शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रंथाशी जीवनाची सांगड घाला- जयस्वाल

By admin | Updated: January 21, 2016 00:10 IST

साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून गं्रथांबाबत जागृती घडून येते. पुस्तके वाचता वाचता माणसं वाचायला शिका, माणसं वाचल्यावर अर्थात माणसं समजल्यावर खऱ्या अर्थाने निसर्ग कळतो.

तीन दिवसीय कार्यक्रम : गं्रथ महोत्सवाचे थाटात उद्घाटनगडचिरोली : साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून गं्रथांबाबत जागृती घडून येते. पुस्तके वाचता वाचता माणसं वाचायला शिका, माणसं वाचल्यावर अर्थात माणसं समजल्यावर खऱ्या अर्थाने निसर्ग कळतो. ग्रंथातून विचारांची देवाणघेवाण होते. ग्रंथातील विचार आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविण्याची गरज आहे. त्याकरिता ग्रंथ , पुस्तकाच्या मर्माशी जीवनाची सांगड घाला, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी केले. शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथे शिवाजी महाविद्यालयाच्या कवीवर्य मंगेश पाडगावकर नगरीत ग्रंथ महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणूून माजी प्राचार्य डॉ. एन. एस. पठाण, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, जि. प. समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, आर. पी. निकम, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, समशेर खॉ पठाण आदी उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. डॉ. जयस्वाल म्हणाले, पुस्तक वाचनातून संस्कारशीलता निर्माण होते, पालकांनी ग्रंथ वाचनाची सवय लावल्यास मुलेही वाचन संस्कृतीकडे वळतील, पुस्तक वाचल्यानंतर मन व बुद्धीची सुपिकता चांगली राहिल्यास नक्कीच पुस्तकरूपी ज्ञानाचे अंकुर बहरल्याशिवाय राहणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी डॉ. एन. एस. पठाण म्हणाले, ग्रंथ मानवाचे गुरू आहेत. माणसाला सदैव जागे ठेवण्याचे महत्त्वाचे काम ग्रंथ व पुस्तके करतात. देशात सहिष्णूता टिकविण्यात ग्रंथ परंपरेचा मोठा वाटा आहे, देशात १९२५ च्या पूर्वी अनेक मोठे विचारवंत होऊन गेले. त्यानंतर ८५ वर्षांच्या काळात नव्या विचाराची निर्मिती झाली नाही, असेही ते म्हणाले. आपण काय वाचतो यापेक्षा आपण कसे वाचतो याला अतिशय महत्त्व आहे. आपल्यातील दडलेली प्रतिभाशक्ती जो आपल्याला सांगतो तोच खरा गुरू व शिक्षक आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून वाचन संस्कृतीतून विचारसंपन्न व्हा, असे आवाहन डॉ. पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, संचालन नंदकिशोर मांडवे, विद्या आसमवार यांनीे तर आभार विभा डांगे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)