शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांत ७०० किमीचे नवीन रस्ते

By admin | Updated: December 25, 2014 23:32 IST

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ वर्षांत ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचली आहेत.

गडचिरोली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ वर्षांत ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचली आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे बारमाही रस्त्याने जोडण्याचे धोरण अवलंबण्यात आले. या योजनेंतर्गत देशात लाखो किमींचे रस्ते बांधण्यात आले आहेत. जी गावे आजपर्यंत रस्त्यांअभावी विकासापासून वंचित होती. त्या गावांमध्ये विकासाची पहाट दिसून येत आहे. या योजनेचे सकारात्मक परिणाम केंद्र शासनाला दिसून आल्यानेच त्यानंतरच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुद्धा सदर योजना त्याच नावाने सुरू केली आहे. सध्या या योजनेचा दहावा टप्पा सुरू आहे. योजनेच्या सुरूवातीपासून २००६ पर्यंत सदर योजना जिल्हा परिषदेच्या मार्फतीने राबविण्यात येत होती. त्यानंतर २००६-०७ मध्ये ग्रामीण रस्ते विकास संस्थेची स्थापना करून २००९ पासून स्वतंत्र कार्यकारी यंत्रणा निर्माण करण्यात आले. १० टप्प्यात २३३ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी १८१ कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेसाठी आजपर्यंत १९७ कोटी ७५ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत १,०७४.३२ किमीचे मार्ग मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६९७.३७ किमीचे रस्ते बांधून पूर्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षल प्रभावित व जंगलाने व्यापला आहे. त्याचबरोबर काही गावांची लोकसंख्या १०० पेक्षाही कमी असून दोन गावांमधील अंतर चार ते पाच किमीपेक्षाही जास्त आहे. कमी लोकसंख्येसाठी रस्ते तयार करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला आर्थिक अडचणी येत असल्याने सदर विभाग या गावांमध्ये रस्ते निर्माण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव आल्यानंतर सदर योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शेकडो गावे रस्त्यांनी जोडली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसातही मार्गक्रमण करण्यास सुकर झाला आहे. मात्र या रस्त्यांची आता बऱ्याच दिवसांपासून डागडुजी झाली नसल्याने सदर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. (नगर प्रतिनिधी)