शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अंथरूण पाहून.?

By admin | Updated: September 30, 2014 00:07 IST

आपल्या समाजाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती, असा सवाल केल्यास त्याचं पटकन उत्तरं देता येतील, ह्यचलता है ही मानसिकता आणि अल्पसंतुष्ट वृत्ती.

डॉ. बाळ फोंडके
पत्रकार व विज्ञान लेखक
आपल्या समाजाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती, असा सवाल केल्यास त्याचं पटकन उत्तरं देता येतील, ह्यचलता है ही मानसिकता आणि अल्पसंतुष्ट वृत्ती. अंथरूण पाहून पाय पसरावेत हेच आपलं धोरण असावं, असं लहानपणापासून प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जातं. अंथरूण तोकडं पडत असेल, तर ते मोठं करण्याची, आपले पाय झाकले जातील इतकं लांब-रुंद करण्याची धडपड का करायची नाही, असा प्रश्न विचारण्यालाही मुभा दिली जात नाही. कोणी धीटपणो असं विचारलंच, तर जास्त शहाणपणा करू नकोस; सांगतो ते मुकाटय़ानं ऐक, असा दमही दिला जातो. त्यामुळेच आपल्यात एकंदरीत विजिगीषू वृत्तीचा अभाव आढळतो. 
हे सर्वच क्षेत्रंत दिसून येतं. आपल्या शाळेत पहिला आला, बस्स बाजी मारली. त्यापुढे जाऊन जिल्ह्यात, राज्यात, देशात अव्वल येण्याची आकांक्षाही बाळगली जात नाही. मग, जगात आघाडीवर राहावं, ही इच्छा मनात कुठून पैदा होणार! आणि तशी झालीच तर जे सर्वागसुंदर आहे, परिपूर्ण आहे, असं काही करण्याच्या आड तीच आहे. त्यात चालवून घेण्याचं धोरण आड येतं. 
पण, यालाही काही जण अपवाद ठरतात. ते ही धोरणं मान्य करीत नाहीत. एक्सलन्सची कास धरतात. सर्वस्व झोकून एखादी गोष्ट साध्य करण्याचा प्रय} करतात. इतर कोणीच आजवर ते केलेलं नाही, ही त्यांना अडचण वाटत नाही. उलट ते आव्हान ठरतं. त्याचाच ध्यास ते घेतात. 
असाच ध्यास आपल्या अंतरिक्ष वैज्ञानिकांनी घेतलेला आहे. म्हणून तर आजवर अमेरिका, रशिया, युरोपीय समुदाय, जपान, चीन यासारख्या बलाढय़ आणि तंत्रज्ञानसमृद्ध देशांना जे साध्य झालं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या पहिल्याच प्रय}ात त्यांनी श्रीहरिकोटय़ाहून धाडलेलं मंगळयान यशस्वीरीत्या मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं आहे. ते करताना त्यांनी अनेक कसोटय़ा पार पाडल्या; पण त्यातल्या त्यात अखेरची कसोटी श्वास रोखून 
धरायला लावणारी होती. त्यांच्या कौशल्याची कठोर परीक्षा पाहणारी होती. कारण, दर सेकंदाला 11.4 किलोमीटर अशा वेगानं धरतीची नाळ तोडत निघालेल्या मंगळयानानं आपला मंगळार्पयतचा प्रवास सेकंदाला 22 किलोमीटर एवढय़ा वेगानं केला होता; परंतु मंगळाच्या जवळ पोहोचेर्पयत त्यानं तो घटवून सेकंदाला 5.1 किलोमीटर एवढा कमी केला होता. परंतु, मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येत त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी तो सेकंदाला 4.3 किलोमीटर एवढा कमी करणं आवश्यक होतं. ते साध्य करण्यासाठी त्याला गती देणा:या इंजिनाला आता उलटय़ा दिशेनं ज्वलन करावं लागणार होतं. त्यात त्याला मदत करण्यासाठी यानावर लिक्विड अॅपॉजी मोटर ही यंत्रणा सज्ज होती. तब्बल 3क्क् दिवसांच्या निद्रेतून तिला जागं करण्यातही यश मिळालं होतं. आता खोटी होती ती त्या यंत्रणोच्या निकराच्या करामतीची. कारण वेगातली ती घट अंमळ जास्ती झाली असती, तर यान मंगळाच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं असतं आणि ती घट अंमळ कमी झाली असती, तर यान मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचं क्षेत्र ओलांडून तसंच पुढं कुठे तरी भरकटत गेलं असतं. अगदी हवी तेवढीच घट अत्यंत अचूकपणो घडवून आणण्याची कामगिरी त्या यंत्रणोला आता करायची होती. पण, ती तिनं निर्वेध पार पाडली आणि भारतानं इतिहास घडविला. 
असा पराक्रम करणारा पहिला देश, इतकं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान संपूर्णपणो स्वबळावर साधणारा पहिला देश, संपूर्ण यानाची आणि त्याला अवकाशात ङोप घेण्यासाठी मदत करणा:या अग्निबाणाचीही बांधणी स्वदेशी सुटय़ा भागांना जोडूनच करणारा पहिला देश आणि हे सारं कमीत कमी खर्चात अतिशय किफायतशीर करणारा पहिला देश हा मान भारतानं मिळवला आहे. आपल्या अंतराळवैज्ञानिकांच्या कौशल्याची आणि निष्ठेची ती देणगी आहे. 
मंगळयानानं मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या आधी दोनच दिवस अमेरिकेचंही मेव्हन हे यान तिथं पोहोचलं होतं. पण त्यांचे पहिले तीन-चार प्रय} विफल गेले होते. मेव्हनची बांधणी करण्यासाठीही अमेरिकेला 3 र्वष लागली होती. आपण ती कामगिरी 15 महिन्यांमध्येच पार पाडली आणि तीही अमेरिकेच्या एकदशांश खर्चात. एकूण खर्च किती तर फक्त 45क् कोटी रुपये. मंगळयानाचा एकूण प्रवास 65 कोटी किलोमीटर झाला. म्हणजे दर किलोमीटरमागे केवळ 7 रुपये खर्च आला. गावातल्या गावात रिक्षाचा प्रवासही याहून महाग असतो. 
 आपल्या गरीब देशाला ही अंतराळसंशोधनाची चैन परवडणारी नाही, असं एक तुणतुणं बरेच जण वाजवत असतात. त्यालाही या संशोधकांनी चोख उत्तर दिलं आहे. कारण, या मंगळयानाच्या सफरीसाठी दरडोई 4 रुपयांहूनही, म्हणजेच एका कटिंग चहापेक्षाही कमी खर्च आला आहे. 
हे साध्य झालं, कारण या वैज्ञानिकांनी अंथरूण लांब-रुंद करण्याचा मार्ग पत्करला. ते पाहून आपले हातपाय आखडून घेतले नाहीत. हीच वृत्ती सर्वानीच आणि सर्वच क्षेत्रंमध्ये दाखवली, तर मग आपली भूमी सुजलाम्-सुफलाम् व्हायला वेळ लागणार नाही.