शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

शंकरबाबा

By admin | Updated: May 12, 2015 06:55 IST

माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वझ्झर फाटा

गजानन जानभोर -

माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वझ्झर फाटा येथे शंकरबाबांचे दीडेकशे अपंग, अनाथांचे शापित कुटुंब राहते. या आश्रमात शंभरेक अंध-अपंग, मतिमंद, मूकबधिर मुले-मुली आहेत. संडासात, नालीत किंंवा कचरापेटीत फेकून दिलेल्या या अनाथ मुलांच्या संगोपनाची आणि पुनर्वसनाची तपश्चर्या हा गरीब कार्यकर्ता मांडून बसला आहे. परवा यातील कांती या मुलीचे धनंजय डोळसकर या तरुणाशी अकोल्यात लग्न झाले. वीस वर्षांपूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यात ती सापडली. शंकरबाबांनी तिला आश्रमात आणले, मोठे केले, शिकवले आणि आयुष्याचा जोडीदार शोधून जन्मदात्याचे कर्तव्य पूर्ण केले. या फकीराच्या घरातील हे सोळावे लग्न.आपल्या घरात एखादे मतिमंद वा अपंग मूल असेल तर आपण मनाने कायमचे खचलेले असतो. ‘नशिबाचे भोग’ म्हणून त्या निष्पाप जिवाकडे दुर्लक्ष करीत त्याच्या जगण्याचे हक्क नकळत हिरावूनही घेतो. शंकरबाबा मात्र नाव, गाव, जात, धर्म यापैकी काहीच ठाऊक नसलेल्या या मुलांच्या आयुष्यात आनंद घेऊन येण्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच कचरापेटीत सापडलेल्या ज्योतीला एक दिवस कलेक्टर बनविण्याचे स्वप्न ते पाहतात. ‘रोजी’ या ख्रिश्चन मुलीला ते जसे जन्मदाता वाटतात, त्याच वेळी ‘मुन्नी’ ही मुस्लीम मुलगी त्यांच्यात रक्ताचे नाते शोधण्याचा प्रयत्न करीत असते. रामचंद्र आणि रहेमानला जीव लावताना बाबांची जात आणि धर्म कायमचा गळून पडतो.शैलजा या मूकबधिर मुलीची गोष्ट अशीच. आई-वडिलांनी तिला फेकून दिले. भंडाऱ्यातील एका नालीत ती पडून होती. बाबांनी तिला आणले. ‘कु. शैलजा शंकर पापळकर’ हे नाव दिले. मूकबधिर विद्यालयात ती शिकली. त्याच विद्यालयात शैलजा नोकरीला आहे. तिला पहिला पगार मिळाला तेव्हा त्यांनी तिच्या अभिनंदनासाठी एक खास कौतुक सोहळा आयोजित केला होता. तिचे लग्नही लावून दिले. शंकरबाबांच्या आणखी एका मुलीचे, बालीचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. तिच्या साक्षगंधाच्या दिवशी शंकरबाबांची पत्नी पंचफुलाबार्इंचे निधन झाले. सर्वजण काही क्षणासाठी सुन्न झाले, त्यांचे सांत्वन करू लागले, बाबा मात्र अविचल. एक क्षण असा आला की, त्यांनाच इतरांचे सांत्वन करावे लागले. आपली पत्नी आता या जगात नाही, ही दु:खद वार्ता त्यांना सकाळीच समजली होती. पण ती सर्वांपासून लपवून ठेवली. मुलीला आयुष्याचा साथीदार मिळवून दिल्याचा आनंद एका डोळ्यात आणि दुसऱ्या डोळ्यात पत्नी कायमची साथ सोडून गेल्याचे दु:ख घेऊन हा माणूस सर्वांसोबत अगदी सहज वावरत होता. सामान्य माणसासारखे त्यांनाही दु:ख झाले असेल, पत्नीसोबत घालवलेल्या संसारातील आठवणींनी तेही व्याकुळ झाले असतील. नात्यांचे कोवळे बंध त्यांनाही अस्वस्थ करीत असतील. पण मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना हा माणूस सर्वांनाच फसवून दिवसभर आतून रडत होता. अपंग, मतिमंदांचे केवळ संगोपनच नाही तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा सांगतात. त्यासाठीच त्यांची दिवस-रात्र धडपड सुरू असते. ‘१८ वर्षांवरील अनाथ मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने कायदा करावा’, ही त्यांची तगमग त्याच धडपडीचा एक भाग आहे. आई-वडिलांनी टाकून दिलेल्या देशातील लाखो मतिमंद मुलांच्या भविष्याची चिंंता त्यांना भेडसावीत असते. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा मुलांना अनाथाश्रमात ठेवता येत नाही. देशात दरवर्षी अशी एक लाख मुले अनाथाश्रमाबाहेर पडतात. ती मग कुठे जातात? सरकारही आपली संवेदना हरवून बसले आहे, हा शंकरबाबांचा सात्त्विक संताप आहे. आपण गेल्यानंतर या मुलांचे कसे होईल, या प्रश्नाने ते अलीकडे व्याकुळ होतात. परवा सासरी निघालेल्या कांतीला आशीर्वाद देताना चेहऱ्यावरील ही अस्वस्थता त्यांना पहिल्यांदाच लपवता आली नाही.