शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

कामाची मागणी वाढली

By admin | Updated: April 9, 2017 01:24 IST

शेतीची कामे आटोपताच रोहयोच्या कामांची मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे.

हमी योजनेशिवाय पर्याय नाही: धानोऱ्यात सर्वाधिक ७७ हजार मजुरांचे अर्ज गडचिरोली : शेतीची कामे आटोपताच रोहयोच्या कामांची मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात सुमारे ७७ हजार १९९ रोहयो मजुरांनी विविध विभागांकडे कामांची मागणी केली आहे. जिल्ह्यात उद्योग नसल्याने शेती हाच एकमेव रोजगार उपलब्ध करून देणारे साधन आहे. त्यातही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात पीक घेणे शक्य होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामाशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतीची कामे संपताच रोजगार हमीच्या कामांची मागणी वाढण्यास सुरूवात होते. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत शेतीची कामे चालतात. त्यानंतर मात्र मार्च ते जून या कालावधीपर्यंत शेतीची काहीच कामे राहत नाही. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर या कालावधीत मोठ्या प्रमाणात रोहयो कामांची मागणी करते. रोहयो विभागालाही मार्च व जून या कालावधीत रोहयो कामांची मागणी वाढत असल्याचा अनुभव असल्याने अगोदरच कामांना मंजुरी देऊन ठेवली जाते. मजुरांची मागणी येताच कामाला सुरूवात केली जाते. मार्च २०१७ या कालावधी गडचिरोली जिल्ह्यातील ७७ हजार १९९ रोहयो मजुरांनी कामाची मागणी केली होती. त्यापैकी बहुतांश मजुरांना रोहयोचे काम उपलब्ध झाले आहे. याच कालावधीत सुमारे ३६ हजार २०० कुटुंबांनी कामाची मागणी केली. त्यापैकी २७ हजार ९०० कुटुंबांना प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने शासनाकडून रोहयो कामांना विशेष प्राधान्य दिले जाते. त्यासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून दिल्या जातो. जिल्हा वार्षीक नियोजन समितीच्या अंदाज पत्रकापेक्षाही रोहयोचे अंदाजपत्रक जास्त आहे. मात्र यातील अर्धाही निधी खर्च होत नसल्याची शोकांतीका आहे. त्यामुळे निधी उपलब्ध राहूनही मजुरांना कामापासून वंचित राहावे लागत असल्याची स्थिती आहे. (नगर प्रतिनिधी)