शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

संकुचित की कृतघ्न

By admin | Updated: November 1, 2015 23:36 IST

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे! परंतु तितकेच नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन साऱ्या संतांची पोटजातनिहाय विभागणी करण्यातही महाराष्ट्राला यश मिळाले आहे. त्याचाच कित्ता आता देशाच्या नेत्यांच्याबाबत लोक किंवा समाज नव्हे तर खुद्द सरकारच गिरवू लागले आहे असे दिसते. ज्या न्यायाने संतसज्जन जाती-पातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारे म्हणून संपूर्ण समष्टीच्या आदरास पात्र मानले जातात त्याच न्यायाने राष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करताना ज्यांनी विशिष्ट पक्ष वा संघटनेच्या पल्याड जाऊन विचार केला त्यांनाही आदरणीय मानले जाते. परिणामी त्यांच्या योगदानाचे मोल जाणून त्यांचा उचित आदर राखणे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु देशातील नवे सरकार या कर्तव्यास आणि खरे तर कृतज्ञतेच्या भावनेस पारखे होताना दिसत आहे. दिल्लीतील नव्या सरकारची सत्तारोहणाची वाट ज्या माध्यम क्रांतीमुळे अगदी सुलभ झाली, त्या माध्यम क्रांतीचा प्रारंभ देशात राजीव गांधी यांनी केला व त्यासाठी आज देशाच्या सत्तेत असलेल्यांकडून हिणवूनही घेतले. पण गेल्या २० आॅगस्टच्या राजीव गांधींच्या जयंतीदिनी सरकारने त्यांचे स्मरण करण्याबाबत स्वत:स सोयीस्कर विसर पाडून घेतला. काँग्रेस पक्षाने मात्र आपल्या या दिवंगत नेत्याच्या स्मृती वृत्तपत्रीय जाहिरातींच्या माध्यमातून जागविल्या. त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांचे नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व तर देशाच्याही सीमा ओलांडून पलीकडे गेले होते. त्यांच्याविषयी भले काहींच्या मनात काही वेगळे विचार असू शकतील; पण त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग कोणीही नाकारू शकत नाही. तसे करणे हा केवळ करंटेपणा नव्हे तर कृतघ्नपणाच मानला जाऊ शकतो. दुर्दैवाने विद्यमान सरकारने त्यांच्याही बाबत तेच केले आहे. तसे करण्याने आपण त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि एकप्रकारे देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान पुसून टाकू शकतो असे सरकारला वाटत असेल तर तो एक भ्रम ठरू शकतो, हे निश्चित. परिणामी इंदिरा गांधींच्या स्मृतिदिनी केवळ काँग्रेस पक्षानेच त्यांच्या स्मृती जिवंत केल्या आहेत. सरकारच्या पातळीवर अशीच असंवेदना कायम राहत गेली आणि भविष्यात पुन्हा एकदा सत्तापालट झाला तर असे कृतघ्नसत्र सुरू राहणे कोणाच्याच हिताचे नाही.