शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

गडचिरोलीचा सिटी सर्वे तत्काळ करा

By admin | Updated: February 22, 2015 01:23 IST

वाढत्या लोकसंख्येनुसार नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नियोजन आराखडा आवश्यक आहे.

गडचिरोली : वाढत्या लोकसंख्येनुसार नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नियोजन आराखडा आवश्यक आहे. त्यासाठी न.प. प्रशासनाने तत्काळ सीटी सर्वे करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना आढावा सभेत दिले. खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नगर पालिकेत नगराध्यक्ष यांच्या कक्षात आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या आढावा सभेला प्रामुख्याने आ. डॉ. देवराव होळी, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, गडचिरोलीचे तहसीलदार डी. जी. जाधव, न.प. मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे, नगराध्यक्ष निर्मला मडके, पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, वित्त व नियोजन सभापती विजय गोरडवार, पाणी पुरवठा सभापती संजय मेश्राम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, नगर रचना कार्यालयाचे अधिकारी घाटेकर आदी उपस्थित होते. यावेळी खा. नेते यांनी न.प. अंतर्गत कोणत्या योजनेंतर्गत विकास कामांचे नियोजन करण्यात आले, अशी विचारणा केली असता, मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी शहरातील भूमीगत गटार लाईनचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी नगर विकास विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे सादर केला आहे. पाणी जोडणीला फिटर बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे सांगितले.वाढत्या लोकसंख्येनुसार सर्व नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगर पालिकेचा दर्जा वाढण्याचा मुद्दा बैठकीत चर्चेला आला. दरम्यान ब दर्जा श्रेणीत गडचिरोली नगर परिषद असल्याने मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे शक्य होत नाही. कारण निधीही कमी मिळतो. त्यामुळे गडचिरोली न.प. ला अ दर्जा मिळण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. अ दर्जा देण्याबाबत ५५ टक्के आस्थापना खर्चाची अट नगर विकास विभाग घालत असल्याची माहिती मुख्याधिकारी बन्नोरे यांनी दिली. यावर न.प. प्रशासनाने अ दर्जा देण्याचा मुख्यमंत्री, सचिव यांचेकडे प्रस्ताव सादर करावा, नक्षलग्रस्त भागातील पालिकेला आस्थापना खर्चाची अट शिथील करून अ दर्जा देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार अशी ग्वाही खा. नेते यांनी बैठकीत दिली. शहरातील सर्व झोपडपट्टी वस्तींमध्ये रमाई घरकूल योजना व वनहक्क पट्ट्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी न.प. प्रशासनाने सीटी सर्वे करून संरक्षित झोपडपट्टीचा भाग निश्चित करावा, तसेच संरक्षित झोपडपट्टी म्हणून घोषीत करावी. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गरजुंना वनजमिनीची पट्टे देण्यात काहीच अडचण नसल्याचे सांगितले. सीटी सर्वे करण्यात न आल्यामुळे शहर विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. सीटी सर्वेसाठी नगर रचना कर विभागाकडे न.प. प्रशासनाला जवळपास २ कोटी ६० लाख ७५ हजार रूपये भरणा करावा लागणार आहे. मात्र न.प. प्रशासनाची आर्थिक परिस्थिती बळकट नसल्यामुळे सदर निधी अदा करणे शक्य नाही, अशी अडचण पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी खासदार महोदयांना सांगितली. यावर सीटी सर्वेक्षणाबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करा, सर्वेचे पैसे शासनाकडून अदा करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खा. नेते यांनी यावेळी दिले.या सभेला नगरसेविका मिनल चिमुरकर, संध्या उईके, माधुरी खोब्रागडे, बेबी चिचघरे, डॉ. अश्विनी धात्रक, भाजपचे कार्यकर्ते प्रमोद पिपरे, रेखा डोळस, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)