शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

सिद्धी विरुद्ध प्रसिद्धी

By admin | Updated: June 12, 2015 23:44 IST

आजकाल नापास होण्याचं प्रमाण बरचसं घटलं आणि पास होण्याचं प्रमाण वाढलं. फक्त पास होणं महत्त्वाचं नसून किती टक्के मार्क पडले हे महत्त्वाचं समजणारा काळ

विजयराज बोधनकर - आजकाल नापास होण्याचं प्रमाण बरचसं घटलं आणि पास होण्याचं प्रमाण वाढलं. फक्त पास होणं महत्त्वाचं नसून किती टक्के मार्क पडले हे महत्त्वाचं समजणारा काळ. काळ माणसाला बदडतो-बदलतो आणि घडवतो व बिघडवतो. पण निसर्ग हा तठस्थ उभा आहे. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही. निसर्गाचं रहाटगाडगं पूर्वीपासून आत्तापर्यंत समप्रमाणात तसंच चालू आहे. निसर्गाचा निर्माता ना कधी कळला ना कधी कळण्याची शक्यता आहे. पण निसर्गाची •भाषा ज्याना कळली त्यांचं नाव रविन्द्रनाथ टागोर. त्यांनी शांती निकेतन सारख्या निसर्गरम्य विद्यालयाची निर्मिती केली. तिथे टक्क्यांची •भाषा नव्हती. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गाने कुठल्या न कुठल्या कलाकौशल्याचं बीज देऊन पाठविलं, याचा अंदाज घेऊन विद्यार्थ्याला तसं प्रोत्साहीत करण्यात यायचं. शांती निकेतनची नेमकी विचारधारा कुठली होती? तर मुळातच आंतरिक कौशल्य असलेला विद्यार्थी लवकर सिद्धतेच्या रांगेत येऊन बसतो. त्याला शिकवावंच लागत नाही. त्याला उपजत ज्ञान असतं. फक्त त्याला मार्गदर्शन हवं असतं. मग विषय कुठलाही असो, तिथे स्पर्धा अजिबात नसते. तिथे मन-बुद्धीच्या क्षमतेचं प्रगटीकरण असतं. हीच विचारधारा तिथे होती. हे सारं समजायला संवेदनशील मन हवं. लादलेल्या अभ्यासक्रमातून शाळेचा आणि क्लासेसचा •भाव नक्कीच वधारतो. पण मुलांच्या मनात असलेल्या निसर्गदत्त गुणांचा जिवंतपणीच हा समाज खून करतो. क्लासेसवाल्यांच्या जाहिरातींना फसणारे पालक हे स्पर्धेच्या बाजारातले पहिले दुख: आहे. मुलांना ९५% टक्क्यांच्या वर मार्क पडले की आईबाप चिमूटभर समाजात प्र्रसिद्धीस येतात. मुलं पैशाने सुखी आणि धनवंत बनावीत अशा नादावलेल्या स्वप्नात मुलांच्या आंतरीक कौशल्याचा कुणी विचारच करीत नाही. पुस्तकातलं ज्ञान पाठ करून त्याची उत्तरे लिहून काढणे म्हणजे ज्ञानवंत का? तर जो स्वयंसिद्धतेने काहीतरी निर्माण करून दाखवितो तो खरा बुद्धीमान ठरतो. मुलांना जे बनायचं ते बनू देणारे पालक मुलांना आनंदाच्या मार्गावरून जाऊ देतात आणि इतर सर्व नोटांच्या रस्त्यावरून जायला लावतात. पैसा पैसा करत शेवटी दुु:खाला कारणीभूत ठरतात. पैशाने सर्व सुखे, आनंद विकत घेता येत नाही, पण मनाच्या सुखातून फक्त आनंदाच्याच रस्त्यावरून चालता येऊ शकतं आणि सिद्धतेसाठी फक्त समाधानाचीच गरज असते... जे समाधान आपण आज हरवून बसलो आहोत. कारण सारेच प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत.