शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोटींच्या जमिनीची लाखांत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:20 IST

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये गडचिरोली शहराजवळची जमीन जात आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत कोट्यवधींच्या घरात असली तरी प्रशासन मात्र जास्तीत जास्त २० लाख रूपये एकर मोबदला देऊ, शासकीय नियमानुसार त्यापेक्षा रूपयाही अधिक देणे शक्य नसल्याचे सांगत आहे.

ठळक मुद्देगुरूवारी वाटाघाटी फिस्कटल्या : बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्याची रेल्वेग्रस्तांची अट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये गडचिरोली शहराजवळची जमीन जात आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत कोट्यवधींच्या घरात असली तरी प्रशासन मात्र जास्तीत जास्त २० लाख रूपये एकर मोबदला देऊ, शासकीय नियमानुसार त्यापेक्षा रूपयाही अधिक देणे शक्य नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे प्लाटधारक कमालीचे धास्तावले आहेत. काहींनीतर २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.देसाईगंज-गडचिरोली मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रशासनातर्फे वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकºयांना त्यांच्या जमिनीच्या बाजारभावाच्या तुलनेत चारपट भाव मिळत असल्याने ते जाम खुश आहेत. पहिल्याच बैठकीत त्यांचे भाव अंतिम होत आहेत. मात्र गडचिरोली शहराजवळच्या जमिनीचे बाजार मूल्य एकरी कोट्यवधींच्या घरात आहेत. मात्र तेवढी किंमत शासन देण्यासाठी तयार नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी व प्रशासन यांच्यामधील वाटाघाटी सातत्याने फिस्कटत आहेत.गुरूवारी गडचिरोली उपविभागीय कार्यालयात गडचिरोली येथील रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करण्यासंदर्भात सभेचे आयोजन केले होते. ज्या शेतकºयांची जमीन जात आहे (प्लॉटधारक वगळून), त्या शेतकऱ्यांनी किमान ७५ लाख रूपये एकरी मोबदला द्यावा, अशी मागणी एसडीएमकडे केली. मात्र गडचिरोली शहराचा रेडिकनारनुसार दर चार लाख रूपये प्रती एकर आहे. त्यामध्ये वाढ करून २० लाख रूपये करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिकचा मोबदला देण्याबाबत उपविभागीय अधिकाºयांनी असमर्थता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ४० लाख रूपये प्रती देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल, अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान शेतकºयांना दिली. मात्र शेतकरी नाराज असल्याने अंतिम वाटाघाटी होऊ शकल्या नाही.प्लॉटधारकांचे प्रचंड नुकसानबसस्थानकाच्या मागच्या बाजूचा परिसर चांगला आहे. त्यामुळे या परिसरात लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. काही नागरिकांनी या परिसरात दोन हजार चौरस फूट आकाराचा प्लॉट १० लाख रूपये किंमतीला घेतला आहे. मात्र सदर प्लॉट अकृषक नाही. त्यामुळे शासन त्यांना घराची जागा मानत नाही. तर तो एक शेतजमिनीचाच तुकडा आहे. त्यामुळे शेतजमिनीचे जे भाव आहेत, तेच भाव देण्यासाठी प्रशासन तयार आहे. या भावानुसार १० लाख रूपयांच्या प्लॉटला केवळ एक लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी रूपये मिळणार आहेत. अनेकांनी पोटाला चिमटा लावून प्लॉट खरेदी केले. आता मात्र सदर प्लॉट बेभावात जात असल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्र्यांच्या समोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ‘छप्पर फाड के’ मोबदलाग्रामीण भागातील शेतजमिनीचा बाजारभाव एक लाख ते चार लाख रूपये या दरम्यान आहे. बुधवारी महादवाडी येथील शेतकऱ्यांसोबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाटाघाटी केल्या. वाटाघाटीसाठी आलेल्या शेतकºयांना शासनाचा भाव माहित नव्हता. त्यामुळे हेक्टरी जवळपास १५ लाख रूपये मिळतील, अशी आशा ते बाळगून होते. मात्र त्यांना ३० लाख रूपये हेक्टर मिळाला आहे. त्यामुळे अधिकच्या वाटाघाटी न करता शेतकºयांनी आपल्या जमिनी देण्यास सहमती दर्शविली.गडचिरोली शहरातील शेतकऱ्यांसोबतच्या वाटघाटी फिस्कटल्याने २ फेब्रुवारी रोजी याबाबत बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.रेल्वेस्थानक अर्धा किमी मागे घ्यारेल्वेस्थानक अगदी बसस्थानकाच्या जवळपास आहे. येथील जमिनीच्या किंमती कोट्यवधींच्या घरात आहेत. त्याचबरोबर रेल्वेस्थानक झाल्यास गडचिरोली शहराच्या विस्तारालाही जागा राहणार नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक अर्धा किमी मागे अंतरावर बनविण्यात यावे किंवा इंग्रजांनी देसाईगंज ते मंचेरियल असा रेल्वेचा सर्वे केला आहे. या सर्वेनुसार रेल्वे स्थानक लांझेडा ते इंदिरानगर दरम्यानच्या ठिकाणी किंवा पुढे धानोरा मार्गाकडे नेण्यात यावा, अशी मागणी प्लॉटधारकांनी केली आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे.