शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यातील १८ हजार बालके कुपोषणाच्या विळख्यात

By admin | Updated: August 23, 2015 01:55 IST

आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्हाभरात सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

आरोग्य यंत्रणा सुस्त : दुर्गम भागातील तालुक्यांमध्ये कुपोषणाची समस्या तीव्र; भावी पिढी धोक्यातगडचिरोली : आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्हाभरात सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषणमुक्तीसाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत असले तरी कुपोषणाची समस्या कमी न होता, ती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येते.गडचिरोली या नक्षलग्रस्त व मागास जिल्ह्यात शासनाचीच आरोग्यसेवा आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात नागरिकांचा वास्तव्य असून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे प्रमाण ७० टक्क्यावर आहे. जवळजवळ पाच लाखांपेक्षा अधिक नागरिक दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक जाणीवांविषयी त्यांच्यामध्ये कमालीचा अभाव असल्याचे चित्र दिसून येते. भामरागड तालुक्यात ही बाब अतिशय प्रकर्षाने पुढे आली आहे. राज्यपालांनी दत्तक घेतलेला हा तालुका जसा विकासात मागे आहे, तसेच आरोग्य जाणीवांच्या दृष्टीनेही मागे आहे. भामरागड तालुक्यात कमी वजनाचे ९३१ तर अतिकुपोषित २५९ मुले आढळल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. भामरागड तालुक्यात लाहेरी, कोठी, ताडगाव, भामरागड येथे आरोग्य केंद्र आहेत. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६० टक्क्यावर अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांचा मिळत नाही. अनेक रुग्णांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तसेच पालकांमध्ये अशिक्षितता व अज्ञान मोठ्या प्रमाणावर असल्याने अंगणवाडीतही मुलांना दाखल केले जात नाही. परिणामी या तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांची असून मे महिन्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १८ हजार १४२ बालके कुपोषणाच्या गंभीर श्रेणीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३ हजार ४५७ बालके अतिशय गंभीर अवस्थेत आहे. त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य यंत्रणा उदासीन दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)