शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

कोविड-१९ बाबत अयोग्य वर्तणुकीमुळे देशात कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST

काेराेनामुळे देशात आतापर्यंत जवळपास १.९० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २८ लाख लोक उपचार घेत आहेत. याचा अभ्यास ...

काेराेनामुळे देशात आतापर्यंत जवळपास १.९० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २८ लाख लोक उपचार घेत आहेत.

याचा अभ्यास करण्यासाठी म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेद्वारे सेरोलोजीकल सर्वेक्षण सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणाची मुख्य जबाबदारी गडचिरोली जिल्ह्यातील शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश एम. हलामी यांच्याकडे साेपवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिबिर आयोजित करून नागरिकांची तपासणी करण्यात आली. काही नमुने पुढील तपासणीसाठी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यामध्ये सीएसआयआरमधील सर्व शास्त्रज्ञांचा समावेश होता.

एकूण १० हजार ४५७ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ५८ (१०.१४ टक्के) लोक कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यात हर्ड इम्युनिटी नाही, १० टक्के लोकांमधे रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने त्यांना कोरोनाचा धोका कमी, शाकाहारी लोकांना धोका कमी असल्याचे निदर्शनास आले. तसेच पुरूषांपेक्षा स्त्रियांना

धोका अधिक, तर दाट लोकवस्तीमध्ये कोरोना अधिक प्रमाणात पसरू शकतो. ‘ए’ आणि ‘एबी’ रक्तगट असणाऱ्या लोकांना कोराेनाची लागण लवकर होऊ शकते तर ओ रक्तगट असणाऱ्यांना शक्यता कमी असेल असे या सेरो सर्वेक्षणात दिसून आले. एप्रिल महिन्यात याबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. काेराेना संसर्ग टाळण्यासाठी नियमित मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे, लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला गृह विलगीकरणात ठेवणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे, आराेग्य विभागाने लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी, असे मत डॉ.प्रकाश हलामी यांनी व्यक्त केले आहे.