एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:59 IST2025-06-13T15:57:44+5:302025-06-13T15:59:01+5:30

Vir Das Defends Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील काही लोक एअर इंडियाला २४१ प्रवाशांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत आहेत. यादरम्यान कॉमेडियन वीर दास(Veer Das)ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एअर इंडियाला पाठिंबा दर्शवला.

People held Air India responsible for the deaths of 241 people, Vir Das said in support - ''There are shortcomings, but...'' | एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."

एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."

Vir Das Supports Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे (Air India Plane Crash) संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या विमानात २४२ प्रवासी होते, जे लंडनला जात होते. या अपघातातून फक्त १ जण वाचला आहे. बाकी इतर लोकांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघातानंतर सोशल मीडियावरएअर इंडियावर निशाणा साधला जात आहे. लोक एअर इंडियावर टीका करत आहेत. काही लोक एअर इंडियाला २४१ प्रवाशांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत आहेत. यादरम्यान कॉमेडियन वीर दास (Veer Das)ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एअर इंडियाला पाठिंबा दर्शवला.

वीर दासने एक्सवर एक नोट शेअर केली आहे आणि एअर इंडियाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याने एअरलाइनच्या क्रूचं कौतुक केले आणि म्हटले की, या वेळी त्यांचे काम करणे त्यांच्यासाठी किती कठीण आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याने लिहिले, "अनेक कुटुंबांसाठी हा दुःखाचा दिवस आहे. आमच्या सर्व भावना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. मला फक्त क्रूला पाठिंबा द्यायचा आहे."

वीर दासचा एअर इंडियाच्या क्रूला पाठिंबा
वीर दासने पुढे लिहिले की, "मी आयुष्यभर एअर इंडियाने प्रवास केला आहे. ही एक अशी एअरलाइन आहे जिथे समस्या आहेत, पण निःसंशयपणे, मी त्यांना आकाशातील सर्वोत्तम कर्मचारी म्हणून ओळखतो. या दुःखद विमानात काय घडले ते काळच सांगेल. जेव्हा त्यांनी स्वतःचे लोक गमावले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी त्यांचे काम करणे किती कठीण आहे याची मी कल्पनाही करू शकत नाही." वीर दासने पुढे लिहिले, "क्रूसाठी, फक्त एवढेच सांगायचे आहे की आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत आणि आशा आहे की मी लवकरच तुम्हाला फ्लाइटमध्ये भेटेन." 


 बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक 
गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले. सुरुवातीच्या वृत्तानुसार, विमान विमानतळाजवळील लोकवस्तीच्या भागात कोसळले. या अपघातावर शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, अल्लू अर्जुन, समंथा रूथ प्रभु, रश्मिका मंदाना, अनुपम खेर, अक्षय कुमार, सोनू सूद, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि इब्राहिम अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला.

Web Title: People held Air India responsible for the deaths of 241 people, Vir Das said in support - ''There are shortcomings, but...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.