शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘गुपचूप खाऊ’खा आणि दिवसभर फ्रेश राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 18:21 IST

कामावरून घरी जाईपर्यंत किंवा दिवसभराचं काम संपवून संध्याकाळ होईपर्यंत पोटातल्या भुकेचा संयमही तुटतो आणि भूक तुटून पडते. पोटात ही भूक उबाळून येणं आणि अशा भुकेपोटी खाणं संशोधकांच्या मते घातक असतं. ही भूक अशी उबाळून येवू नये म्हणून मध्ये मध्ये, काम करता करता गुपचुप खाऊ खाणं गरजेचं असतं.

ठळक मुद्दे* गुपचूप खाऊ खाल्ल्यानं भूक शमते तसेच दोन वेळेसच्या जेवणातून शरीरास आवश्यक पोषक घटक पोटात जात नाही ते घटक या गुपचूप खाऊमधून मिळू शकतात.* दिवसातून पाच वेळा खाणं म्हणजे खादाडपणा करणं नव्हे. याला आपल्या खाण्याच्या सवयीला योग्य वळण लावणं म्हणतात.* गुपचूप खाऊमुळे पोटातून मेंदूला तृप्ततेचा संदेश जातो. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. दिवसभर काम करताना उत्साही वाटतं.* दिवसातून पाच वेळेस थोडं थोडं खाणार्याच वजनही आटोक्यात राहातं असं संशोधनातून सिध्द झालं आहे.

- माधुरी पेठकरजगण्यासाठी आपण काय करतो? उत्तर सोपं आहे. दोन वेळेस जेवतो. जगण्यासाठी दोन वेळेसचं जेवण हवंच पण उत्तम जगण्यासाठी दोन वेळेसचं जेवण एकाचवेळी पोटभरून न घेता दोनाचे पाच भाग करा. आणि दिवसभरातून पाच वेळा थोडं थोडं खा. नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि दोन वेळेस छोटा खाऊ. खाण्याचे असे पाच भाग करून खाल्ले तर दिवसभर आपल्यातली ऊर्जा टिकून राहाते. दिवसातून पाच वेळेस थोडं थोडं खाणार्याच वजनही आटोक्यात राहातं असं संशोधनातून सिध्द झालं आहे.

एरवी कामाच्या ठिकाणी दुपारचा डबा खाऊन झाल्यावर आपण खाण्याचं टाळतो. दुपारच्या जेवणानंतर दोन तीन तासांनी पोटात भूक जागी होते. पण ‘आता नाही काही खायला मिळणार’असं टपली मारून तिला शांत केलं जातं. कामावरून घरी जाईपर्यंत किंवा दिवसभराचं काम संपवून संध्याकाळ होईपर्यंत पोटातल्या भुकेचा संयमही तुटतो आणि भूक तुटून पडते. पोटात ही भूक उबाळून येणं आणि अशा भुकेपोटी खाणं संशोधकांच्या मते घातक असतं. ही भूक अशी उबाळून येवू नये म्हणून मध्ये मध्ये, काम करता करता गुपचुप खाऊ खाणं गरजेचं असतं.

हा गुपचूप खाऊ खाल्ल्यानं भूक शमते तसेच दोन वेळेसच्या जेवणातून शरीरास आवश्यक पोषक घटक पोटात जात नाही ते घटक या गुपचूप खाऊमधून मिळू शकतात. या गुपचूप खाऊमुळे जेवणाच्या वेळेस आपण ताटावर तुटून पडत नाही. त्यामुळे एकाच वेळेस खूप खाल्लं जाण्याची शक्यता कमी होते. मधला खाऊ टाळून एकाच वेळेस खूप खाल्लं तर चयापचय क्रियेवर मोठा ताण पडतो. खाण्याआधी रक्तातील साखर एकदम कमी झालेली असते. आणि पोटातील ही स्थिती खाण्याबाबतची लालसा वाढवते, पोटात न्युरोपेपटाइड नावाचं रसायन तयार होतं जे कार्बोहायड्रेटची भूक वाढवतं. त्यातूनच मग जेवणाच्या वेळेस गोड, चमचमीत, तेलकट, मसालेदार खाण्याची इच्छा होते आणि तसं खाल्लंही जातं. यामुळे शरीराची कॅलरी कंट्रोल करण्याची क्षमता विस्कळीत होते. आणि त्याचा परिणाम थेट वजन वाढण्यावर होतो.

यापेक्षा एक नाश्ता आणि दोन जेवण यामध्ये दोन तीन तासानंतर गुपचूप खाऊ खाल्ला तर वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात, शरीरास आवश्यक घटक मिळतात, कॅलरी कंट्रोल राहातो. चयापचयाची क्रिया व्यवस्थित काम करते. आणि वजन आटोक्यात राहातं. दिवसातून पाच वेळा खाणं म्हणजे खादाडपणा करणं नव्हे. याला आपल्या खाण्याच्या सवयीला योग्य वळण लावणं म्हणतात.

गुपचूप खाऊ कधी खावा?खूप वेळ पोटात काहीच नसणं, भुकेचं पोटात खूप वेळ रेंगाळणं हे चुकीचं आहे. अशी वेळ आपल्यावर दिवसभरातून एकदाही येवू देवू नये. एक नाश्ता आणि दोन जेवण यादरम्यान हा गुपचूप खाऊ खावा. सकाळी नाश्ता 9 वाजता झाला आणि दुपारी जेवण दोन वाजता होणार असेल तर 11.30 ते 12 दरम्यान थोडा खाऊ खावा. दुपारच्या जेवणानंतर थेट रात्री 8-9 वाजताच जेवणार असू तर संध्याकाळी पाच सहा वाजता थोडा खाऊ खावा. या गुपचूप खाऊमुळे पोटातून मेंदूला तृप्ततेचा संदेश जातो. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. दिवसभर काम करताना उत्साही वाटतं.रात्रीच्या जेवणानंतर नकोच!

रात्री जेवल्यानंतर झोपेपर्यंतच्या काळात काही न खाणं उत्तम. रात्री जेवल्यानंतर गुपचूप खाऊची गरज पडत नाही. रात्री झोप येत नसेल तर अनेकदा खाण्याचा मोह होतो पण तो टाळावा. कारण अपुरी झोप, उशिरा खाणं यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. तसेच घ्रेलीन आणि लेप्टीनसारख्या हार्मोन्सवर त्याचा विपरित परिणाम होतो. हे हार्मोन्स भुकेची आणि तृप्तीची जाणीव करून देतात. या हार्मोन्सवर वाईट परिणाम झाला तर ही जाणीव हरवते. 

गुपचूप खाऊ कोणता खावा?

गुपचूप खाऊ म्हणजे थोडा पण पौष्टिक खाऊ. गुपचूप खाऊ म्हणजे सटरफटर नव्हे. चटपटीत नव्हे. सफरचंद, चिकू, केळं किंवा एखादं मोसमी फळंही चालतं. गाजर, काकडी , बीट यासारख्या कच्च्या भाज्या खाव्यात. घरी असाल तर गुपचूप खाऊ म्हणून फळांची स्मूदीही घेता येते. एनर्जी बार, ओट, नागली किंवा गव्हाची बिस्किटं, ताक, नारळाचं पाणी, सुका मेवा, मुरमुर्याचा, लाह्यांचा चिवडा, मोड आलेली कच्ची उसळ हा खाऊ पोटात मोठी भूक भडकू देत नाही.