शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भ्रमाच्या हिंदोळ्यावरचे वर्ष

By admin | Updated: May 10, 2015 05:35 IST

साधारणपणे २0१९ च्या २६ जानेवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महापुतळयाचे अनावरण होईल. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या

कुमार केतकर, (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.) - 

साधारणपणे २0१९ च्या २६ जानेवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महापुतळयाचे अनावरण होईल. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या जगप्रसिद्ध पुतळ्यापेक्षा कित्येक फूट उंच अशा वल्लभभार्ईच्या पुतळ्याच्या अनावरणाने मोदींनी दिलेले निदान एक आश्वासन पुरे होईल अशी आशा त्यांच्या समर्थक-भक्तांना वाटते. या पुतळ्याला जगतील सर्वात उंच वास्तू म्हणून ओळखले जाईल असे खुद्द मोदींनी म्हटले आहे. (एव्हरेस्ट शिखरापेक्षा त्याची उंची कमी ठेवली आहे)लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो (एलअँडटी) या कंपनीने आजपर्यंत मोठाले पूल, धरणे, कारखाने, इमारती बांधल्या आहेत. त्यांनी एकही पुतळा कुठेही उभारलेला नाही. तरीही या कंपनीला वल्लभभार्इंचा हा अजस्त्र पुतळा उभारायचे कंत्राट कसे मिळाले असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर सोपे आहे : मुंबईतील त्यांच्या मोठ्या कारखान्यातील सुमारे पाच हजार कामगारांना देशोधडीला लावून कंपनीने त्यांची काही युनिट्स गुजरातला हलवली. ‘महाराष्ट्राचा ऱ्हास हाच गुजरातचा विकास’ अशी अघोषित व्याख्या मोेदींनी बहुधा केली असावी. म्हणूनच कारखान्यातील मराठी कामगारांना बेकारीच्या खाईत लोटल्याबद्दल एलअँडटी कंपनीचे चेअरमन ए. एन. नाईक यांना मोदी सरकारने ‘गुजरात भूषण’ असा पुरस्कार दिला होता. आता नौदलाचे काही प्रकल्प, रेल्वेचा काही वर्कशॉप, डायमंड मार्केट इत्यादी बरेच उद्योगधंदे-व्यापार मुंबईतून गुजरातला हलविले जात आहेत यावरूनही ‘महाराष्ट्राचा ऱ्हास’च खऱ्या अर्थाने गुजरातचा विकास घडवील या मोदींच्या विश्वासात तथ्य असावे, असे दिसते. नाहीतर मुंबई ते अहमदाबाद अशी एक लाख कोटी रूपये खर्च करून बुलेट ट्रेन सुरू करण्याचा घाट घालण्याचे काय कारण होते? (अजून तरी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेस यापैकी कुणीही एलअँडटीच्या बेदरकार कामगारविरोधी धोरणाबद्दल निषेधसुद्धा केलेला नाही, यावरून गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्राने त्याग करायला पाहिजे हा मुद्दा तमाम मराठी नेतृत्वाला मान्य झालेला दिसतो!)या पुतळयासाठी एलअँडटी कंपनीला तीन हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या हिशेबानुसार एकूण खर्च किमान पाच हजार कोटी रूपये होईल. ‘मांगल्यम’ या भारताच्या मंगळावरील स्वारीचा खर्च फक्त ४५0 कोटी रूपये होता. म्हणजेच पाच मंगळस्वाऱ्यांइतका खर्च या पुतळ्यावर होणार आहे. इतक्या पैशात महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त होऊ शकला असता! असो. तेव्हा मोदींचे बाकी यश काय असेल ते असो पण ‘मोेडेन पण वाकणार नाही’ असा बाणा असल्याचे सांगणाऱ्या मराठी अस्मितेला त्यांनी वाकवले तर आहेच, पण शिवाय मोडूनही टाकले आहे! गुजरातची लोकसंख्या सहा कोटी. महाराष्ट्राची सुमारे १२ कोटी म्हणजे दुप्पट. महाराष्ट्राचे एकल उत्पन्न गुजरातपेक्षा अधिक. महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची व्यापारी व औद्योगिक राजधानी मुंबई. पण मुंबईच्या शेअर बाजारावर बरेचसे नियंत्रण गुजराथी दलालांचे. बहुसंख्य कामगार मराठी, पण मालक वर्ग मात्र गुजराती आणि मारवाडी. (मुंबईतील ज्या कापडगिरण्या पूर्णपणे देशोधडीला लागल्या त्या सर्व गुजराती-मारवाडी मालकांच्या होत्या. पण त्यातील अडीच लाख कामगार प्रचंड बहुसंख्येने मराठी होते) संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात मुंबईला ‘द्विभाषिक’ करायची योजना मोरारजीभाई देसार्इंनी काढली ती याच तत्वावर-जरी प्रत्यक्षात सुमारे ५0 टक्यांच्या आसपास मराठी लोक होते आणि गुजराती फक्त १0 ते १२ टक्के. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर सहा वर्षांनी शिवसेनेचा जन्म झाला. पण मराठी उद्योजकांची, मराठी उद्योगांची, मराठी व्यापाऱ्यांची इतकेच काय मराठी आर्ट गॅलरीज, मराठी उच्च/विशेष शिक्षण देणाऱ्या संस्था, मराठी थिएटर्स वगैरे बाबीतही मराठी बाणा दिसला नाही. इतकेच नव्हे तर प्रथम राज ठाकरे आणि नंतर शिवसेनेने नरेंद्र मोदींचा जप सुरू केला आणि आकाराने, लोकसंख्येने कला-संस्कृतीने पुढे असलेला मराठी माणूस अगदी अधिकृतपणे मोदींपुढे लाचार असल्याचे दिसू लागले. नरेंद्र मोदींनी हे यश एका वर्षात शिक्कामोर्तब करून घेतले आहे. त्यामुळे मोदींनी बाकी देशात काय केले याचा लेखाजोखा मांडताना मराठी माणसाला गुजराती खुंटीवर टांगले ही त्यांची कामगिरी लक्षणीयच म्हणावी लागेल!‘मांगल्यम’ मंगळावर पोहचले ते मोदी पंतप्रधान झाल्यावर काही महिन्यात. मग मोदींनी जगभर डंका पिटला की भारत मंगळावर पोचला तो त्याच्या वैज्ञानिक कार्यक्षमतेमुळे. प्रत्यक्षात तो सर्व ‘मंगळप्रकल्प’ डॉ. मनमोहनसिंग यांनी अगदी जातीने लक्ष घालून पूर्ण केल्यावरच निवडणुका घ्यायच्या होत्या. मग मोदी म्हणाले की, ‘मी सर्वात भाग्यवान आणि दणदणीत नशीब घेऊन पंतप्रधान झालो आहे.’ परंतु या नशीबवान पंतप्रधानांना भयंकर दुष्काळ, गारपीट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि भूकंप या गोष्टींना रोखता आले नाही. मोदींचे नशीब इतकेच की ते स्वत: पंतप्रधान झाले. पण देशाचे नशीब अजून तरी खुललेले दिसत नाही. मोदींचे शेअरबाजारातील गुजराती दलाल म्हणत होते की वर्षभरात सेन्सेक्स ५0 हजार पर्यंत पोचेल. प्रत्यक्षात तो २५ ते ३0 हजारांच्या आतच राहिला आहे. मोदींनी पी. सी. सरकार यांच्या जगप्रसिद्ध भारतीय जादुगारालाही लाजवील असा दिमाखदार सोहळा दिल्लीत केला होता. ‘मेक इन इंडिया’ या आवाहनानिमित्त केलेल्या या सोहळयानंतर कोणताही मोठा उद्योग भारतात आला नाही वा नव्याने रोजगार उपलब्ध झालेला नाही. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)