शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेला त्रुटींचे ग्रहण, १३२ पैकी ८७ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST

प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून ...

प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठवितात. त्या प्रस्तावांत संबंधित विमा कंपनीकडून विविध त्रुटी काढून त्याची पूर्तता करण्यास सांगितले जाते. जुने फेरफार, तलाठ्याकडील कागदपत्रे, पोलीस ठाण्यातील रिपोर्ट, शवपरीक्षण अहवाल अशा अनेक बाबींसह वारसाधारकांकडील कागदपत्रेही सादर करावी लागतात. यातील कोणताही कागद नसेल तर प्रस्ताव थांबविला जातो.

(बॉक्स)

कोणाला किती मिळते मदत?

शेतकऱ्याचा विविध कारणाने आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून विमा कंपनीमार्फत २ लाखांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय कायम अपंगत्व (४० टक्के) आल्यास १ लाखाची मदत मिळते. सातबाराधारक प्रत्येक शेतकरी यासाठी पात्र असतो. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किंवा इतर कोणत्याही अटी नाहीत. १० ते ७५ वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यूसाठी त्यांच्या कुटुंबियांना योजनेचा लाभ दिला जातो.

(कोट)

... म्हणून प्रस्ताव प्रलंबित आहेत

या योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत विमा दाव्याचा प्रस्ताव सादर करणे गरजेचे असते. त्यामुळे जेवढे कागदपत्र उपलब्ध होतील त्यावरून प्रस्ताव सादर केला जातो. त्रुटींची पूर्तता मागाहून केली जाते. आता नागपूर येथे विभागीय सहसंचालकांकडे दर आठवड्याला याबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे प्रस्ताव लवकर मंजूर होण्याची शक्यता आहे.

- जी.बी.बादाडे

तंत्र अधिकारी, कृषी विभाग, गडचिरोली

रस्त्यावरील अपघातात सर्वाधिक मृत्यू

- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूमागे अनेक कारणे असली तरी त्यात सर्वाधिक मृत्यू हे रस्त्यावरील अपघातात झालेले आहेत. त्यामुळे दुचाकीवरून जाताना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे.

- तसेच सर्पदंश आणि पाण्यात बुडून मरण पावणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतातून येताना नदी-नाले ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहून जाऊन दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो.