शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

तेंदू वाढीसाठी बेलकटाईचे तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 01:25 IST

तेंदूपत्ता चांगला यावा यासाठी आजपर्यंत जंगलांना आगी लावल्या जात होत्या किंवा खुटकटाई

१०३ ग्रामसभांचा सहभाग : २० वर्षांच्या प्रात्यक्षिक व अनुभवानंतर तंत्राचा वापर गडचिरोली : तेंदूपत्ता चांगला यावा यासाठी आजपर्यंत जंगलांना आगी लावल्या जात होत्या किंवा खुटकटाई (तेंदूचे लहान झाड तोडणे) केली जात होती. मात्र धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले आहे. या तंत्रामध्ये तेंदूच्या झाडाची जुनी पाने तोडली जातात. यामुळे नवीन चांगली पालवी येण्यास मदत होते व झाडही कायम राहून त्याची वाढ होण्यास मदत होते. या नवीन तंत्राच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. धानोरा तालुक्यातील १०३ ग्रामसभांनी एकत्र येत तेंदूपत्त्याचा लिलाव केला. या ग्रामसभांना शासनाच्या तुलनेत सुमारे चार पट दर उपलब्ध झाला आहे. लिलावानंतर कंत्राटदाराने ३० टक्के अनामत रक्कम ग्रामसभेच्या खात्यात जमा केली आहे. प्रत्येक ग्रामसभेच्या खात्यात जवळपास तीन ते चार लाख रूपयांची रक्कम जमा झाली आहे. या निधीचा उपयोग वन व्यवस्थापन व संरक्षणासाठी करण्याचा निर्णय ग्रामसभांनी घेतला. जंगलांना आगी लावल्यास किंवा तेंदूचे लहान झाड तोडल्यास चांगल्या दर्जाचा नवीन तेंदूपत्ता येतो, असा गैरसमज कंत्राटदारामध्ये असल्यामुळे मार्च महिना सुरू होताच जाणूनबुजून जंगलाला आगी लावल्या जात होत्या. यामध्ये कोट्यवधी रूपयांचे वनसंपदा नष्ट होत होती. वनवे थांबविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने फायरलाईन जाळल्या जात होत्या. आग विझविणारी यंत्र खरेदी केली जात होती. यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. खुटकटाईच्या माध्यमातून तेंदूचे झाड अगदी बुडापासूनच तोडले जात असल्याने सदर झाडाची वाढ खुंटत होती व दरवर्षीच जिवंत राहण्याचा प्रश्न झाडासमोर निर्माण होत होता. चार ते पाच वर्षानंतर ते झाड पूर्णपणे नष्ट होत होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन माजी आमदार हिरामन वरखडे यांनी व नागरिकांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले. कंत्राटदाराकडून अनामत म्हणून मिळालेली ३० टक्के रक्कम यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. बेल कटाईच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना सात दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. १०३ गावात १० हजार पेक्षा अधिक मनुष्यदिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. सदर उपक्रम इतर ग्रामसभांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यामुळे वन विभागाने या पध्दतीचा प्रचार करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी) अशी केली जाते बेलकटाई सतत २० वर्षांच्या अनुभव व प्रात्यक्षिकानंतर ही पध्दत शोधण्यात आली आहे. याबाबतचे प्रशिक्षण वैद्यराज सुखदेव गावळे व गावातील मजुरांना दिले जात आहे. बेलकटाईमध्ये तेंदूच्या लहान झाडाची जुनी पाने तोडली जातात. त्यामुळे त्या झाडाला नवीन पालवी येण्यास सुरूवात होते. खुटकटाईच्या तुलनेत ही पध्दत थोडी किचकट असली तरी या पध्दतीत झाड नष्ट होत नाही. त्यामुळे या माध्यमातून जंगलाचे संरक्षण होण्यास मदत होते. बेलकटाईमुळे तीनपट तेंदूपत्ता वाढीची खात्री आहे. बेलकटाईचा १०३ गावांनी नियोजन आराखडा तयार केला आहे. मोहफूल वेचण्यासाठी आगी लावू नये, असे आवाहनही केले जात आहे. त्याचबरोबर मोकळ्या जागेत बांबूची लागवड करण्यासाठी या ग्रामसभा प्राधान्य देणार आहेत.