शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आपलाही डायनासोर

By admin | Updated: July 23, 2015 23:17 IST

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तपमानातील वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू असते.

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तपमानातील वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू असते. संशोधनांती काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा समावेश असलेले अहवालही नियमितपणे प्रकाशात येत असतात. असाच एक अहवाल नुकताच सार्वजनिक झाला आहे. ब्रिटनच्या विदेश व राष्ट्रकुल कार्यालयाद्वारा गठित करण्यात आलेल्या शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या एका गटाने, वातावरणातील बदलांमुळे संभवणाऱ्या धोक्यांबाबत स्वतंत्र अभ्यास केला. या गटाने दिलेला एक इशारा भारतासंदर्भातील आहे. गटाच्या अहवालात म्हटले आहे, की जागतिक सरासरी तपमानात एक अंश सेल्सिअसने जरी वाढ झाली तरी, उत्तर भारतातील लोकाना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घराबाहेर पडून कोणत्याही प्रकारचे स्पर्धात्मक काम करता येणे अशक्य होण्याची ४० टक्के शक्यता आहे. जागतिक सरासरी तपमान चार अंश सेल्सिअसने वाढले, तर घराबाहेर अगदी साध्या स्वरूपाची कामे करणेही अशक्यप्राय होऊन बसण्याची शक्यता ३० टक्के असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याशिवाय हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी न झाल्यास, गंगेच्या खोऱ्यातील जागतिक सरासरी तपमानात वाढ होत आहे, ही वस्तुस्थिती आहे; मात्र त्यामागच्या कारणांबाबत शास्त्रज्ञांमध्येच दोन गट पडले आहेत. जागतिक तपमानवाढीसाठी केवळ मनुष्य प्राण्याचे नसते उद्योगच कारणीभूत नसल्याचे मानणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटानुसार, जागतिक तपमानवाढीचे सारे खापर केवळ मनुष्य प्राण्यावरच फोडणारा गट, त्यांच्या अभ्यासातील निष्कर्ष खूप फुगवून भीतीदायक वातावरण तयार करतो. ताज्या अहवालातील एक अंश तपमानवाढीबाबतचा इशारा कदाचित त्याच पठडीतला म्हणता येईल. आयपीसीसीच्या अहवालानुसार, १८८० ते २०१२ या १३२ वर्षांच्या कालखंडात जागतिक सरासरी तपमानात ०.८५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. म्हणजेच तपमानात एक अंशाने वाढ होण्याचा धोका काही आगामी काही वर्षातच संभवत नाही, तर त्यासाठी एखाद्या शतकाचाही कालावधी लागू शकतो आणि चार अंश वाढ ही तर खूपच दूरची गोष्ट भासते. दुर्दैवाने प्रसारमाध्यमेही अशा अहवालांच्या बातम्या देताना पुरेशी माहिती व आवश्यक ते संदर्भ देण्याची तसदी घेत नाहीत. जागतिक तपमानवाढ हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय असून या जागतिक संकटावर मात करण्यात यश येऊ शकेल. पण तारतम्य न बाळगल्यास मात्र भविष्यात कधी तरी मानव जातीच्या वाट्यालाही डायनासोरसारखा उच्चाटनाचा धोका येऊ शकतो.