शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी १५ लाख ६८ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:20 IST

निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६१ हजार मतदार वाढले : १८ ला निघणार अधिसूचना, २५ पर्यंत स्वीकारणार नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार एकूण १५ लाख ६८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याशिवाय येत्या १५ मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्या नवीन मतदारांनाही मतदानाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत प्रशासकीय तयारीची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-दुबे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस.के.चडगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली, अहेरी, आरमोरी, आमगाव आणि ब्रह्मपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघातील एकूण १५ लाख ६८ हजार ६२० मतदारांची यादी तयार आहे. त्यात ७ लाख ९४ हजार ७६८ पुरूष तर ७ लाख ७३ हजार ८५० महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय २ तृतीयपंथींचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदार संघातील मतदार मिळून २०१४ मध्ये ७ लाख २८ हजार ११६ मतदार होते. पाच वर्षात ही संख्या ७ लाख ८९ हजार ७४६ वर पोहोचली आहे. येत्या १८ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. तेव्हापासून २५ मार्चपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येईल. मात्र यात दि.२१ ते २४ दरम्यान होळी, रंगपंचमी, पाडवा, चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग चार दिवस सुटी आल्यामुळे एकूण ४ दिवस नामांकन दाखल करण्यासाठी मिळणार आहेत.पहिल्यांचा निवडणुकीत ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्यामुळे त्याचे प्रात्यक्षिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदारांना दाखविण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सकाळी ६ वाजता ५० लोकांना याचे पुन्हा प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरचीही सोय राहणार आहे.१८७१ केंद्रांवरून होणार मतदानया निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १८७१ मतदान केंद्र राहणार आहेत. त्यात २८१ केंद्र शहरी भागात तर १५९० केंद्र ग्रामीण भागात राहतील. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी आणि कुठेही गडबड झाल्यास दक्ष राहण्यासाठी १२ फिरते पथक, १२ व्हिडीओ चित्रीकरण पथक आणि १२ देखरेख पथक राहणार असल्याची माहिती सीईओ डॉ.राठोड यांनी दिली. ज्या शिक्षकांची ड्युटी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये लागली आहे त्यांना यातून वगळल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत घटजिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवादी दहशत पसरवून नागरिकांना या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. परंतू त्यांचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आता संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांची संख्या ३३ ने कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे लगतच्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओरिसा येथील नक्षलप्रभावित भागांत एकाच दिवशी मतदान आहे. त्यामुळे नक्षली कारवाया करण्यासाठी एका भागातून दुसºया भागात जाण्याची संधी नक्षलवाद्यांनी मिळणार नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. ही निवडणूक दारूमुक्त वातावरणात पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहिल.