Bigg bossच्या त्रासाला कंटाळून अनुराग डोभाल करणार होता आत्महत्या?; शो विषयी केला गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:23 PM2024-01-07T12:23:07+5:302024-01-07T12:25:37+5:30

Anurag dobhal: 'बिग बॉसने मला टॉर्चर केलं', असं म्हणत अनुरागने या शो मेकर्सवर अनेक गंभीर आरोप केले आहेत

bigg-boss-17-fame-anurag-dobhal-has-made-serious-allegations-against-bigg-boss-after-eviction | Bigg bossच्या त्रासाला कंटाळून अनुराग डोभाल करणार होता आत्महत्या?; शो विषयी केला गौप्यस्फोट

Bigg bossच्या त्रासाला कंटाळून अनुराग डोभाल करणार होता आत्महत्या?; शो विषयी केला गौप्यस्फोट

Bigg boss या रिअॅलिटी शोचं यंदाचं 17 वं पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. अंकिता लोखंडे (ankita lokhande) -विकी जैन (vicky jain) यांच्यातील भांडण, घरातली स्पर्धकांचे आपआपसातील वाद, प्रेम प्रकरणं यामुळे हे पर्व लोकप्रिय ठरत आहे. यामध्येच या घरातील स्पर्धक अनुराग डोभाल (Anurag dobhal) याचा नुकताच या कार्यक्रमातील प्रवास संपला आहे. मात्र, या शोमधून बाहेर पडल्यानंतर अनुरागने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. इतकंच नाही तर तो आत्महत्या करायला जाणार होता असंही त्याने सांगितलं.

अनुराग एक प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्ल्युएन्सर आणि युट्यूबर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा जबरदस्त मोठा चाहतावर्ग आहे. इतकंच नाही तर  बिग बॉसमध्ये सुद्धा त्याने टॉप 5 स्पर्धकांमध्ये जागा मिळवली होती. परंतु, सगळं काही सुरुळीत सुरु असतानाच मेकर्सने त्याला या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे अनुरागची प्रचंड लोकप्रियता असल्यामुळे त्याला या शोमधून काढणं कठीण झालं होतं. परिणामी, मेकर्सने त्याला बाहेर काढण्याची जबाबदारी बिग बॉसच्या सदस्यांना दिल्याचं म्हटलं जातं. या प्रकारानंतर अनुरागने मेकर्सवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अनुरागने त्याच्या युट्यूब चॅनेलवर याविषयी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

"मी तीन महिने त्या शोमध्ये होतो पण मला सगळ्यांनीच कटऑफ केलं होतं. कुटुंबीय, मित्रपरिवार सगळ्यांना पाहण्यासाठी मी आसुसलो होतो. या शोमधून मला बाहेर काढल्यानंतर दोन दिवस त्यांनी मला एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं. माझा फोन माझ्याकडून काढून घेतला होता. मी एकटाच होतो. माझ्या कुटुंबियांसोबतही मला बोलता येत नव्हतं. माझा शो संपल्यानंतरही हे लोक मला टॉर्चर करत होते. मला प्रश्न पडला होता की हे लोक असं का वागतायेत", असं अनुरागने म्हटलं.

पुढे तो म्हणतो, "या लोकांनी २ दिवस मला माझ्या कुटुंबापासून दूर ठेवलं होतं. त्यांनी माझ्या कुटुंबियांना भेटूही दिलं नाही आणि माझा फोन सुद्धा परत देत नव्हते. २ दिवस मी त्या हॉटेलमध्ये असताना माझ्या डोक्यात सतत आत्महत्या करायचे विचार येत होते. मी असं काय केलंय ज्यामुळे हे लोक मला त्रास देतायेत हेच मला समजत नव्हतं. देवाच्या कृपेमुळे मी कोणतंही चुकूचं पाऊल उचललं नाही. हे ते सत्य आहे जे बिग बॉसने कधीच समोर येऊ दिलं नाही."

दरम्यान, अनुरागने बिग बॉसवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'कारण नसताना सतत बिग बॉसमध्ये मला अपमानित केलं गेलं, माझं ट्रोलिंग केलं गेलं. मी माझ्या तत्वांना धरून वागल्यामुळे या लोकांनी मला  सतत त्रास दिला', असंही तो व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.

Web Title: bigg-boss-17-fame-anurag-dobhal-has-made-serious-allegations-against-bigg-boss-after-eviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.