शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

रेशनसाठी नागरिकांची पायपीठ थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST

गडचिराेली जिल्ह्यातील लाेकसंख्या विरळ आहे. तसेच गावांची लाेकसंख्या अतिशय कमी आहे. एका रेशन दुकानाला जवळपासच्या पाच ते सहा गावांतील ...

गडचिराेली जिल्ह्यातील लाेकसंख्या विरळ आहे. तसेच गावांची लाेकसंख्या अतिशय कमी आहे. एका रेशन दुकानाला जवळपासच्या पाच ते सहा गावांतील लाभार्थी जाेडल्या गेली आहेत. धान्य आणण्यासाठी दुसऱ्या गावाला जावेच लागते. अशातच जवळपासच्या गावातील दुकानदाराने राजीनामा दिल्याने हे दुकान दुसऱ्या गावच्या दुकानाला जाेडले गेले आहे. त्यासाठी नागरिकांना पुन्हा १२ ते १५ किमींची पायपीट करून रेशन आणावे लागत हाेते. एवढे अंतर चालून जाण्यापेक्षा काही लाभार्थी धान्य आणत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या गावचे रेशन दुकान बंद पडले आहे. हे दुकान चालविण्यासाठी महिला बचत गट, संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण १६८ गावांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. काही गावातील बचत गटांसाठी माेठी स्पर्धा असल्याचे दिसून येते. एका दुकानासाठी चार ते पाच बचत गटांनी अर्ज केले आहेत.

बाॅक्स

किती दुकाने सुरू हाेणार

तालुका दुकाने

मुलचेरा ०५

आरमाेरी २२

एटापल्ली २०

कुरखेडा १४

अहेरी २०

चामाेर्शी १८

भामरागड १३

गडचिराेली १८

धानाेरा ३०

काेरची ०८

एकूण १६८

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

पडताळणीची प्रक्रिया शिल्लक

गावातील महिला बचत गट व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जांची छाननी करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. एकाच गावातील दुकानासाठी अनेक संस्था किंवा बचत गटांचे अर्ज आले असल्यास समिती याेग्य ताे निर्णय घेणार आहे. पडताळणीची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल, अशी माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बाॅक्स

अनेक वर्षांपासून पायपीट

एखाद्या रेशन दुकानदाराने राजीनामा दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत दुसऱ्या दुकानदाराची नियुक्ती हाेणे आवश्यक आहे. मात्र, पुरवठा विभागाने नवीन दुकानदारांच्या नियुक्तीसाठी प्रक्रियाच पार पाडली नाही. त्यामुळे काही दुकाने अनेक वर्षांपासून दुसऱ्या दुकानांना जाेडण्यात आली हाेती. नागरिकांना १० ते १२ किमी अंतरावरून धान्य आणावे लागत हाेते.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

पावसाळ्यात लाभार्थी धान्यापासून वंचित

गडचिराेली जिल्ह्यातील अनेक गावे अजूनही बारमाही रस्त्यांनी जाेडण्यात आली नाहीत. पावसाळ्यात या गावांचा संपर्कच तुटतो. गावात जड वाहन नेणे शक्य नाही ही बाब लक्षात घेऊन पावसाळ्यातील चार महिन्यांचे धान्य अगाेदरच पाेहाेचविले जाते. मात्र, दुसऱ्या गावाला रेशन दुकान जाेडलेले गाव लाभार्थ्यांच्या गावापासून बरेच दूर राहते. पावसाळ्यात या गावालाही पाेहाेचणे कठीण हाेते. अशावेळी लाभार्थी त्या गावी जाऊन धान्य आणत नाही व उपासमारीचा सामना करतात.