शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ बनले आखाडा

By admin | Updated: October 7, 2015 05:14 IST

विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता

- सुधीर महाजनविद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता कामाची संस्कृतीच उरलेली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षण सोडून सर्वच आघाड्यांवर पुढे दिसते. येथे खुशमस्कऱ्यांची गर्दी झाली आहे. जातीयवादाचा जोर वाढत आहे. गटातटाच्या राजकारणाचे सर्कशीचे खेळ आहेत. खेकड्यांची पाय ओढण्याची शर्यत आहे. दबावाचे राजकारण आहे. नाही फक्त शिक्षण.गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ ने विद्यापीठात एक स्टिंग आॅपरेशन केले. त्यात एक धक्कादायक बाब पुढे आली. येथे बहुतांश वर्गात शिकविलेच जात नाही. विद्यार्थी दिवसभर वाट पाहतात आणि प्राध्यापक तास घेत नाहीत. हे भयानक वास्तव आहे. ते बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातील, ज्यांनी मराठवाड्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व जे केवळ राजकारणी, घटनातज्ज्ञ नव्हते तर खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत होते. कोणत्याही संस्थेचा प्रमुख हा तिचा कणा असतो. त्याची धडाडी आणि दूरदृष्टी संस्थेला पुढे नेते. परंतु, विद्यापीठातील जातीय आणि गटातटाच्या राजकारणाने या प्रमुखाला निष्प्रभ करून टाकले आहे. विद्यापीठातील विविध संघटना त्याना आपल्या तालावर नाचवतांना दिसतात. सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी बदललेला दिसतो. यातूनच त्यांचा प्रशासकीय वकुबही दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर व्यवस्थापन सभेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सदस्यांचा परदेश दौरा. विद्यापीठाच्या खर्चाने हे सदस्य परदेश दौऱ्यावर निघण्याचे जाहीर होताच त्यावर टीका झाली. त्यावेळी कुलगुरू चोपडेंनी इन्कार करीत ही मंडळी स्वखर्चाने जाणार अशी घोषणा केली. पुढे हे सदस्य केटरींग अभ्यासक्रमाच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार अशी मखलाशीही केली. सदस्य दौऱ्यावर गेले. त्यांच्यासाठी विद्यापीठाने १४ लाख रूपये खर्च केले. याबाबत आता काहीही बोलण्यास कुलगुरू तयार नाहीत. खरे तर कुलगुरूंच्याच परेदश दौऱ्यांचा हिशोब मागण्याची वेळ आली आहे. कुलगुरू चोपडेंची घोषणाबाजी प्रारंभीच दिसली. वर्षभरापूर्वी त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हां, संशोधन प्रकल्प, शिष्यवृत्ती आदींसाठी एक हजार कोटीचा निधी मिळविणार अशी घोषणा केली होती. हा निधी उद्योग जगताकडून उभारण्याचा मानस होता. त्याचा साधा प्रस्तावही अजून तयार नाही. घोषणाही हवेतच विरली. विद्यापीठाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने २५ लाखांचा पुरस्कार जाहीर करणे अशा घोषणा एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरुऐवजी राजकारण्याच्या वाटतात. विद्यार्थ्यांना पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी अशा बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. गेल्या वर्षभरात विद्यापीठात एकही मोठी व्यक्ती आली नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी येणार होत्या. पण त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. कर्मचारी संघटनांच्या दबावाला बळी पडताना कुलगुरू अनेक वेळा दिसतात.कृष्णा भोगे विभागीय आयुक्त असताना काही काळ कुलगुरूपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांच्या शिस्तीच्या बडग्याने एकदाही आंदोलन झाले नाही. पण आज कुलसचिवांना जाहीर शिवीगाळ होते तरी विद्यापीठ आणि कुलगुरू बघ्याची भूमिका घेताना दिसतात. विद्यापीठास उज्ज्वल अशी शैक्षणिक परंपरा आहे. डॉ.वा.ल.कुलकर्णी, डॉ. जी.एस.अमूर, डॉ.आर.पी. कुरूळकर, भालचंद्र नेमाडे, गंगाधर पानतावणे, यू.म.पठाण, मोईन शाकीर, सुधाताई काळदाते, डी.बी. पाचपट्टे, आनंद कर्वे अशा प्राध्यापकांनी हे विद्यापीठ गाजविले. ही माणसे म्हणजे वैभव होते. त्याच विद्यापीठात आज शिकविले जात नाही. आधीच दुष्काळ त्यात पोटाला चिमटा देत येथील पालक मुलांना उच्चशिक्षणासाठी पाठवतात. सहाव्या वेतन आयोगानुसार रीडरने आठवड्यातून १६, सहयोगी प्राध्यापकाने १४ तर विभागप्रमुखाने १२ तास घेतले पाहिजे. विद्यापीठात असे प्रामाणिक काम करणारे किती प्राध्यापक आहेत? विद्यापीठात कामाची संस्कृती उरली नाही.