शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

गारठा

By admin | Updated: January 16, 2017 00:09 IST

बापरे बाप! काय ही थंडी? गारठलो मी! असे उद्गार सध्या सर्वत्रच ऐकू येतात.

बापरे बाप! काय ही थंडी? गारठलो मी! असे उद्गार सध्या सर्वत्रच ऐकू येतात. मग कुणी स्वत: कडेकोट बंदोबस्तात राहून समोरच्याला प्रश्न करतात; बघा एवढ्याशा थंडीने गारठलात. ते आपले जवान बघा! केवढ्या थंडीत, बर्फात काम करतात ते ! याला उत्तर नाहीच! तिची ऊब अफाट ! आपले आजी-आजोबा गोधडीच वापरायचे. त्यांना कुठले ब्लँकेट आणि विंडचिटर? मुळात पूर्वीचे लोक चिटर कमी आणि भाबडे किंवा देवभोळे जास्त होते. त्यामुळे शेतावर काम करताना कुठली आली थंडी आणि गारठा ! गारठा तसा दोन प्रकारचा. एक निसर्गदत्त, तपमान उतरल्यानंतर जाणवणारा. तो आपण हवेवर, निसर्गावर सोपवला. दुसरा गारठा आपला, मानसिकतेचा ! एखादी बातमी ऐकून, घटना बघून, माणूस थंड पडतो. गोठून जातो. या अवस्था समाजातही कायम बघायला मिळतात. एकतर नुकतेच कॅशलेस, नोटाबंदीच्या सर्जिकल स्ट्राइकने देशातले एरवी एसीत राहून कारभार करणारे गारठून गेले, त्यांचे पैसे गोठले. आता हा गारठा नाही जाणवला. त्यातून थोडी ऊब निर्माण होते तर निवडणुका ! तिकिटासाठी धावाधाव, मारामार, कुरघोडी, कोलांटीउडी, नाही मी तर माझी बायको, मुलगा, मुलगी, भाऊ पण माझाच ! म्हणजे पद मला नसले तर माझ्या घरातच पाहिजे ! एवढे करून उमेदवारी पदरात पडली नाही तर संक्रांत कडू ! पतंग कटला, एकदम गारठणे सुरू ! ज्याला घाम गाळून उमेदवारी मिळाली त्याला गारठा नाही तर गारवा. बघा ना, गार शब्द एकच, पण त्याचा कधी गारठा होईल सांगता येत नाही. आपल्याला ‘वा’ची सवय त्यामुळे ठा नको. ध चा मा होतो हे ऐतिहासिक सत्य आहे. पण वा चा ठा झाला की दु:खच दु:ख. कुणीच आपल्याला विचारीत नाही. एरवी कोटीमध्ये लोळणारे कैदेत जातात. हा आर्थिक गारठा वाईटच. माणूस एका अक्षरात धुळीस मिळतो, तर असे गारठे खूप! आर्थिक, सामाजिक, बौद्धीक, राजकीय, कौटुंबिक अशा कितीतरी गारठ्यांमधून आपल्याला प्रवास करावा लागतो. सध्या महापालिका शेकोटी पेटवून बसलीय. तुम्ही जवळ गेलात तर चटका बसेल. दूर गेलात तर काकडून जाल. एकदा निकाल लागू द्या. काही गारठतील, काही शेकतील. बरं या नोटाबंदीमुळेही पैशांची ऊब किती देणार? ‘सेवक’ व्हायचंय ना? मग तीर्थाटनं घडवा, पर्यटन करा, साड्या-चोळ्या, भांडीकुंडी आता प्रेशरकुकर जुना झाला ओव्हन हवा, टीव्ही आहेच ! बोटांचा गारठा कमी करा ऊब वाढवा मग बटन दाबायलाही सोपं. नुस्तच गोडबोला म्हणू नका, जीव तीळ तीळ तुटतो हो ! चला केलेल्या कामांची यादी करा, पुस्तिका द्या ! अहो, निसर्गाचा गारठा काही दिवसांत कमी होईल. मग गरम होऊ लागेल. निसर्ग प्रेमळ आहे हो, गारठाही देतो त्याचा गारवाही करतो. पण सर्वसामान्य माणसाचे काय? त्याला किमान गरजा भागविण्याचा, त्याचे दैनंदिन जीवन सुखी समाधानी करण्याचा गारवा त्याला मिळाला तर इतरांचा गारठाही कमी होईल. नुस्त्या आश्वासनांच्या शेकोट्या पेटवू नका, त्या विझतील, कार्याची ऊब द्या ! आज माणसाला त्याची गरज आहे.-किशोर पाठक