शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

वसंत

By admin | Updated: April 6, 2017 00:10 IST

संस्कृत साहित्यात वसंताचे वर्णन ठायी ठायी आले आहे. शतपथ ब्राह्मणात वसंत ऋतुला संवत्सराचे द्वार मानले आहे.

-डॉ. रामचंद्र देखणेसंस्कृत साहित्यात वसंताचे वर्णन ठायी ठायी आले आहे. शतपथ ब्राह्मणात वसंत ऋतुला संवत्सराचे द्वार मानले आहे.‘‘जैसे ऋतुपतींचे हार।वनश्री निरंतर।वोळगे फळभार।लावण्येशी।।’’ ज्ञाने. ३/१००फळभाराने विनम्र झालेली वनश्री आपल्या वनशोभेच्या सौंदर्याला घेऊनच ऋतुपती वसंताच्या द्वारात स्वागताला उभी आहे, हे ज्ञानदेवांचे रूपकही किती सुंदर आहे. महाकवी कालिदास, भारवी, श्रीहर्ष, जयदेव या विदग्ध महाकवींनी वसंताला उभे करूनच आपल्या काव्यसौंदर्याला नटविले आहे. सजविले आहे. या साऱ्यांनी वसंताची ओढ आणि आकर्षण असणे स्वाभाविक आहे. कालिदास हा तर वसंतवेडा कवी होता. ऋतुराज वसंताच्या आगमनामुळे वनश्रीच्या रंगरूपात होणारे बदल रघुवंशात कालिदासाने सूक्ष्मतेने टिपले आहेत. ‘कुसुम जन्मततो’ अशी सुरुवात करून वसंताच्या आगमनाची चाहुल कोण कोण देतात याचे आल्हादकारक वर्णन कालिदासाने केले आहे. कुमारसंभवात वसंताच्या उन्मादक सौंदर्याची किमया अत्यंत प्रभावीपणे त्याने मांडली आहे. उमेने शिवाच्या सेवेसाठी त्याच्या तपोवनात पाऊल टाकावा आणि तिथे मदनाच्या प्रभावामुळे अकालीच वसंत कसा अवतरावा आणि त्याच्या दर्शनाने तपोवनाचे ‘प्रमदवन’ कसे बनावे, याचे चित्रण कालिदासाने केले आहे. कालिदासाच्या या वसंतवर्णनात यौवनाच्या पहिल्या भरातील प्रीतीचा आवेग ओसंडून वाहत आहे. महाकवी भारवीने मंद मंद पदन्यासाने नूपुरांची रुणझुण, रसिकांच्या कानी भरणाऱ्या मदालसा रमणीच्या रूपात वसंताला पाहिले आहे. श्रीहर्षाने आपल्या ‘नैषधीय चरितात’ विरही नलाला असह्य होणारा विरहाचा वसंत कल्पकतेने चितारला आहे. वासंतिक सौंदर्याचा विरही जनांना होणारा तापही अनेक संस्कृत कवींनी व्यक्त केला आहे. जयदेवांनी गीत गोविंदात विरहाने व्याकुळ झालेल्या कृष्णप्रीतीचे हळुवार भावचित्र उभे केले आहे. कोकिळेच्या मंजूळ स्वरांनी बहरलेल्या वसंतातही कृष्णाची भेट न झाल्याने वसंतच राधेला दु:सह वाटतो आहे असे वर्णन करून जयदेवांनी वसंत आणि प्रीती यांचे दृढ नातेच सांगितले आहे आणि आंतरिक प्रीती हाच जणू उभयतांच्या मनात फुललेला वसंत आहे. याचा विरह होऊ नये म्हणून वसंतालाच पुन्हा आवाहन केले आहे. चित्रही मानवी मन, वसंत आणि प्रीती याचे नाते सांगून जाते. वसंत हा आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने पडतात. पण वसंतऋतुत पुन्हा पालवी फुटते. तसेच निराशा झटकून मानवी जीवनात चैतन्याची नवी पालवी निर्माण करणाऱ्या तसेच एकीकडे निसर्गाच्या स्वाभाविक सौंदर्याला बहरून टाकणाऱ्या तर दुसरीकडे चैतन्यरूप सौंदर्याला उजळविणाऱ्या या वसंताकडे पाहण्याची एक आगळी दृष्टी मात्र माणसाजवळ हवी.