शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

सिद्धी विरुद्ध प्रसिद्धी

By admin | Updated: June 12, 2015 23:44 IST

आजकाल नापास होण्याचं प्रमाण बरचसं घटलं आणि पास होण्याचं प्रमाण वाढलं. फक्त पास होणं महत्त्वाचं नसून किती टक्के मार्क पडले हे महत्त्वाचं समजणारा काळ

विजयराज बोधनकर - आजकाल नापास होण्याचं प्रमाण बरचसं घटलं आणि पास होण्याचं प्रमाण वाढलं. फक्त पास होणं महत्त्वाचं नसून किती टक्के मार्क पडले हे महत्त्वाचं समजणारा काळ. काळ माणसाला बदडतो-बदलतो आणि घडवतो व बिघडवतो. पण निसर्ग हा तठस्थ उभा आहे. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही. निसर्गाचं रहाटगाडगं पूर्वीपासून आत्तापर्यंत समप्रमाणात तसंच चालू आहे. निसर्गाचा निर्माता ना कधी कळला ना कधी कळण्याची शक्यता आहे. पण निसर्गाची •भाषा ज्याना कळली त्यांचं नाव रविन्द्रनाथ टागोर. त्यांनी शांती निकेतन सारख्या निसर्गरम्य विद्यालयाची निर्मिती केली. तिथे टक्क्यांची •भाषा नव्हती. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गाने कुठल्या न कुठल्या कलाकौशल्याचं बीज देऊन पाठविलं, याचा अंदाज घेऊन विद्यार्थ्याला तसं प्रोत्साहीत करण्यात यायचं. शांती निकेतनची नेमकी विचारधारा कुठली होती? तर मुळातच आंतरिक कौशल्य असलेला विद्यार्थी लवकर सिद्धतेच्या रांगेत येऊन बसतो. त्याला शिकवावंच लागत नाही. त्याला उपजत ज्ञान असतं. फक्त त्याला मार्गदर्शन हवं असतं. मग विषय कुठलाही असो, तिथे स्पर्धा अजिबात नसते. तिथे मन-बुद्धीच्या क्षमतेचं प्रगटीकरण असतं. हीच विचारधारा तिथे होती. हे सारं समजायला संवेदनशील मन हवं. लादलेल्या अभ्यासक्रमातून शाळेचा आणि क्लासेसचा •भाव नक्कीच वधारतो. पण मुलांच्या मनात असलेल्या निसर्गदत्त गुणांचा जिवंतपणीच हा समाज खून करतो. क्लासेसवाल्यांच्या जाहिरातींना फसणारे पालक हे स्पर्धेच्या बाजारातले पहिले दुख: आहे. मुलांना ९५% टक्क्यांच्या वर मार्क पडले की आईबाप चिमूटभर समाजात प्र्रसिद्धीस येतात. मुलं पैशाने सुखी आणि धनवंत बनावीत अशा नादावलेल्या स्वप्नात मुलांच्या आंतरीक कौशल्याचा कुणी विचारच करीत नाही. पुस्तकातलं ज्ञान पाठ करून त्याची उत्तरे लिहून काढणे म्हणजे ज्ञानवंत का? तर जो स्वयंसिद्धतेने काहीतरी निर्माण करून दाखवितो तो खरा बुद्धीमान ठरतो. मुलांना जे बनायचं ते बनू देणारे पालक मुलांना आनंदाच्या मार्गावरून जाऊ देतात आणि इतर सर्व नोटांच्या रस्त्यावरून जायला लावतात. पैसा पैसा करत शेवटी दुु:खाला कारणीभूत ठरतात. पैशाने सर्व सुखे, आनंद विकत घेता येत नाही, पण मनाच्या सुखातून फक्त आनंदाच्याच रस्त्यावरून चालता येऊ शकतं आणि सिद्धतेसाठी फक्त समाधानाचीच गरज असते... जे समाधान आपण आज हरवून बसलो आहोत. कारण सारेच प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत.