शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला फारसे देणे-घेणे नाही...

By admin | Updated: September 6, 2015 04:41 IST

‘खून झाला हे वाईट झालं.. विचारांसाठी एकाद्या माणसाला मारणं बरोबर नाही.. मारेकरी पकडले गेले पाहिजेत.. अनेक खून होतात त्यापैकी हे खून.. समाजामध्ये असंख्य घटना घडत आहेत

- निळू दामले

‘खून झाला हे वाईट झालं.. विचारांसाठी एकाद्या माणसाला मारणं बरोबर नाही.. मारेकरी पकडले गेले पाहिजेत.. अनेक खून होतात त्यापैकी हे खून.. समाजामध्ये असंख्य घटना घडत आहेत त्यापैकीच ही एक घटना आहे... इ.इ.’ असं एकूण जनमत आहे. एकुणात समाजाला फारशी पडलेली नाही. तीव्र आणि चिंतन करायला लावणाऱ्या प्रतिक्रि या जरूर उमटल्या; पण त्या अगदीच कमी लोकांकडून.खून आखून, बेतून, ठरवून झालेले आहेत. दाभोलकरांच्या खुनाला तर आता दोन वर्षे होतील. मारेकरी सापडत नाहीयेत. सभा झाल्या. मोर्चे झाले. निदर्शनं झाली. निवेदनं दिली गेली. भाषणं झाली. वर्तमानपत्रांतून लेख आणि पत्रं प्रसिद्ध झाली. या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यावर काही गोष्टी उमजतात.समाजाच्या तळात आणि मुळात काही घडत आहे असं लोकांना वाटत नाहीये.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हे तिघंही पुरोगामी. डावे. त्यांनी धर्म आणि धर्मव्यवहार यांना तर्काच्या कसोट्या लावल्या. श्रद्धा आणि परंपरा काळाच्या संदर्भात वेळोवेळी तपासून पाहाव्या असं ते म्हणत. त्यांना जुन्या श्रद्धा आणि परंपरा नकोशा होत्या, नव्या श्रद्धा आणि परंपरा स्थापित करायच्या होत्या. लोकशाही, सेक्युलर व्यवहार, सर्व माणसं समान असतात ही मूल्यं नव्या परंपरांमधे स्थापित करण्याचा तिघांचाही प्रयत्न होता. ही तिन्ही मूल्यं कमी-अधिक तीव्रतेनं अमान्य असणारी माणसं आणि संघटना भारतात आहेत. पूर्वीपासून. ही मूल्यं समाजात रूढ होण्याआधीच राजकीय स्वातंत्र्याची चळवळ प्रबळ झाली, निवडणुकीच्या राजकारणानं समाज व्यापला. राजकारणातली माणसं वरील मूल्यांच्या गोष्टी कधीकधी करतात; पण त्यांच्या एकूण उद्योगांमधे ही मूल्यं ठाशीवपणे मांडली जात नाहीत, त्यांच्यावर भर दिला जात नाही. वरील तीन माणसं मात्र इतर गोष्टी न करता सर्व वेळ ही मूल्यं समाजासमोर ठेवत होती. दाभोलकरांची एक संघटना होती, पानसरे राजकीय पक्षात होते आणि कलबुर्गी संशोधक प्राध्यापक होते. तिघांच्याही प्रतिमा वरील मूल्यांचा आग्रह धरणारे अशी होती.भारतीय माणसांना परंपरा आणि श्रद्धांना हात लावलेलं आवडत नाही. फुले, आंबेडकर, आगरकर, रानडे यांनी परंपरा आणि श्रद्धांमधे बदल घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रचंड जनक्षोभाचा सामना करावा लागला. तो १९व्या आणि २०व्या शतकातला काळ होता. नाकं मुरडत, कटकट करत का होईना पण माणसं समाजात बदल करू पाहणाऱ्या सुधारकांचं ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत होती. त्यामुळं समाजानं रानडे-फुले-आंबेडकरांचं ऐकून घेतलं आणि काही बदल स्वीकारले. २१व्या शतकाच्या सुरुवातीला स्थिती बदललीय. आर्थिक प्रश्न बिकट होत आहेत. विषमता वाढीला लागलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ समाजाची वाईट स्थिती दर्शवत आहेत. राजकीय स्वातंत्र्य मिळूनही सुखी जीवन का मिळत नाहीये याची उत्तरं सामान्य माणसांना मिळत नाहीयेत. राजकीय आणि आर्थिक विचारधारा उत्तरं देऊ शकत नाहीयेत. माणसं सैरभैर आहेत, घायकुतीला आली आहेत. जगणंच कठीण झाल्यावर सामाजिक मूल्य इत्यादींचा विचार करायला माणसं तयार होत नाहीत. सेक्युलर, समानता, लोकशाही इत्यादी विचार म्हणजे चैन आहे असं माणसांना वाटत असावं. त्यामुळंच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनात काही गंभीर घडलंय असं बहुतेकांना वाटत नाहीये.गांभीर्य वाटेनासे झालेय..सेक्युलर, समानता, लोकशाही इत्यादी विचार म्हणजे चैन आहे असं माणसांना वाटत असावं. त्यामुळंच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनात काही गंभीर घडलंय असं बहुतेकांना वाटत नाहीये.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)