शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सिद्धी विरुद्ध प्रसिद्धी

By admin | Updated: June 12, 2015 23:44 IST

आजकाल नापास होण्याचं प्रमाण बरचसं घटलं आणि पास होण्याचं प्रमाण वाढलं. फक्त पास होणं महत्त्वाचं नसून किती टक्के मार्क पडले हे महत्त्वाचं समजणारा काळ

विजयराज बोधनकर - आजकाल नापास होण्याचं प्रमाण बरचसं घटलं आणि पास होण्याचं प्रमाण वाढलं. फक्त पास होणं महत्त्वाचं नसून किती टक्के मार्क पडले हे महत्त्वाचं समजणारा काळ. काळ माणसाला बदडतो-बदलतो आणि घडवतो व बिघडवतो. पण निसर्ग हा तठस्थ उभा आहे. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही. निसर्गाचं रहाटगाडगं पूर्वीपासून आत्तापर्यंत समप्रमाणात तसंच चालू आहे. निसर्गाचा निर्माता ना कधी कळला ना कधी कळण्याची शक्यता आहे. पण निसर्गाची •भाषा ज्याना कळली त्यांचं नाव रविन्द्रनाथ टागोर. त्यांनी शांती निकेतन सारख्या निसर्गरम्य विद्यालयाची निर्मिती केली. तिथे टक्क्यांची •भाषा नव्हती. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गाने कुठल्या न कुठल्या कलाकौशल्याचं बीज देऊन पाठविलं, याचा अंदाज घेऊन विद्यार्थ्याला तसं प्रोत्साहीत करण्यात यायचं. शांती निकेतनची नेमकी विचारधारा कुठली होती? तर मुळातच आंतरिक कौशल्य असलेला विद्यार्थी लवकर सिद्धतेच्या रांगेत येऊन बसतो. त्याला शिकवावंच लागत नाही. त्याला उपजत ज्ञान असतं. फक्त त्याला मार्गदर्शन हवं असतं. मग विषय कुठलाही असो, तिथे स्पर्धा अजिबात नसते. तिथे मन-बुद्धीच्या क्षमतेचं प्रगटीकरण असतं. हीच विचारधारा तिथे होती. हे सारं समजायला संवेदनशील मन हवं. लादलेल्या अभ्यासक्रमातून शाळेचा आणि क्लासेसचा •भाव नक्कीच वधारतो. पण मुलांच्या मनात असलेल्या निसर्गदत्त गुणांचा जिवंतपणीच हा समाज खून करतो. क्लासेसवाल्यांच्या जाहिरातींना फसणारे पालक हे स्पर्धेच्या बाजारातले पहिले दुख: आहे. मुलांना ९५% टक्क्यांच्या वर मार्क पडले की आईबाप चिमूटभर समाजात प्र्रसिद्धीस येतात. मुलं पैशाने सुखी आणि धनवंत बनावीत अशा नादावलेल्या स्वप्नात मुलांच्या आंतरीक कौशल्याचा कुणी विचारच करीत नाही. पुस्तकातलं ज्ञान पाठ करून त्याची उत्तरे लिहून काढणे म्हणजे ज्ञानवंत का? तर जो स्वयंसिद्धतेने काहीतरी निर्माण करून दाखवितो तो खरा बुद्धीमान ठरतो. मुलांना जे बनायचं ते बनू देणारे पालक मुलांना आनंदाच्या मार्गावरून जाऊ देतात आणि इतर सर्व नोटांच्या रस्त्यावरून जायला लावतात. पैसा पैसा करत शेवटी दुु:खाला कारणीभूत ठरतात. पैशाने सर्व सुखे, आनंद विकत घेता येत नाही, पण मनाच्या सुखातून फक्त आनंदाच्याच रस्त्यावरून चालता येऊ शकतं आणि सिद्धतेसाठी फक्त समाधानाचीच गरज असते... जे समाधान आपण आज हरवून बसलो आहोत. कारण सारेच प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत.