शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

तेंदू वाढीसाठी बेलकटाईचे तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 01:25 IST

तेंदूपत्ता चांगला यावा यासाठी आजपर्यंत जंगलांना आगी लावल्या जात होत्या किंवा खुटकटाई

१०३ ग्रामसभांचा सहभाग : २० वर्षांच्या प्रात्यक्षिक व अनुभवानंतर तंत्राचा वापर गडचिरोली : तेंदूपत्ता चांगला यावा यासाठी आजपर्यंत जंगलांना आगी लावल्या जात होत्या किंवा खुटकटाई (तेंदूचे लहान झाड तोडणे) केली जात होती. मात्र धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले आहे. या तंत्रामध्ये तेंदूच्या झाडाची जुनी पाने तोडली जातात. यामुळे नवीन चांगली पालवी येण्यास मदत होते व झाडही कायम राहून त्याची वाढ होण्यास मदत होते. या नवीन तंत्राच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. धानोरा तालुक्यातील १०३ ग्रामसभांनी एकत्र येत तेंदूपत्त्याचा लिलाव केला. या ग्रामसभांना शासनाच्या तुलनेत सुमारे चार पट दर उपलब्ध झाला आहे. लिलावानंतर कंत्राटदाराने ३० टक्के अनामत रक्कम ग्रामसभेच्या खात्यात जमा केली आहे. प्रत्येक ग्रामसभेच्या खात्यात जवळपास तीन ते चार लाख रूपयांची रक्कम जमा झाली आहे. या निधीचा उपयोग वन व्यवस्थापन व संरक्षणासाठी करण्याचा निर्णय ग्रामसभांनी घेतला. जंगलांना आगी लावल्यास किंवा तेंदूचे लहान झाड तोडल्यास चांगल्या दर्जाचा नवीन तेंदूपत्ता येतो, असा गैरसमज कंत्राटदारामध्ये असल्यामुळे मार्च महिना सुरू होताच जाणूनबुजून जंगलाला आगी लावल्या जात होत्या. यामध्ये कोट्यवधी रूपयांचे वनसंपदा नष्ट होत होती. वनवे थांबविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने फायरलाईन जाळल्या जात होत्या. आग विझविणारी यंत्र खरेदी केली जात होती. यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. खुटकटाईच्या माध्यमातून तेंदूचे झाड अगदी बुडापासूनच तोडले जात असल्याने सदर झाडाची वाढ खुंटत होती व दरवर्षीच जिवंत राहण्याचा प्रश्न झाडासमोर निर्माण होत होता. चार ते पाच वर्षानंतर ते झाड पूर्णपणे नष्ट होत होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन माजी आमदार हिरामन वरखडे यांनी व नागरिकांनी बेलकटाई हे नवीन तंत्र शोधून काढले. कंत्राटदाराकडून अनामत म्हणून मिळालेली ३० टक्के रक्कम यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. बेल कटाईच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना सात दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. १०३ गावात १० हजार पेक्षा अधिक मनुष्यदिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. सदर उपक्रम इतर ग्रामसभांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यामुळे वन विभागाने या पध्दतीचा प्रचार करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी) अशी केली जाते बेलकटाई सतत २० वर्षांच्या अनुभव व प्रात्यक्षिकानंतर ही पध्दत शोधण्यात आली आहे. याबाबतचे प्रशिक्षण वैद्यराज सुखदेव गावळे व गावातील मजुरांना दिले जात आहे. बेलकटाईमध्ये तेंदूच्या लहान झाडाची जुनी पाने तोडली जातात. त्यामुळे त्या झाडाला नवीन पालवी येण्यास सुरूवात होते. खुटकटाईच्या तुलनेत ही पध्दत थोडी किचकट असली तरी या पध्दतीत झाड नष्ट होत नाही. त्यामुळे या माध्यमातून जंगलाचे संरक्षण होण्यास मदत होते. बेलकटाईमुळे तीनपट तेंदूपत्ता वाढीची खात्री आहे. बेलकटाईचा १०३ गावांनी नियोजन आराखडा तयार केला आहे. मोहफूल वेचण्यासाठी आगी लावू नये, असे आवाहनही केले जात आहे. त्याचबरोबर मोकळ्या जागेत बांबूची लागवड करण्यासाठी या ग्रामसभा प्राधान्य देणार आहेत.