शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आपलाही डायनासोर

By admin | Updated: July 23, 2015 23:17 IST

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तपमानातील वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू असते.

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तपमानातील वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू असते. संशोधनांती काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा समावेश असलेले अहवालही नियमितपणे प्रकाशात येत असतात. असाच एक अहवाल नुकताच सार्वजनिक झाला आहे. ब्रिटनच्या विदेश व राष्ट्रकुल कार्यालयाद्वारा गठित करण्यात आलेल्या शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या एका गटाने, वातावरणातील बदलांमुळे संभवणाऱ्या धोक्यांबाबत स्वतंत्र अभ्यास केला. या गटाने दिलेला एक इशारा भारतासंदर्भातील आहे. गटाच्या अहवालात म्हटले आहे, की जागतिक सरासरी तपमानात एक अंश सेल्सिअसने जरी वाढ झाली तरी, उत्तर भारतातील लोकाना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घराबाहेर पडून कोणत्याही प्रकारचे स्पर्धात्मक काम करता येणे अशक्य होण्याची ४० टक्के शक्यता आहे. जागतिक सरासरी तपमान चार अंश सेल्सिअसने वाढले, तर घराबाहेर अगदी साध्या स्वरूपाची कामे करणेही अशक्यप्राय होऊन बसण्याची शक्यता ३० टक्के असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याशिवाय हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी न झाल्यास, गंगेच्या खोऱ्यातील जागतिक सरासरी तपमानात वाढ होत आहे, ही वस्तुस्थिती आहे; मात्र त्यामागच्या कारणांबाबत शास्त्रज्ञांमध्येच दोन गट पडले आहेत. जागतिक तपमानवाढीसाठी केवळ मनुष्य प्राण्याचे नसते उद्योगच कारणीभूत नसल्याचे मानणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटानुसार, जागतिक तपमानवाढीचे सारे खापर केवळ मनुष्य प्राण्यावरच फोडणारा गट, त्यांच्या अभ्यासातील निष्कर्ष खूप फुगवून भीतीदायक वातावरण तयार करतो. ताज्या अहवालातील एक अंश तपमानवाढीबाबतचा इशारा कदाचित त्याच पठडीतला म्हणता येईल. आयपीसीसीच्या अहवालानुसार, १८८० ते २०१२ या १३२ वर्षांच्या कालखंडात जागतिक सरासरी तपमानात ०.८५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. म्हणजेच तपमानात एक अंशाने वाढ होण्याचा धोका काही आगामी काही वर्षातच संभवत नाही, तर त्यासाठी एखाद्या शतकाचाही कालावधी लागू शकतो आणि चार अंश वाढ ही तर खूपच दूरची गोष्ट भासते. दुर्दैवाने प्रसारमाध्यमेही अशा अहवालांच्या बातम्या देताना पुरेशी माहिती व आवश्यक ते संदर्भ देण्याची तसदी घेत नाहीत. जागतिक तपमानवाढ हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय असून या जागतिक संकटावर मात करण्यात यश येऊ शकेल. पण तारतम्य न बाळगल्यास मात्र भविष्यात कधी तरी मानव जातीच्या वाट्यालाही डायनासोरसारखा उच्चाटनाचा धोका येऊ शकतो.