शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू वाढीसाठी बेलकटाईचे तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 01:25 IST

तेंदूपत्ता चांगला यावा यासाठी आजपर्यंत जंगलांना आगी लावल्या जात होत्या किंवा खुटकटाई

१०३ ग्रामसभांचा सहभाग : २० वर्षांच्या प्रात्यक्षिक व अनुभवानंतर तंत्राचा वापर गडचिरोली : तेंदूपत्ता चांगला यावा यासाठी आजपर्यंत जंगलांना आगी लावल्या जात होत्या किंवा खुटकटाई (तेंदूचे लहान झाड तोडणे) केली जात होती. मात्र धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले आहे. या तंत्रामध्ये तेंदूच्या झाडाची जुनी पाने तोडली जातात. यामुळे नवीन चांगली पालवी येण्यास मदत होते व झाडही कायम राहून त्याची वाढ होण्यास मदत होते. या नवीन तंत्राच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. धानोरा तालुक्यातील १०३ ग्रामसभांनी एकत्र येत तेंदूपत्त्याचा लिलाव केला. या ग्रामसभांना शासनाच्या तुलनेत सुमारे चार पट दर उपलब्ध झाला आहे. लिलावानंतर कंत्राटदाराने ३० टक्के अनामत रक्कम ग्रामसभेच्या खात्यात जमा केली आहे. प्रत्येक ग्रामसभेच्या खात्यात जवळपास तीन ते चार लाख रूपयांची रक्कम जमा झाली आहे. या निधीचा उपयोग वन व्यवस्थापन व संरक्षणासाठी करण्याचा निर्णय ग्रामसभांनी घेतला. जंगलांना आगी लावल्यास किंवा तेंदूचे लहान झाड तोडल्यास चांगल्या दर्जाचा नवीन तेंदूपत्ता येतो, असा गैरसमज कंत्राटदारामध्ये असल्यामुळे मार्च महिना सुरू होताच जाणूनबुजून जंगलाला आगी लावल्या जात होत्या. यामध्ये कोट्यवधी रूपयांचे वनसंपदा नष्ट होत होती. वनवे थांबविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने फायरलाईन जाळल्या जात होत्या. आग विझविणारी यंत्र खरेदी केली जात होती. यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. खुटकटाईच्या माध्यमातून तेंदूचे झाड अगदी बुडापासूनच तोडले जात असल्याने सदर झाडाची वाढ खुंटत होती व दरवर्षीच जिवंत राहण्याचा प्रश्न झाडासमोर निर्माण होत होता. चार ते पाच वर्षानंतर ते झाड पूर्णपणे नष्ट होत होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन माजी आमदार हिरामन वरखडे यांनी व नागरिकांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले. कंत्राटदाराकडून अनामत म्हणून मिळालेली ३० टक्के रक्कम यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. बेल कटाईच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना सात दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. १०३ गावात १० हजार पेक्षा अधिक मनुष्यदिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. सदर उपक्रम इतर ग्रामसभांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यामुळे वन विभागाने या पध्दतीचा प्रचार करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी) अशी केली जाते बेलकटाई सतत २० वर्षांच्या अनुभव व प्रात्यक्षिकानंतर ही पध्दत शोधण्यात आली आहे. याबाबतचे प्रशिक्षण वैद्यराज सुखदेव गावळे व गावातील मजुरांना दिले जात आहे. बेलकटाईमध्ये तेंदूच्या लहान झाडाची जुनी पाने तोडली जातात. त्यामुळे त्या झाडाला नवीन पालवी येण्यास सुरूवात होते. खुटकटाईच्या तुलनेत ही पध्दत थोडी किचकट असली तरी या पध्दतीत झाड नष्ट होत नाही. त्यामुळे या माध्यमातून जंगलाचे संरक्षण होण्यास मदत होते. बेलकटाईमुळे तीनपट तेंदूपत्ता वाढीची खात्री आहे. बेलकटाईचा १०३ गावांनी नियोजन आराखडा तयार केला आहे. मोहफूल वेचण्यासाठी आगी लावू नये, असे आवाहनही केले जात आहे. त्याचबरोबर मोकळ्या जागेत बांबूची लागवड करण्यासाठी या ग्रामसभा प्राधान्य देणार आहेत.