शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग सहकालाकार सोबत बांधली लग्नगाठ, अन् आज करताहेत सुखाने संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:22 PM2023-04-29T12:22:11+5:302023-04-29T12:53:43+5:30

सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे शूटींगदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर पुढे जाऊन त्यांनी लग्न देखील केलं. आणि आजही ते प्रेक्षकांचे लाडके कपल्स बनले आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख - या यादीत पहिलं नाव येतं ते अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख. या गोड कपलविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. (फोटो इन्स्टाग्राम)

तुझे मेरी कसम या चित्रपटातून दोघांनीही सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तर त्यांची केमिस्ट्री दिसलीच. पण याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. तर तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये दोघांनीही लग्न केलं.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी - अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या लोकप्रिय जोडीचं काहीच महिन्यांपूर्वी लग्न झालं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षया आणि हार्दिकची गोड केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. विशेष म्हणजे लीड रोलमध्ये दोघंही पहिल्यांदाच एकत्र झळकले होते. आणि इथूनच त्यांच्या रिअल लाईफ केमिस्ट्रीलाही सुरुवात झाली. (फोटो इन्स्टाग्राम)

एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी अचानक साखरपुडा करत चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला होता. तर २ डिसेंबर २०२२ रोजी दोघांनीही लग्नगाठ बांधली.(फोटो इन्स्टाग्राम)

संकेत पाठक - सुपर्णा श्याम -अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा शाम यांचं नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत. दुहेरी या मालिकेत त्यांची क्युट जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांना दिसली होती. तर पुढे जाऊन ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि आता त्यांचं लग्नही झालंय. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रिया बापट - उमेश कामत - अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत या लाडक्या जोडविषयी फार वेगळं सांगण्याची गरज नाही. दोघेही एकमेकांचे कोस्टार होते. शुभंकरोती ही त्यांची प्रचंड गाजलेली मालिका. तप पुढे जाऊन दोघंही एकमेकांचे अगदी चांगले मित्र बनले. तर त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. 2011 प्रिया आणि उमेशने अगदी धुमधडाक्यात लग्न केलं. (फोटो इन्स्टाग्राम)

निवेदीता - अशोक सराफ - मराठी सिनेविश्वातील काही दशकं लोकप्रिय राहिलेलं कपल म्हणजे निवेदिता जोशी सराफ आणि अशोक सराफ. या दोघांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. आणि या दरम्यानचं निवेदिता आणि अशोक सराफ यांचे सुत जुळले. आणि पुढे जाऊन १९९० साली दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. (फोटो इन्स्टाग्राम)

शरद केळकर - किर्ती गायकवाड - अभिनेता शरद केळकर आणि त्याच्या पत्नीच्या लव्हस्टोरीबद्दल खूपच कमी जणांना माहित आहे. किर्तीसुद्धा हिंदी टिव्ही विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. दोघंही पहिल्यांदा आक्रोश या मालिकेच्या सेटवर भेटले होते. त्यावेळी शरद चित्रपटांमध्ये नाही तर हिंदी मालिकांमध्येच काम करत होता. आणि पुढे जाऊन किर्ती आणि शरद यांनी २००६ मध्ये लग्न केलं. (फोटो इन्स्टाग्राम)

सचिन सुप्रिया - अभिनेते सचिन पिळगावंकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी तर ९० च्या दशकापासून सुपहीट आहे. 1984 साली नवरी मिळे नवऱ्याला या सुपरहिट चित्रपटात दोघंही दिसले होते. तर त्यांची जोडी तुफान हीट ठरली होती. तर याच चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तर १९८५ साली दोघांनीही लग्न केलं.