शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
6
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
7
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
8
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
9
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
10
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
11
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
12
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
13
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
14
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
15
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
16
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
17
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
18
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
20
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली

संकुचित की कृतघ्न

By admin | Updated: November 1, 2015 23:36 IST

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे! परंतु तितकेच नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन साऱ्या संतांची पोटजातनिहाय विभागणी करण्यातही महाराष्ट्राला यश मिळाले आहे. त्याचाच कित्ता आता देशाच्या नेत्यांच्याबाबत लोक किंवा समाज नव्हे तर खुद्द सरकारच गिरवू लागले आहे असे दिसते. ज्या न्यायाने संतसज्जन जाती-पातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारे म्हणून संपूर्ण समष्टीच्या आदरास पात्र मानले जातात त्याच न्यायाने राष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करताना ज्यांनी विशिष्ट पक्ष वा संघटनेच्या पल्याड जाऊन विचार केला त्यांनाही आदरणीय मानले जाते. परिणामी त्यांच्या योगदानाचे मोल जाणून त्यांचा उचित आदर राखणे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु देशातील नवे सरकार या कर्तव्यास आणि खरे तर कृतज्ञतेच्या भावनेस पारखे होताना दिसत आहे. दिल्लीतील नव्या सरकारची सत्तारोहणाची वाट ज्या माध्यम क्रांतीमुळे अगदी सुलभ झाली, त्या माध्यम क्रांतीचा प्रारंभ देशात राजीव गांधी यांनी केला व त्यासाठी आज देशाच्या सत्तेत असलेल्यांकडून हिणवूनही घेतले. पण गेल्या २० आॅगस्टच्या राजीव गांधींच्या जयंतीदिनी सरकारने त्यांचे स्मरण करण्याबाबत स्वत:स सोयीस्कर विसर पाडून घेतला. काँग्रेस पक्षाने मात्र आपल्या या दिवंगत नेत्याच्या स्मृती वृत्तपत्रीय जाहिरातींच्या माध्यमातून जागविल्या. त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांचे नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व तर देशाच्याही सीमा ओलांडून पलीकडे गेले होते. त्यांच्याविषयी भले काहींच्या मनात काही वेगळे विचार असू शकतील; पण त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग कोणीही नाकारू शकत नाही. तसे करणे हा केवळ करंटेपणा नव्हे तर कृतघ्नपणाच मानला जाऊ शकतो. दुर्दैवाने विद्यमान सरकारने त्यांच्याही बाबत तेच केले आहे. तसे करण्याने आपण त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि एकप्रकारे देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान पुसून टाकू शकतो असे सरकारला वाटत असेल तर तो एक भ्रम ठरू शकतो, हे निश्चित. परिणामी इंदिरा गांधींच्या स्मृतिदिनी केवळ काँग्रेस पक्षानेच त्यांच्या स्मृती जिवंत केल्या आहेत. सरकारच्या पातळीवर अशीच असंवेदना कायम राहत गेली आणि भविष्यात पुन्हा एकदा सत्तापालट झाला तर असे कृतघ्नसत्र सुरू राहणे कोणाच्याच हिताचे नाही.