शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘भवितव्या’चे काय?

By admin | Updated: February 8, 2016 03:36 IST

‘ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे, याची आघाडी सरकारला पुरेपूर जाण आहे, म्हणूनच ‘तीन वर्षांचा कालावधी द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवू’ असे आश्वासन समस्त

‘ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे, याची आघाडी सरकारला पुरेपूर जाण आहे, म्हणूनच ‘तीन वर्षांचा कालावधी द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवू’ असे आश्वासन समस्त शिक्षकवर्गाला देऊन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी टाळ्या जरूर मिळविल्या असतील. अधिवेशन, आंदोलनांप्रसंगी अशी वाक्ये वापरण्याचा जणू प्रघातच पडला आहे. परंतु आजही राज्याच्या अनेक भागात बहुतांशी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. त्याबाबत सरकारला जाण आहे की नाही हा आजघडीचा ज्वलंत आणि तितकाच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद दि. ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत नवी मुंबईजवळील ऐरोली येथे पार पडली. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना दि. १ ते ६ फेबु्रवारी या सहा दिवसांच्या कालावधीसाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केल्यामुळे काही शाळांमध्ये एक ते दोन शिक्षक हजर तर काही शाळांना चक्क टाळे लावण्यात आले होते. अधिवेशनाच्या नावाखाली जर एकेक आठवडा विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होणार असेल तर केवळ शिक्षकांच्या समस्या सोडविणे गरजेचे नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार शाळा सोडून अधिवेशनाला जाणाऱ्या व नवीन पिढी घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या घटकांवर आहे त्यांच्या मनात आणि त्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणाऱ्या शासनाच्या मनातही उपस्थित व्हायला हवा. एकीकडे पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याच्या धोरणावर विचारविनिमय सुरू असताना, विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना शिक्षकांचीच पटसंख्या घटत असेल तर तक्रार कोणाकडे करायची? शिक्षणमंत्री महोदयांनी आगामी काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल नक्कीच घडवावेत, पण ते करताना वर्गातील शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.