शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

‘भवितव्या’चे काय?

By admin | Updated: February 8, 2016 03:36 IST

‘ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे, याची आघाडी सरकारला पुरेपूर जाण आहे, म्हणूनच ‘तीन वर्षांचा कालावधी द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवू’ असे आश्वासन समस्त

‘ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे, याची आघाडी सरकारला पुरेपूर जाण आहे, म्हणूनच ‘तीन वर्षांचा कालावधी द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवू’ असे आश्वासन समस्त शिक्षकवर्गाला देऊन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी टाळ्या जरूर मिळविल्या असतील. अधिवेशन, आंदोलनांप्रसंगी अशी वाक्ये वापरण्याचा जणू प्रघातच पडला आहे. परंतु आजही राज्याच्या अनेक भागात बहुतांशी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. त्याबाबत सरकारला जाण आहे की नाही हा आजघडीचा ज्वलंत आणि तितकाच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद दि. ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत नवी मुंबईजवळील ऐरोली येथे पार पडली. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना दि. १ ते ६ फेबु्रवारी या सहा दिवसांच्या कालावधीसाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केल्यामुळे काही शाळांमध्ये एक ते दोन शिक्षक हजर तर काही शाळांना चक्क टाळे लावण्यात आले होते. अधिवेशनाच्या नावाखाली जर एकेक आठवडा विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होणार असेल तर केवळ शिक्षकांच्या समस्या सोडविणे गरजेचे नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार शाळा सोडून अधिवेशनाला जाणाऱ्या व नवीन पिढी घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या घटकांवर आहे त्यांच्या मनात आणि त्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणाऱ्या शासनाच्या मनातही उपस्थित व्हायला हवा. एकीकडे पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याच्या धोरणावर विचारविनिमय सुरू असताना, विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना शिक्षकांचीच पटसंख्या घटत असेल तर तक्रार कोणाकडे करायची? शिक्षणमंत्री महोदयांनी आगामी काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल नक्कीच घडवावेत, पण ते करताना वर्गातील शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.