शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

लोकसभेसाठी १५ लाख ६८ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:20 IST

निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६१ हजार मतदार वाढले : १८ ला निघणार अधिसूचना, २५ पर्यंत स्वीकारणार नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार एकूण १५ लाख ६८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याशिवाय येत्या १५ मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्या नवीन मतदारांनाही मतदानाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत प्रशासकीय तयारीची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-दुबे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस.के.चडगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली, अहेरी, आरमोरी, आमगाव आणि ब्रह्मपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघातील एकूण १५ लाख ६८ हजार ६२० मतदारांची यादी तयार आहे. त्यात ७ लाख ९४ हजार ७६८ पुरूष तर ७ लाख ७३ हजार ८५० महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय २ तृतीयपंथींचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदार संघातील मतदार मिळून २०१४ मध्ये ७ लाख २८ हजार ११६ मतदार होते. पाच वर्षात ही संख्या ७ लाख ८९ हजार ७४६ वर पोहोचली आहे. येत्या १८ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. तेव्हापासून २५ मार्चपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येईल. मात्र यात दि.२१ ते २४ दरम्यान होळी, रंगपंचमी, पाडवा, चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग चार दिवस सुटी आल्यामुळे एकूण ४ दिवस नामांकन दाखल करण्यासाठी मिळणार आहेत.पहिल्यांचा निवडणुकीत ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्यामुळे त्याचे प्रात्यक्षिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदारांना दाखविण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सकाळी ६ वाजता ५० लोकांना याचे पुन्हा प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरचीही सोय राहणार आहे.१८७१ केंद्रांवरून होणार मतदानया निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १८७१ मतदान केंद्र राहणार आहेत. त्यात २८१ केंद्र शहरी भागात तर १५९० केंद्र ग्रामीण भागात राहतील. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी आणि कुठेही गडबड झाल्यास दक्ष राहण्यासाठी १२ फिरते पथक, १२ व्हिडीओ चित्रीकरण पथक आणि १२ देखरेख पथक राहणार असल्याची माहिती सीईओ डॉ.राठोड यांनी दिली. ज्या शिक्षकांची ड्युटी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये लागली आहे त्यांना यातून वगळल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत घटजिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवादी दहशत पसरवून नागरिकांना या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. परंतू त्यांचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आता संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांची संख्या ३३ ने कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे लगतच्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओरिसा येथील नक्षलप्रभावित भागांत एकाच दिवशी मतदान आहे. त्यामुळे नक्षली कारवाया करण्यासाठी एका भागातून दुसºया भागात जाण्याची संधी नक्षलवाद्यांनी मिळणार नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. ही निवडणूक दारूमुक्त वातावरणात पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहिल.