शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वसंत

By admin | Updated: April 6, 2017 00:10 IST

संस्कृत साहित्यात वसंताचे वर्णन ठायी ठायी आले आहे. शतपथ ब्राह्मणात वसंत ऋतुला संवत्सराचे द्वार मानले आहे.

-डॉ. रामचंद्र देखणेसंस्कृत साहित्यात वसंताचे वर्णन ठायी ठायी आले आहे. शतपथ ब्राह्मणात वसंत ऋतुला संवत्सराचे द्वार मानले आहे.‘‘जैसे ऋतुपतींचे हार।वनश्री निरंतर।वोळगे फळभार।लावण्येशी।।’’ ज्ञाने. ३/१००फळभाराने विनम्र झालेली वनश्री आपल्या वनशोभेच्या सौंदर्याला घेऊनच ऋतुपती वसंताच्या द्वारात स्वागताला उभी आहे, हे ज्ञानदेवांचे रूपकही किती सुंदर आहे. महाकवी कालिदास, भारवी, श्रीहर्ष, जयदेव या विदग्ध महाकवींनी वसंताला उभे करूनच आपल्या काव्यसौंदर्याला नटविले आहे. सजविले आहे. या साऱ्यांनी वसंताची ओढ आणि आकर्षण असणे स्वाभाविक आहे. कालिदास हा तर वसंतवेडा कवी होता. ऋतुराज वसंताच्या आगमनामुळे वनश्रीच्या रंगरूपात होणारे बदल रघुवंशात कालिदासाने सूक्ष्मतेने टिपले आहेत. ‘कुसुम जन्मततो’ अशी सुरुवात करून वसंताच्या आगमनाची चाहुल कोण कोण देतात याचे आल्हादकारक वर्णन कालिदासाने केले आहे. कुमारसंभवात वसंताच्या उन्मादक सौंदर्याची किमया अत्यंत प्रभावीपणे त्याने मांडली आहे. उमेने शिवाच्या सेवेसाठी त्याच्या तपोवनात पाऊल टाकावा आणि तिथे मदनाच्या प्रभावामुळे अकालीच वसंत कसा अवतरावा आणि त्याच्या दर्शनाने तपोवनाचे ‘प्रमदवन’ कसे बनावे, याचे चित्रण कालिदासाने केले आहे. कालिदासाच्या या वसंतवर्णनात यौवनाच्या पहिल्या भरातील प्रीतीचा आवेग ओसंडून वाहत आहे. महाकवी भारवीने मंद मंद पदन्यासाने नूपुरांची रुणझुण, रसिकांच्या कानी भरणाऱ्या मदालसा रमणीच्या रूपात वसंताला पाहिले आहे. श्रीहर्षाने आपल्या ‘नैषधीय चरितात’ विरही नलाला असह्य होणारा विरहाचा वसंत कल्पकतेने चितारला आहे. वासंतिक सौंदर्याचा विरही जनांना होणारा तापही अनेक संस्कृत कवींनी व्यक्त केला आहे. जयदेवांनी गीत गोविंदात विरहाने व्याकुळ झालेल्या कृष्णप्रीतीचे हळुवार भावचित्र उभे केले आहे. कोकिळेच्या मंजूळ स्वरांनी बहरलेल्या वसंतातही कृष्णाची भेट न झाल्याने वसंतच राधेला दु:सह वाटतो आहे असे वर्णन करून जयदेवांनी वसंत आणि प्रीती यांचे दृढ नातेच सांगितले आहे आणि आंतरिक प्रीती हाच जणू उभयतांच्या मनात फुललेला वसंत आहे. याचा विरह होऊ नये म्हणून वसंतालाच पुन्हा आवाहन केले आहे. चित्रही मानवी मन, वसंत आणि प्रीती याचे नाते सांगून जाते. वसंत हा आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने पडतात. पण वसंतऋतुत पुन्हा पालवी फुटते. तसेच निराशा झटकून मानवी जीवनात चैतन्याची नवी पालवी निर्माण करणाऱ्या तसेच एकीकडे निसर्गाच्या स्वाभाविक सौंदर्याला बहरून टाकणाऱ्या तर दुसरीकडे चैतन्यरूप सौंदर्याला उजळविणाऱ्या या वसंताकडे पाहण्याची एक आगळी दृष्टी मात्र माणसाजवळ हवी.