शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकरी अपघात विमा योजनेला त्रुटींचे ग्रहण, १३२ पैकी ८७ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST

प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून ...

प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठवितात. त्या प्रस्तावांत संबंधित विमा कंपनीकडून विविध त्रुटी काढून त्याची पूर्तता करण्यास सांगितले जाते. जुने फेरफार, तलाठ्याकडील कागदपत्रे, पोलीस ठाण्यातील रिपोर्ट, शवपरीक्षण अहवाल अशा अनेक बाबींसह वारसाधारकांकडील कागदपत्रेही सादर करावी लागतात. यातील कोणताही कागद नसेल तर प्रस्ताव थांबविला जातो.

(बॉक्स)

कोणाला किती मिळते मदत?

शेतकऱ्याचा विविध कारणाने आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून विमा कंपनीमार्फत २ लाखांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय कायम अपंगत्व (४० टक्के) आल्यास १ लाखाची मदत मिळते. सातबाराधारक प्रत्येक शेतकरी यासाठी पात्र असतो. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किंवा इतर कोणत्याही अटी नाहीत. १० ते ७५ वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यूसाठी त्यांच्या कुटुंबियांना योजनेचा लाभ दिला जातो.

(कोट)

... म्हणून प्रस्ताव प्रलंबित आहेत

या योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत विमा दाव्याचा प्रस्ताव सादर करणे गरजेचे असते. त्यामुळे जेवढे कागदपत्र उपलब्ध होतील त्यावरून प्रस्ताव सादर केला जातो. त्रुटींची पूर्तता मागाहून केली जाते. आता नागपूर येथे विभागीय सहसंचालकांकडे दर आठवड्याला याबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे प्रस्ताव लवकर मंजूर होण्याची शक्यता आहे.

- जी.बी.बादाडे

तंत्र अधिकारी, कृषी विभाग, गडचिरोली

रस्त्यावरील अपघातात सर्वाधिक मृत्यू

- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूमागे अनेक कारणे असली तरी त्यात सर्वाधिक मृत्यू हे रस्त्यावरील अपघातात झालेले आहेत. त्यामुळे दुचाकीवरून जाताना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे.

- तसेच सर्पदंश आणि पाण्यात बुडून मरण पावणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतातून येताना नदी-नाले ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहून जाऊन दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो.