शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

ही माध्यमे कोणाची ?

By admin | Updated: August 13, 2015 21:53 IST

संसदेचे काम ठप्प ठेवल्याबद्दल देशातील अनेक (व बहुदा भाजपाधार्जिण्या) माध्यमांनी काँग्रेसला दोषी धरले आहे.

संसदेचे काम ठप्प ठेवल्याबद्दल देशातील अनेक (व बहुदा भाजपाधार्जिण्या) माध्यमांनी काँग्रेसला दोषी धरले आहे. मात्र तो पक्ष ज्या मागण्यांसाठी त्याचे आंदोलन चालवीत होता त्याविषयी त्या साऱ्यांनी गप्प राहणेच पसंत केले आहे. काँग्रेसच्या संसदेतील आंदोलनापासून मुलायमसिंहांनी अखेरच्या काळात फारकत घेतली असली तरी आरंभापासून आठ प्रमुख पक्ष त्याच्यासोबत होते याकडेही या माध्यमांनी पाहून न पाहिल्यासारखे केले आहे. एरव्ही स्वत:च्या स्वातंत्र्याची व नि:पक्षपातीपणाची ग्वाही देणारी ही माध्यमे सरकारधार्जिणीच नव्हे तर मोदीधार्जिणी कशी आहेत हे सांगायला वेगळ््या पुराव्याची गरज नाही. दूरचित्रवाहिनीची कोणतीही वृत्तवाहिनी पाहिली तरी तिचा असा प्रत्यय येणारा आहे. केवळ पक्षपाती भूमिका घेऊन व सत्ताधाऱ्यांना जास्तीची प्रसिद्धी देऊनच ही माध्यमे थांबली नाहीत. विरोधी पक्षांविषयीची कमालीची उपरोधिक भाषा व निराधार वृत्तेही त्यांनी या काळात देशाला दाखविली. सुषमा स्वराज यांचे भाषण पूर्णत्वानिशी देणाऱ्या या माध्यमांनी त्याच्या खऱ्या वा खोट्या प्रतिपादनाची चर्चा करणे टाळले. ‘ललित मोदीला इंग्लंडबाहेर जाऊ देण्याचा भारताच्या भूमिकेवर कोणताही परिणाम होणार नाही वा भारत तसे करण्यावर आक्षेप घेणार नाही’ हे सुषमा स्वराज यांनी इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाला सांगणे याचा अर्थ त्यांनी ललित मोदीला मोकळे ठेवण्यास बिनशर्त परवानगी दिली असाच होत नाही काय? अखेर आम्ही परवानगी देतो असे म्हणणे किंवा परवानगी नाकारत नाही असे सांगणे यात कोणता फरक असतो? सुषमाबाईंनी या ललित मोदीशी असलेले आपले कौटुंबिक संबंधही अखेरपर्यंत दडवून ठेवले. त्यांचे पती व कन्या या दोघांनीही वकील या नात्याने ललित मोदीला तुरूंगाबाहेर ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आपले सगळे कायदेपांडित्य पणाला लावले व त्याचा मोबदलाही घेतला हे त्यांनी कधी बोलून दाखविले नाही. संसदेचा सारा भर सुषमाबाईंवर राहिला म्हणून माध्यमांनी वसुंधराराजे, त्यांचे चिरंजीव दुष्यंत आणि शिवराजसिंह चौहान यांच्याकडेही दुर्लक्ष केल्यासारखे दाखवून त्यांचा बचाव केलाच की नाही? काँग्रेस पक्ष या तिघांच्या चौकशीची व ती पूर्ण होईपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो एवढ्यावरच त्याला धारेवर धरणाऱ्या माध्यमांनी त्या तिघांनी सत्तेच्या बळावर जे दिवे लावले त्याची दखल कधी घ्यायची की नाही? डॉ. मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळातील दोषी मंत्र्यांचे राजीनामे मागताना तेव्हाच्या विरोधी पक्षांएवढीच ही माध्यमे आघाडीवर होती की नाही? की त्यांना आपल्या तेव्हाच्या भूमिकेचा अवघ्या एक वर्षातच विसर पडला? आपण कोणालाही सोडणार नाही आणि सत्ता कितीही मोठी असली तरी तिला जबाबदार धरल्याखेरीज राहणार नाही अशी शेखी आकांताने मिरविणारी माध्यमातील माणसे आताच्या सत्ताधाऱ्यांसमोर नांग्या टाकतानाच देशाला दिसली आहेत आणि त्यांच्यातल्या त्या परिवर्तनाचे कारण त्यांची मालकी मोदी सरकारच्या मित्रांच्या हाती आली हेच आहे की नाही? संसद चालू द्या अशी विनंती विरोधी पक्षांना करणारे जे निवेदन सत्तारुढ पक्षाने परवा तयार केले त्यावर देशातील उद्योगपतींनीच तेवढ्या सह्या केल्या याचा अर्थही साऱ्यांनी नीट लक्षात घ्यावा असा आहे. एरव्ही आपल्या हस्तीदंती मनोऱ्यात आरामात राहणारी ही ऐषारामी माणसे एका राजकीय निवेदनावर आपले नाव टाकायला याआधी अशी कधी उत्सुक दिसली काय? सामान्य माणसांच्या निवेदनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या माध्यमांनीदेखील या निवेदनाला दिलेल्या अतिरिक्त प्रसिद्धीचे कारण कोणते ? आम्ही देशाला खोटे तेवढेच सांगू, सरकारला पचेल तेवढेच बोलू वा दाखवू आणि विरोधी पक्षांना जमेल तेवढे बदनाम करीत राहू हा या माध्यमांनी घेतलेला वसा कधीचा आहे आणि त्यांना तो कोणी दिला आहे? सारा वेळ स्वत:च बोलून इतरांना बोलू न देणारे दूरचित्रवाहिनीवरचे अँकरमनही या आक्रस्ताळेपणाला अपवाद राहिले नाहीत हे विशेष होय. आणि आता तर खुद्द लोकसभेच्या सभापतींनीच साऱ्या दोषाचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा एकाकीपणा केला आहे. इतिहासात कधीकाळी भारतीय माध्यमांवर डाव्या विचारसरणीच्या लोकांचा प्रभाव होता असे म्हटले जाते. आताचा त्यांच्यावरील प्रभाव नुसता उजवाच नाही तर भगवा आहे. संघाच्या प्रवक्त्यांना दिला जाणारा वेळ आणि इतरांची माध्यमांवर होणारी गळचेपी देशाला दिसत नाही या भ्रमात या वाहिन्यांच्या चालकांनीही राहण्याचे कारण नाही. अखेर या माध्यमांचे जनमानसावरील वजन व परिणामकारकता त्यांच्या प्रचारी असण्यावर अवलंबून राहत नसून त्यांच्या खरेपणावर आधारलेली असते हे त्यांनीही लक्षात घेतले पाहिजे. अनेक वाहिन्यांचा जनतेतील उतरलेला भाव याच दारूण वास्तवाची साक्ष देणारा आहे. मात्र जनतेच्या विश्वासाहून आपल्या सूत्रसंचालकांची व मालकांची चाकरीच ज्यांना महत्त्वाची वाटते त्यांच्याकडून फारशा सच्चाईची अपेक्षा करण्यात अर्थही नसतो. प्रश्न प्रसिद्धीमाध्यमांच्या विश्वासार्हतेचा वा सच्चाईचा नाही. या माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात आणि इतर स्तंभांवरचा जनतेचा विश्वास डळमळीत होतो तेव्हा तिला या स्तंभाची विश्वसनीयताच जास्तीची महत्त्वाची वाटते हे येथे लक्षात घ्यायचे.