शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

सर्वे संतु निरामय:

By admin | Updated: April 6, 2017 00:12 IST

आजची परिस्थिती पाहता मनोशारीरिक पातळीवर सामाजिक स्वास्थ्य जपणे हे एक मोठे आव्हान आहे

आजची परिस्थिती पाहता मनोशारीरिक पातळीवर सामाजिक स्वास्थ्य जपणे हे एक मोठे आव्हान आहे. जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना तीच अपेक्षा आहे. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ ‘अर्थात धर्म आचारण्याचे पहिले साधन म्हणजे शरीर...’ कवी कालिदासाचे हे वचन प्रख्यात आहे. ते कालसुसंगत आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, वाढत्या स्पर्धेच्या युगात सर्वाधिक दुर्लक्ष होत असेल तर आरोग्याकडे. शरीर व मन सुदृढ आहे तर सारे आलबेल आहे, हा साधा जीवनमंत्र बऱ्याचदा लक्षात घेतला जात नाही. शरीराची हेळसांड होत राहते. शरीराबाबत बेपर्वाईही दिसते. भौतिक सुखांच्या मागे धावत असताना शरीराकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माध्यमातून प्रतिवर्षी ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. एक मिशन घेऊन हा दिवस साजरा करतात. या वर्षीची संकल्पना आहे ‘डिप्रेशन’. सद्यस्थितीतला अत्यंत ज्वलंत असा प्रश्न. मनाशी आणि तितकाच पर्यायाने शरीराशी जोडला गेलेला. कारण सध्याचा काळ आहे, स्पर्धेचा, गतीचा आणि आव्हानांचा. करिअरच्या स्पर्धेत यशाच्या मागे माणसं धावत राहतात. त्यातून शारीरिक, मानसिक तक्रारी वाढतात. ताणतणाव, ईर्षा, अखंड दगदग, कामाचे ओझे, कौटुंबिक बेबनाव ही सारी विविध पातळ्यांवरची कसरत सांभाळत माणसं जगत राहतात. त्याच्या परिणामस्वरूप अपेक्षित काय असते तर निखळ समाधान. पण त्याचाच अभाव जाणवतो. मनावरील परिणाम थेट शरीरावर होतात.सातत्याने वेगवेगळ्या रोगांच्या साथी येऊन धक्का देत असतातच. सार्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू आदि रोगांनी तर जगभरात धुमाकूळ घातल्याचे आपण अनुभवले आहे. निदान आहार चांगला असावा म्हणावे तर सत्त्व हरवलेले अन्नपदार्थ, जंक फूडची वाढती क्रेझ यातून जेवणातला ‘रस’ संपताना दिसत आहे. दिवसागणिक वाढत असलेले आणि आपल्याला विळख्यात घेत असलेले विविध स्वरूपाचे प्रदूषण, तंत्रज्ञानाचे अतिक्रमण आणि दुरावणारे नातेसंबंध या साऱ्यांचा परिणाम अंतिमत: शरीराला आणि मनाला भोगावा लागतो. त्यातूनच येते ते नैराश्य. त्यामुळे मनाची प्रसन्नताच हरवून बसते. आणि म्हणूनच आजच्या धकाधकीच्या या जीवनात निरामय जीवनाचा शोध अत्यावश्यक ठरतो. ‘केवळ रोग वा व्याधी वा त्यांच्या लक्षणांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्याही संपूर्णत: सुदृढ स्थिती म्हणजे आरोग्य.’ ही व्यापकता लक्षात घेतली तर चांगल्या आरोग्याचे महत्त्व खचितच लक्षात येण्यासारखे आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्याच्या मूलभूत गरजांविषयी जनजागृती करणे या उद्देशातून जागतिक आरोग्य संघटनाही औचित्य साधून समाजातील आरोग्यप्रश्नांना नेमकेपणाने हात घालत असते.अनेकदा आपण आरोग्याला समानार्थी शब्द निरोगी वापरतो. पण निरोगी म्हणजे ‘निर्गत: रोग: यस्मात्’ म्हणजे ज्याच्या देहातून रोग नाहीसा झाला आहे तो. शरीराइतकीच मनाच्या आरोग्याची आणि समाजाच्या आरोग्याची मानवी जीवनात नितांत आवश्यकता असते. म्हणून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुरुवात करावी लागेल ती घरापासून. घर ही आरोग्याची गंगोत्री आहे. खरे आरोग्यमंदिर आहे. स्वास्थ्याचा उगम-प्रारंभ हा प्रत्येकाच्या घरातून होतो. घरामध्ये चांगले सकारात्मक वातावरण असावे. पूरक पोषक असावे. खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात अन्नपदार्थांचे सेवन व्हावे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नांदावी. घरापासून सुरू होणारी ही प्रसन्नता समाजात परावर्तित व्हायला हवी. आजूबाजूच्या समाजाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर प्रगतीचे व विकासाचे मार्ग सोपे होत जातात. आजची परिस्थिती पाहता सगळ्या बाजूला सामाजिक स्वास्थ्य जपणे हेच एक मोठे आव्हान आहे. लहान मुलांच्या पोषणाच्या, प्रतिकारशक्तीच्या समस्या आहेत. व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे. कुटुंबव्यवस्था धोक्यात आहे. हे सारे चित्र एका दिवसात बदलणारे नाही. पण त्या दिशेने नेमके, सकारात्मक प्रयत्न मात्र करावेच लागतील. ‘सर्वे संतु निरामय:’ हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य हरप्रकारे कसे जपले जाईल हे पाहणे ही काळाची गरज आहे. - विजय बाविस्कर