शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंथरूण पाहून.?

By admin | Updated: September 30, 2014 00:07 IST

आपल्या समाजाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती, असा सवाल केल्यास त्याचं पटकन उत्तरं देता येतील, ह्यचलता है ही मानसिकता आणि अल्पसंतुष्ट वृत्ती.

डॉ. बाळ फोंडके
पत्रकार व विज्ञान लेखक
आपल्या समाजाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती, असा सवाल केल्यास त्याचं पटकन उत्तरं देता येतील, ह्यचलता है ही मानसिकता आणि अल्पसंतुष्ट वृत्ती. अंथरूण पाहून पाय पसरावेत हेच आपलं धोरण असावं, असं लहानपणापासून प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जातं. अंथरूण तोकडं पडत असेल, तर ते मोठं करण्याची, आपले पाय झाकले जातील इतकं लांब-रुंद करण्याची धडपड का करायची नाही, असा प्रश्न विचारण्यालाही मुभा दिली जात नाही. कोणी धीटपणो असं विचारलंच, तर जास्त शहाणपणा करू नकोस; सांगतो ते मुकाटय़ानं ऐक, असा दमही दिला जातो. त्यामुळेच आपल्यात एकंदरीत विजिगीषू वृत्तीचा अभाव आढळतो. 
हे सर्वच क्षेत्रंत दिसून येतं. आपल्या शाळेत पहिला आला, बस्स बाजी मारली. त्यापुढे जाऊन जिल्ह्यात, राज्यात, देशात अव्वल येण्याची आकांक्षाही बाळगली जात नाही. मग, जगात आघाडीवर राहावं, ही इच्छा मनात कुठून पैदा होणार! आणि तशी झालीच तर जे सर्वागसुंदर आहे, परिपूर्ण आहे, असं काही करण्याच्या आड तीच आहे. त्यात चालवून घेण्याचं धोरण आड येतं. 
पण, यालाही काही जण अपवाद ठरतात. ते ही धोरणं मान्य करीत नाहीत. एक्सलन्सची कास धरतात. सर्वस्व झोकून एखादी गोष्ट साध्य करण्याचा प्रय} करतात. इतर कोणीच आजवर ते केलेलं नाही, ही त्यांना अडचण वाटत नाही. उलट ते आव्हान ठरतं. त्याचाच ध्यास ते घेतात. 
असाच ध्यास आपल्या अंतरिक्ष वैज्ञानिकांनी घेतलेला आहे. म्हणून तर आजवर अमेरिका, रशिया, युरोपीय समुदाय, जपान, चीन यासारख्या बलाढय़ आणि तंत्रज्ञानसमृद्ध देशांना जे साध्य झालं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या पहिल्याच प्रय}ात त्यांनी श्रीहरिकोटय़ाहून धाडलेलं मंगळयान यशस्वीरीत्या मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं आहे. ते करताना त्यांनी अनेक कसोटय़ा पार पाडल्या; पण त्यातल्या त्यात अखेरची कसोटी श्वास रोखून 
धरायला लावणारी होती. त्यांच्या कौशल्याची कठोर परीक्षा पाहणारी होती. कारण, दर सेकंदाला 11.4 किलोमीटर अशा वेगानं धरतीची नाळ तोडत निघालेल्या मंगळयानानं आपला मंगळार्पयतचा प्रवास सेकंदाला 22 किलोमीटर एवढय़ा वेगानं केला होता; परंतु मंगळाच्या जवळ पोहोचेर्पयत त्यानं तो घटवून सेकंदाला 5.1 किलोमीटर एवढा कमी केला होता. परंतु, मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येत त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी तो सेकंदाला 4.3 किलोमीटर एवढा कमी करणं आवश्यक होतं. ते साध्य करण्यासाठी त्याला गती देणा:या इंजिनाला आता उलटय़ा दिशेनं ज्वलन करावं लागणार होतं. त्यात त्याला मदत करण्यासाठी यानावर लिक्विड अॅपॉजी मोटर ही यंत्रणा सज्ज होती. तब्बल 3क्क् दिवसांच्या निद्रेतून तिला जागं करण्यातही यश मिळालं होतं. आता खोटी होती ती त्या यंत्रणोच्या निकराच्या करामतीची. कारण वेगातली ती घट अंमळ जास्ती झाली असती, तर यान मंगळाच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं असतं आणि ती घट अंमळ कमी झाली असती, तर यान मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचं क्षेत्र ओलांडून तसंच पुढं कुठे तरी भरकटत गेलं असतं. अगदी हवी तेवढीच घट अत्यंत अचूकपणो घडवून आणण्याची कामगिरी त्या यंत्रणोला आता करायची होती. पण, ती तिनं निर्वेध पार पाडली आणि भारतानं इतिहास घडविला. 
असा पराक्रम करणारा पहिला देश, इतकं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान संपूर्णपणो स्वबळावर साधणारा पहिला देश, संपूर्ण यानाची आणि त्याला अवकाशात ङोप घेण्यासाठी मदत करणा:या अग्निबाणाचीही बांधणी स्वदेशी सुटय़ा भागांना जोडूनच करणारा पहिला देश आणि हे सारं कमीत कमी खर्चात अतिशय किफायतशीर करणारा पहिला देश हा मान भारतानं मिळवला आहे. आपल्या अंतराळवैज्ञानिकांच्या कौशल्याची आणि निष्ठेची ती देणगी आहे. 
मंगळयानानं मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या आधी दोनच दिवस अमेरिकेचंही मेव्हन हे यान तिथं पोहोचलं होतं. पण त्यांचे पहिले तीन-चार प्रय} विफल गेले होते. मेव्हनची बांधणी करण्यासाठीही अमेरिकेला 3 र्वष लागली होती. आपण ती कामगिरी 15 महिन्यांमध्येच पार पाडली आणि तीही अमेरिकेच्या एकदशांश खर्चात. एकूण खर्च किती तर फक्त 45क् कोटी रुपये. मंगळयानाचा एकूण प्रवास 65 कोटी किलोमीटर झाला. म्हणजे दर किलोमीटरमागे केवळ 7 रुपये खर्च आला. गावातल्या गावात रिक्षाचा प्रवासही याहून महाग असतो. 
 आपल्या गरीब देशाला ही अंतराळसंशोधनाची चैन परवडणारी नाही, असं एक तुणतुणं बरेच जण वाजवत असतात. त्यालाही या संशोधकांनी चोख उत्तर दिलं आहे. कारण, या मंगळयानाच्या सफरीसाठी दरडोई 4 रुपयांहूनही, म्हणजेच एका कटिंग चहापेक्षाही कमी खर्च आला आहे. 
हे साध्य झालं, कारण या वैज्ञानिकांनी अंथरूण लांब-रुंद करण्याचा मार्ग पत्करला. ते पाहून आपले हातपाय आखडून घेतले नाहीत. हीच वृत्ती सर्वानीच आणि सर्वच क्षेत्रंमध्ये दाखवली, तर मग आपली भूमी सुजलाम्-सुफलाम् व्हायला वेळ लागणार नाही.