शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

राज्याची झिंग उतरविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 23:16 IST

अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राला ग्रामरक्षक दलाच्या निमित्ताने सातवा कायदा दिला आहे. पोलीस व उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू रोखू शकले नाहीत

अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राला ग्रामरक्षक दलाच्या निमित्ताने सातवा कायदा दिला आहे. पोलीस व उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू रोखू शकले नाहीत म्हणून ग्रामरक्षक दलांना आता ‘पोलिसिंग’ करावे लागेल. असा कायदा करावा लागणे हे महाराष्ट्रासाठी तसे भूषणावह नाही. राज्यात महामार्गांवर दारूबंदी झालीच; पण आता गावोगावच्या अवैध दारूचा अंमल उतरविण्यासाठी ग्रामरक्षक दलांचा एक नवा व क्रांतिकारी कायदा ग्रामसभांच्या हाती आला आहे. या कायद्याचे श्रेयही अण्णा हजारे यांच्याकडे जाते. पोलीस व उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू रोखू शकले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यावरच ‘पोलिसिंग’ करण्यासाठी हा कायदा करणे राज्याला भाग पडले आहे.बिहार व गुजरात या राज्यांत संपूर्ण दारूबंदी आहे. महाराष्ट्रात वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीवगळता इतर जिल्ह्यांत तसा कायदा नाही. संपूर्ण दारूबंदी नाही; पण किमान अवैध दारू रोखण्याचा पुरोगामीपणा तरी महाराष्ट्राने दाखवायला हवा होता. मात्र, तसेही घडलेले दिसत नाही. महाराष्ट्रात अनेक राजकारण्यांनीच स्वत:च्या साखर कारखान्यांतून दारू बनवली व विकली. शिवाय अवैध दारूबाबतही सतत मौन बाळगले. दारूबंदी केली तर आमच्या कारखान्यातील कामगारांचा रोजगार बुडेल, असे शपथपत्र एका कारखान्याने न्यायालयात दाखल केले होते. यावरून याप्रश्नी राजकारण्यांचा दृष्टिकोन लक्षात यावा. परवानाधारक दारूतून निदान राज्याला महसूल मिळतो. पण अवैध दारूतून तर सरकारी तिजोरीत छदामही येत नाही. असे असतानाही या दारूला जे संरक्षण मिळते त्यामागे आर्थिक गणिते आहेत. ती गणिते पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांना पक्की ठाऊक आहेत. अवैध दारूचे गंभीर परिणाम राज्याने पाहिले आहेत. मुंबईच्या मालाड परिसरात २०१५ साली अवैध दारूने शंभर बळी घेतले. नगर जिल्ह्यात गत फेब्रुवारी महिन्यात पांगरमलसह इतर गावांत विषारी दारूने पंधरा बळी घेतले. थेट निवडणुकीसाठी विषारी दारू वाटली गेली. दारूने पुरुषांचे बळी घेतलेच; पण, पुरुषांपेक्षाही महिलांचे व मुलांचे मोठे शोषण केले आहे. या नशेने अनेक घरांची राखरांगोळी करत दारिद्र्यरेषा वाढवली. महिलांवरील अत्याचाराच्या बहुतांश घटनांतील आरोपींनी हे कृत्य मद्याच्या अंमलात असताना केल्याचे निदर्शनास येते. कोपर्डीच्या घटनेने राज्य हादरले. यातील आरोपीही दारू पिलेले होते, हे तपासात पुढे आले आहे.या अत्याचाराच्या घटनांच्या अभ्यासानंतरच अण्णा हजारे यांनी ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेसाठी सरकारकडे आग्रह धरला होता. त्यानंतर शासनाने गत २२ मार्च व १८ एप्रिलला यासंदर्भात दोन परिपत्रके काढली. आजवर अवैध दारू रोखण्याचा ग्रामस्थांना वैधानिक अधिकार नव्हता. तो अधिकार या कायद्याने दिला आहे. आता ग्रामसभा ग्रामरक्षक दले स्थापन करतील. ग्रामरक्षक दल पोलीस अथवा उत्पादन शुल्क विभागाला गावातील अवैध दारूबाबत माहिती कळवेल, अशी माहिती कळविल्यानंतर बारा तासांच्या आत कारवाई करणे बंधनकारक आहे. एवढेच नाही तर दारू पिऊन गावात धिंगाणा घालणाऱ्यांवर त्याची नशा उतरण्याच्या आत कारवाई करण्याची तरतूद आहे. अवैध दारूविक्रीचे सलग तीन गुन्हे दाखल झाल्यास असे इसम आता हद्दपार होतील. हॉटेलांचे परवाने जातील. परवानाधारक दारू शहरांतील हॉटेलांत विकली जाते. अवैध दारू थेट खेडोपाडी झोपडीपर्यंत स्वस्तात पोहचते. ती गरिबांना खल्लास करते. गरीब जनता दारूच्या आहारी जायला नको म्हणून सरकारने देशी दारूचे परवाने देणे बंद केले. पण, अवैध म्हणजेच बनावट दारू देशीपेक्षाही स्वस्तात मिळते. नव्या कायद्याने आता तिला जरब बसणार आहे. ग्रामसभा हा कायदा किती गांभीर्याने घेतात त्यावर त्याची परिणामकारकता ठरेल. शहरांत वॉर्ड सभांनाही अशी दले स्थापन करण्याचा अधिकार हवा. कारण शहरेही अशा दारूने पोखरली आहेत. त्यासाठी कायद्यात तशी स्पष्टता हवी. अण्णांनी हा सातवा कायदा महाराष्ट्राला दिला आहे. तो दारूची झिंग उतरवेल का हे पहायचे.- सुधीर लंके