घटस्फोटाची कोर्टात अंतिम सुनावणी, आदल्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने केलेला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:29 IST2025-05-29T16:14:16+5:302025-05-29T16:29:34+5:30
मलायकाने करीना कपूरच्या शोमध्ये सगळं सांगून टाकलं होतं.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतल्या घटस्फोटांपैकी एक म्हणजे अरबाज खान आणि मलायका अरोराचा घटस्फोट. २०१७ मध्ये दोघांचा १९ वर्षांचा संसार मोडला.
अनेकदा दोघंही घटस्फोटावर बोलले आहेत. पण तुम्हाला माहितीये का घटस्फोटाच्या आदल्या रात्री नक्की काय घडलं होतं? याचा खुलासा खुद्द मलायकानेच केला आहे.
मलायका बेस्ट फ्रेंड करीना कपूरच्या 'व्हॉट वुमेन वाँट'शोमध्ये गेली होती. करीनाने तिला प्रश्न विचारला की घटस्फोटावेळी कुटुंबाकडून आणि मित्रपरिवाराकडून काय सल्ला मिळाला होता?
यावर मलायका म्हणाली होती की, "सगळ्यांनी मला असं करु नको हाच सल्ला दिला होता. कोणीच आपल्याला वेगळं होण्याचा सल्ला देत नाही. त्यामुळे मी जे केलं ते विचारपूर्वक केलं."
ज्या दिवशी घटस्फोटाची कोर्टात सुनावणी होणार होती त्याच्या आदल्या रात्री काय घडलं होतं? मलायका म्हणाली, "त्या रात्री संपूर्ण कुटुंब माझ्यासमोर बसलं होतं. हे नक्की करायचंय का? तू १०० टक्के तुझ्या मतावर ठाम आहेस का? असं मला त्यांनी पुन्हा एकदा विचारलं होतं."
"ते सगळी माझी आपली माणसं आहेत. साहजिकच त्यांना माझी काळजी होती. म्हणूनच ते माझ्याशी पुन्हा एकदा नीट बोलेल. पण मी निर्णयावर ठाम होते."
अरबाज आणि मलायकाची पहिली भेट १९९३ मध्ये एका शूटवेळी झाली होती. नंतर ते एकमेकांना डेट करत होते. १९९८ साली त्यांनी लग्न केलं.
२००२ मध्ये मलायकाने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव अरहान ठेवलं. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज कायमचे वेगळे झाले. ६ वर्षांनी २०२३ मध्ये अरबाज खानने शूरासोबत दुसरं लग्न केलं.