शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
8
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
9
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
10
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
11
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
12
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
13
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
14
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
15
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
16
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
17
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
18
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
19
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
20
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले

शिर्डीतील जलक्रांती

By admin | Updated: June 11, 2016 04:43 IST

नेत्यांनी सांगितले तर गावे कामाला लागतात व लोकसहभाग मिळू शकतो याची उदाहरणे नगर जिल्ह्यात वारंवार दिसली आहेत.

नेत्यांनी सांगितले तर गावे कामाला लागतात व लोकसहभाग मिळू शकतो याची उदाहरणे नगर जिल्ह्यात वारंवार दिसली आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेले ‘जलक्रांती’व ‘वनक्रांती’ अभियान ही त्याचीच साक्ष आहे.सरकार योजना आखेल व राबवेल. पण लोकसहभाग व योजनांतील राजकीय सहभागाचे काय, हा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. जलयुक्त शिवार अभियानात सरकारला लोकसहभाग अपेक्षित होता. परंतु राज्यात दुष्काळ असतानाही अनेक ठिकाणी तो मिळाला नाही. किंबहुना स्थानिक आमदार-खासदार व राजकीय कार्यकर्त्यांनीही त्याबाबत फारसा पुढाकार घेतलेला दिसत नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांनी राबविलेले ‘जलक्रांती’ अभियान लक्षवेधी ठरले आहे. डॉ. सुजय यांनी सरकारच्या ‘जलयुक्त’ ऐवजी आपले स्वत:चे ‘जलक्रांती’ अभियान राबविले. योजनेचे नामकरण वेगळे असले तरी जलसंधारणाची कामे हाच योजनेचा मुख्य उद्देश दिसतो. या अभियानात त्यांनी मतदारसंघातील गावांना लोकसहभागाचे आवाहन केले. गावे जेवढा निधी जमा करतील तेवढाच निधी आपले ‘जनसेवा फाऊंडेशन’ टाकेल व जलसंधारणाची कामे करेल, असे त्यांच्या मोहिमेचे सूत्र होते. या सूत्रानुसार आजवर विविध गावांत ६० लाख रुपयांची कामे करण्यात आली आहेत. सरकारी मूल्यमापनानुसार ही कामे दोन कोटींच्या घरात जातील. यामध्ये गावातील बंधारे, तळे, चाऱ्या यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले गेले. कोणत्या बंधाऱ्यांचे खोलीकरण करायचे याचा निर्णय गावांनीच घेतला. या वर्षी साईबाबांच्या शिर्डी नगरीतही पाणीटंचाई आहे. शिर्डीतील बहुतांश रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाल्याने जमिनीत पाणी मुरणेच बंद झाले आहे. त्यामुळे शिर्डीतील बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. या अभियानात शिर्डीतील तीन तळ्यांतील गाळ काढण्यात आला. त्यामुळे शिर्डीचा पाणीप्रश्न मिटण्यास हातभार लागणार आहे. पावसाळा सुरु झाल्यावर ‘वनक्रांती’ हा या अभियानाचा पुढील टप्पा आहे. यामध्ये विखे पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी पाच झाडे देणार आहेत. या झाडांचे रोपण व त्यांचे जतन करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. या सर्व कामांचा विखे यांना राजकीय फायदा मिळेल, परंतु अंतिमत: गावांचा व निसर्गाचा त्यात मोठा फायदा आहे. सरकारी मदतीशिवाय जलसंवर्धनाची चळवळ पुढे जात असेल तर त्याला विशेष महत्त्व आहे. आमदार-खासदार हे त्यांना मिळणारा स्थानिक विकास निधी जलसंधारणाच्या कामांवर किती खर्च करतात, याची पाहाणी ‘लोकमत’ने २०१२-१३ या वर्षात केली होती. राज्यातील आमदारांनी आपला ४८.५७ टक्के निधी रस्त्यांवर, २५.२२ टक्के निधी सभामंडपांवर तर अवघा १.८८ टक्के निधी जलसंधारणाच्या कामांवर खर्च केल्याचे त्यावेळी निदर्शनास आले. हे प्रमाण आजही बदलले असण्याची शक्यता कमी आहे. दुष्काळ निवारण हा महत्त्वाचा मुद्दा असतानाही जलसंधारण हा विषय लोकप्रतिनिधी व राजकीय संघटनांच्या अजेंड्यावर दिसत नाही. नगर जिल्ह्यात यापूर्वी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून ३३२ नाले, बंधाऱ्यांचे खोलीकरण केले होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनीही उजाड डोंगरांवर झाडे लावण्यासाठी ‘दंडकारण्य अभियान’ राबविले. नगर तालुक्यात सारोळा कासार या छोट्या गावाने सरकारी मदतीशिवाय नऊ किलोमीटरची नदी जिवंत केली आहे. नेत्यांनी सांगितले तर गावे कामाला लागतात व लोकसहभाग वाढतो. पण, नेतेच अंग झटकायला तयार नाहीत. आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावांतही जलयुक्त अभियान राबले नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. यात दोष जनतेला द्यायचा की लोकप्रतिनिधींना? मुख्यमंत्र्यांनी या दत्तक गावांचा एकदा आढावा घेतला तर वास्तव समोर येईल. - सुधीर लंके