शहरं
Join us  
Trending Stories
1
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
2
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
3
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
4
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
5
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
6
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
7
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
8
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
9
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
10
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
11
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
12
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
13
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
14
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
15
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
16
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
17
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
18
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
19
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
20
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

नऊ महिन्यात जिल्ह्यात ४४८ कारची नोंदणी

By admin | Updated: December 31, 2014 23:24 IST

२०१४ या वर्षातील १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत ४४८ नागरिकांनी नव्या कार खरेदी केल्या आहे. ९ महिन्यात ४४८ कारची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

गडचिरोली : २०१४ या वर्षातील १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत ४४८ नागरिकांनी नव्या कार खरेदी केल्या आहे. ९ महिन्यात ४४८ कारची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. गतवर्षी २०१३ मध्ये १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत एकूण ७२२ कारची खरेदी करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे २०१३ च्या डिसेंबर या एका महिन्यात सर्वाधिक १८२ नव्या कारची नोंदणी झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात दिवसेंदिवस चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरी भागात तर एकाच कुटुंबात तीन पेक्षा अधिक वाहने असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातही २० टक्के कुटुंबिय दुचाकी वाहने वापरत असल्याचे चित्र आहे. धावपळीच्या युगात कमी वेळात अधिकाधिक कामे उरकण्याच्या लगबगीसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वापरास पसंती दिली जाते. महामंडळाच्या एसटीचा प्रवास वेळखाऊ आहे. तसेच तासनतास एसटीची वाट पाहण्यात बराचवेळ निघून जातो. त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वत:च्या हक्काचे वाहने खरेदी करून कमी वेळात अधिक कामे उरकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.योग्यता प्रमाणपत्र वैध असल्याशिवाय कोणत्याही वाहनचालकाने आपले वाहन रस्त्यावर चालवू नये, ज्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली आहे, अशी वाहने वाहतुकीत आढळून आल्यास वाहनांना दंड आकारणी करण्यात येईल, असा फतवा उपप्रादेशिक परिवहन विभागाने काढला होता. सदर नियम दुचाकी वाहनाला नसून केवळ परिवहन वाहनांसाठी आहे. परिवहन वाहनांमध्ये आॅटो रिक्षा, टॅक्सी, तीनचाकी मालवाहक वाहन, स्कूल बस, खासगी सेवेतील वाहन, रूग्णवाहिका, नॉन कृषक ट्रेलर आदींचा समावेश आहे. योग्यता प्रमाणपत्र वैधता संपुष्टात आलेल्या वाहनधारकांना परवाना व योग्यता प्रमाणपत्राचे त्वरित नुतनीकरण करून घ्यावे, तपासणी मोहिमेमध्ये ज्या वाहनाकडे परवाना व योग्यता प्रमाणपत्र वैध नसल्यास अशा वाहनांना रस्त्यावर चालण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. वैधता मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या ट्रक, टॅम्पो, लहान एलएमबी, रिक्षा, टॅक्सी व बसेस आदी वाहनांद्वारे वाहतुकीदरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असते, कारण अशा वाहनांचा फिटनेस बिघडलेला असतो. त्यामुळे अशी वाहने वाहतुकीवर अधिक धोकादायक असतात. अपघाताचे प्रमाण वाढू नये, या उद्देशाने परिवहन विभागाने परवाना व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे सक्त निर्देश दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ दरवर्षी बसत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कार खरेदीकडे कल नाही. (स्थानिक प्रतिनिधी)