शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

संकुचित की कृतघ्न

By admin | Updated: November 1, 2015 23:36 IST

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे! परंतु तितकेच नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन साऱ्या संतांची पोटजातनिहाय विभागणी करण्यातही महाराष्ट्राला यश मिळाले आहे. त्याचाच कित्ता आता देशाच्या नेत्यांच्याबाबत लोक किंवा समाज नव्हे तर खुद्द सरकारच गिरवू लागले आहे असे दिसते. ज्या न्यायाने संतसज्जन जाती-पातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारे म्हणून संपूर्ण समष्टीच्या आदरास पात्र मानले जातात त्याच न्यायाने राष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करताना ज्यांनी विशिष्ट पक्ष वा संघटनेच्या पल्याड जाऊन विचार केला त्यांनाही आदरणीय मानले जाते. परिणामी त्यांच्या योगदानाचे मोल जाणून त्यांचा उचित आदर राखणे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु देशातील नवे सरकार या कर्तव्यास आणि खरे तर कृतज्ञतेच्या भावनेस पारखे होताना दिसत आहे. दिल्लीतील नव्या सरकारची सत्तारोहणाची वाट ज्या माध्यम क्रांतीमुळे अगदी सुलभ झाली, त्या माध्यम क्रांतीचा प्रारंभ देशात राजीव गांधी यांनी केला व त्यासाठी आज देशाच्या सत्तेत असलेल्यांकडून हिणवूनही घेतले. पण गेल्या २० आॅगस्टच्या राजीव गांधींच्या जयंतीदिनी सरकारने त्यांचे स्मरण करण्याबाबत स्वत:स सोयीस्कर विसर पाडून घेतला. काँग्रेस पक्षाने मात्र आपल्या या दिवंगत नेत्याच्या स्मृती वृत्तपत्रीय जाहिरातींच्या माध्यमातून जागविल्या. त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांचे नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व तर देशाच्याही सीमा ओलांडून पलीकडे गेले होते. त्यांच्याविषयी भले काहींच्या मनात काही वेगळे विचार असू शकतील; पण त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग कोणीही नाकारू शकत नाही. तसे करणे हा केवळ करंटेपणा नव्हे तर कृतघ्नपणाच मानला जाऊ शकतो. दुर्दैवाने विद्यमान सरकारने त्यांच्याही बाबत तेच केले आहे. तसे करण्याने आपण त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि एकप्रकारे देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान पुसून टाकू शकतो असे सरकारला वाटत असेल तर तो एक भ्रम ठरू शकतो, हे निश्चित. परिणामी इंदिरा गांधींच्या स्मृतिदिनी केवळ काँग्रेस पक्षानेच त्यांच्या स्मृती जिवंत केल्या आहेत. सरकारच्या पातळीवर अशीच असंवेदना कायम राहत गेली आणि भविष्यात पुन्हा एकदा सत्तापालट झाला तर असे कृतघ्नसत्र सुरू राहणे कोणाच्याच हिताचे नाही.