडपट्टीचा भाग निश्चित करावा, तसेच संरक्षित झोपडपट्टी म्हणून घोषीत करावी. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गरजुंना वनजमिनीची पट्टे देण्यात काहीच अडचण नसल्याचे सांगितले. सीटी सर्वे करण्यात न आल्यामुळे शहर विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. सीटी सर्वेसाठी नगर रचना कर विभागाकडे न.प. प्रशासनाला जवळपास २ कोटी ६० लाख ७५ हजार रूपये भरणा करावा लागणार आहे. मात्र न.प. प्रशासनाची आर्थिक परिस्थिती बळकट नसल्यामुळे सदर निधी अदा करणे शक्य नाही, अशी अडचण पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी खासदार महोदयांना सांगितली. यावर सीटी सर्वेक्षणाबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करा, सर्वेचे पैसे शासनाकडून अदा करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खा. नेते यांनी यावेळी दिले.या सभेला नगरसेविका मिनल चिमुरकर, संध्या उईके, माधुरी खोब्रागडे, बेबी चिचघरे, डॉ. अश्विनी धात्रक, भाजपचे कार्यकर्ते प्रमोद पिपरे, रेखा डोळस, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)