शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

विद्यापीठ बनले आखाडा

By admin | Updated: October 7, 2015 05:14 IST

विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता

- सुधीर महाजनविद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता कामाची संस्कृतीच उरलेली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षण सोडून सर्वच आघाड्यांवर पुढे दिसते. येथे खुशमस्कऱ्यांची गर्दी झाली आहे. जातीयवादाचा जोर वाढत आहे. गटातटाच्या राजकारणाचे सर्कशीचे खेळ आहेत. खेकड्यांची पाय ओढण्याची शर्यत आहे. दबावाचे राजकारण आहे. नाही फक्त शिक्षण.गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ ने विद्यापीठात एक स्टिंग आॅपरेशन केले. त्यात एक धक्कादायक बाब पुढे आली. येथे बहुतांश वर्गात शिकविलेच जात नाही. विद्यार्थी दिवसभर वाट पाहतात आणि प्राध्यापक तास घेत नाहीत. हे भयानक वास्तव आहे. ते बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातील, ज्यांनी मराठवाड्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व जे केवळ राजकारणी, घटनातज्ज्ञ नव्हते तर खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत होते. कोणत्याही संस्थेचा प्रमुख हा तिचा कणा असतो. त्याची धडाडी आणि दूरदृष्टी संस्थेला पुढे नेते. परंतु, विद्यापीठातील जातीय आणि गटातटाच्या राजकारणाने या प्रमुखाला निष्प्रभ करून टाकले आहे. विद्यापीठातील विविध संघटना त्याना आपल्या तालावर नाचवतांना दिसतात. सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी बदललेला दिसतो. यातूनच त्यांचा प्रशासकीय वकुबही दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर व्यवस्थापन सभेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सदस्यांचा परदेश दौरा. विद्यापीठाच्या खर्चाने हे सदस्य परदेश दौऱ्यावर निघण्याचे जाहीर होताच त्यावर टीका झाली. त्यावेळी कुलगुरू चोपडेंनी इन्कार करीत ही मंडळी स्वखर्चाने जाणार अशी घोषणा केली. पुढे हे सदस्य केटरींग अभ्यासक्रमाच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार अशी मखलाशीही केली. सदस्य दौऱ्यावर गेले. त्यांच्यासाठी विद्यापीठाने १४ लाख रूपये खर्च केले. याबाबत आता काहीही बोलण्यास कुलगुरू तयार नाहीत. खरे तर कुलगुरूंच्याच परेदश दौऱ्यांचा हिशोब मागण्याची वेळ आली आहे. कुलगुरू चोपडेंची घोषणाबाजी प्रारंभीच दिसली. वर्षभरापूर्वी त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हां, संशोधन प्रकल्प, शिष्यवृत्ती आदींसाठी एक हजार कोटीचा निधी मिळविणार अशी घोषणा केली होती. हा निधी उद्योग जगताकडून उभारण्याचा मानस होता. त्याचा साधा प्रस्तावही अजून तयार नाही. घोषणाही हवेतच विरली. विद्यापीठाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने २५ लाखांचा पुरस्कार जाहीर करणे अशा घोषणा एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरुऐवजी राजकारण्याच्या वाटतात. विद्यार्थ्यांना पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी अशा बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. गेल्या वर्षभरात विद्यापीठात एकही मोठी व्यक्ती आली नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी येणार होत्या. पण त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. कर्मचारी संघटनांच्या दबावाला बळी पडताना कुलगुरू अनेक वेळा दिसतात.कृष्णा भोगे विभागीय आयुक्त असताना काही काळ कुलगुरूपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांच्या शिस्तीच्या बडग्याने एकदाही आंदोलन झाले नाही. पण आज कुलसचिवांना जाहीर शिवीगाळ होते तरी विद्यापीठ आणि कुलगुरू बघ्याची भूमिका घेताना दिसतात. विद्यापीठास उज्ज्वल अशी शैक्षणिक परंपरा आहे. डॉ.वा.ल.कुलकर्णी, डॉ. जी.एस.अमूर, डॉ.आर.पी. कुरूळकर, भालचंद्र नेमाडे, गंगाधर पानतावणे, यू.म.पठाण, मोईन शाकीर, सुधाताई काळदाते, डी.बी. पाचपट्टे, आनंद कर्वे अशा प्राध्यापकांनी हे विद्यापीठ गाजविले. ही माणसे म्हणजे वैभव होते. त्याच विद्यापीठात आज शिकविले जात नाही. आधीच दुष्काळ त्यात पोटाला चिमटा देत येथील पालक मुलांना उच्चशिक्षणासाठी पाठवतात. सहाव्या वेतन आयोगानुसार रीडरने आठवड्यातून १६, सहयोगी प्राध्यापकाने १४ तर विभागप्रमुखाने १२ तास घेतले पाहिजे. विद्यापीठात असे प्रामाणिक काम करणारे किती प्राध्यापक आहेत? विद्यापीठात कामाची संस्कृती उरली नाही.