"आम्ही स्वत:ला पॉवर कपल म्हणून...", अनुष्का शर्माने उलगडलेलं यशस्वी नात्याचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:35 IST2025-06-05T16:25:18+5:302025-06-05T16:35:30+5:30
नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलमध्ये आरसीबी संघाने १८ वर्षात पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. नंतर विराट आणि अनुष्काने एकमेकांना मारलेली मिठी आणि त्यांचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले होते. एका मुलाखतीत अनुष्का शर्माने त्यांच्या यशस्वी नात्याचं रहस्य उलगडलं होतं.

"आम्ही स्वत:ला पॉवर कपल म्हणून...", अनुष्का शर्माने उलगडलेलं यशस्वी नात्याचं रहस्य
पॉवर कपल किंवा आवडतं सेलिब्रिटी कपल कोण असं विचारलं तर बहुतेक जण विराट कोहली-अनुष्का शर्माचंच (Virat Kohli-Anushka Sharma) नाव घेतात. त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप्सही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात ते दोघंही जिंकले आहेत. नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलमध्ये आरसीबी संघाने १८ वर्षात पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. नंतर विराट आणि अनुष्काने एकमेकांना मारलेली मिठी आणि त्यांचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले होते. एका मुलाखतीत अनुष्का शर्माने त्यांच्या यशस्वी नात्याचं रहस्य उलगडलं होतं.
फिल्मी कंपॅनियनमध्ये अनुपमा चोप्रा यांनी अनुष्का शर्माला प्रश्न विचारला. तुम्ही दोघंही अशा करिअरमध्ये आहात जे अगदीच अनिश्चित आहे. कधी तुम्ही यशाच्या शिखरावर असाल तर कधी अगदीच खाली असाल. याचा नात्यावर परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही काय करता? तुम्हाला हे कसं जमतं? यावर अनुष्का म्हणाली, "आम्ही जे काम करतो त्याच्याशी आम्ही फार संलग्न राहत नाही. अनेक जण आम्हाला पॉवर कपल म्हणतात पण आम्ही स्वत:ला त्या नजरेने बघतच नाही. जर आम्ही स्वत:ला तसं समजायला लागलो तर मग नातं चुकीच्या दिशेला जाऊ शकतं. आमच्या मनात अशी भावनाच येत नाही. "
आम्ही खूप साधं जगतो
ती पुढे म्हणाली, "जर कोणी आमच्या आयुष्यात डोकावलं तर कळेल की आम्ही अगदीच साधं राहतो. आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्हाला सगळं नॉर्मल, साध्या गोष्टी करायला आवडतात. उलट आम्हाला जी प्रसिद्धी मिळाली आहे त्यामुळे कधीकधी आम्हाला असहज व्हायलाही होतं. हे आम्हा दोघांनाही वाटतं म्हणूनच आम्ही एकमेकांशी इतके छान जोडले गेलो आहे. आम्ही कधी कधी या प्रसिद्धीपासून दूर पळून जातो आणि आमचं वेगळं आयुष्य जगतो. आमचा स्वभाव, आमची मूल्ये एकसारखीच आहेत. आम्ही दोघंही धार्मिक आहोत. आम्ही काम करतो, पुन्हा जातो, वेळ घालवतो आणि परत येतो. हे जमलं पाहिजे."