"वैष्णवी आपल्यामुळेच गेलीय" अंकिताचा रोखठोक व्हिडीओ, 'भांडी घासण्याचा ट्रॉमा'बद्दलही बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:48 IST2025-06-09T16:47:36+5:302025-06-09T16:48:19+5:30
अकितानं 'भांडी घासण्याचा ट्रॉमा' म्हणजे नेमकं काय आहे, हे उलगडून सांगितलं.

"वैष्णवी आपल्यामुळेच गेलीय" अंकिताचा रोखठोक व्हिडीओ, 'भांडी घासण्याचा ट्रॉमा'बद्दलही बोलली
Ankita Walawalkar on Vaishnavi Hagawane Death Case: 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू वालावलकर एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, युट्यूबर आणि उद्योजिका आहे. मूळची कोकणातील असेलली अंकिता सामाजिक विषयांवर अनेकदा रोकठोक मते मांडताना दिसते. काही काळापूर्वी 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी असताना तिनं "भांडी घासण्याचा ट्रॉमा" असल्याचं म्हटलं होतं आणि त्यावरून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलही करण्यात आलं होतं. यावरून मीम्स देखील तयार करण्यात आले होते. मात्र नुकत्याच घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना अंकितानं आपल्या कटू अनुभवावर मन मोकळं केलं आहे. "भांडी घासण्याचा ट्रॉमा" म्हणजे नेमकं काय? यामागे लपलेलं वास्तव आणि मानसिकतेवर होणारा परिणाम तिनं अतिशय स्पष्टपणे उलगडून सांगितला आहे.
अंकितानं तिच्या युट्यूब चॅनलवर "मी वाचलेली वैष्णवी बोलतेय" या नावानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात समाज कसा दोषी आहे, यावर मत माडलं. "वैष्णवी गेलीय... पण ती का गेली माहितेय? आपल्यामुळेच... आपण सगळे जबाबदार आहोत. विशेषत: सोशल मीडियावर मोठमोठ्या कमेंट करणारे. "वैष्णवी हगवणेला न्याय मिळाला पाहिजे" असं म्हणणारे अनेक जण सोशल मीडियावर दिसतात. पण हेच लोक, एखादी मुलगी समाजाच्या चौकटीतून बाहेर पडून स्वतःचा निर्णय घेते, तेव्हा तिच्यावर बोट ठेवतात, तिच्या कुटुंबियांना दोष देतात. आणि मग अशा एखाद्या दुर्दैवी घटनेनंतर लगेच 'न्याय' मागतात… हीच मोठी शोकांतिका असल्याचं अंकितानं म्हटलं.
पुढे अंकिता म्हणाली, "जेव्हा वैष्णवीनं दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा कुणीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. पण तुम्ही हा विचार केलात का की त्या मुलीला तेव्हा काय वाटलं असेल. जीव द्यायला सुद्धा हिम्मत लागते. मला विचारा! ती हिम्मत जर त्या मुलीमध्ये असेल तर त्या मुलीची चारही बाजूने कोंडी झालेली असते. अनेकांनी म्हटलं की तिनं आत्महत्या करायला नको होती. तिनं समोर येऊन बोलायला हवं होतं. तिच्या वडिलांकडे पैसा होता. पण, जर ती खरचं सर्वासमोर आली असती आणि बोलली असती तर अनेकांनी म्हटलं असतं की, हिनं प्रेम केलं, लग्न केलं, आता हौस भागली. आता तो नको वाटतोय. बाप दुसरा चांगला बघून देईल असं वाटतंय. म्हणून ही नाटकं करतेय. पैसा आहे हो पैसा असलेल्या लोकांच्या पोरी अशाच असतात, या शब्दात अकितानं समाजाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं.
वैष्णवीवर भाष्य करत असताना अंकितानं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, "जेव्हा मी बिग बॉसमध्ये गेले होते, तेव्हा माझ्या भांडी घासण्याचा ट्रॉमायावर बाहेर किती हसलं गेलं, बोललं गेलं, इन्फ्लुएन्सर्संसाठी तर तो एक कंटेन्ट होता. अजूनही त्यावर मला कमेंट्स येतात. एखाद्या मुलीला बाहुलीचा ट्रॉमा असतो. बाहुली बघितली की तिला भीती वाटते. ट्रॉमा म्हणजे काय ? हे तर आता समजून घ्या. एका मुलीला फुगा बघून भीती वाटते. का तर तिला कुणी तरी फुगा दिलेला असतो आणि तिच्यावर अतिप्रसंग झालेला असतो. त्यामुळं तिला फुगा पाहिलं की ते सगळं आठवतं. जर तुम्ही एका बंद बाथरुममध्ये कपडे धुताय आणि कोणी तरी येऊन तुमच्यावर जबरदस्ती केली तर आयुष्यभर कपडे धुताना तुम्हाला त्या गोष्टी आठवतील. त्यामुळं एखाद्या गोष्टीची मस्करी करताना विचार करा", या शब्दात अंकितानं
ट्रोलर्सवर घणाघात केला.