शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आलापल्ली-सिरोंचा मार्ग देताहे अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण उन्हाळा संपत आला तरी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला नसल्यामुळे संबंधित विभागाला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.

ठळक मुद्देखड्ड्यात हरविला रस्ता । कामाची चौकशी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण उन्हाळा संपत आला तरी हा रस्ता दुरूस्त करण्यात आला नसल्यामुळे संबंधित विभागाला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहेत.हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे गेला आहे. या मार्गाचे रुंदीकरण करून नव्याने बांधणी करण्यास अजून बराच वेळ आहे. पण तोपर्यंत अशा खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी धोकादायक झाले आहे. याबद्दल अनेक लोकांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे या रस्त्याबद्दल तक्रारी केल्या. रस्त्याचे यापूर्वी झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच एवढी दुरवस्था झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्या कामाची चौकशी करण्याचे निर्देश खा.अशोक नेते यांनी दिले. तसेच या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. पावसाला सुरूवात होण्याआधी दुरूस्ती केली नाही तर मोठे हाल होणार आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा