शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘नाम’ तुझे सलाम

By admin | Updated: February 8, 2016 03:36 IST

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हे संतवचन सर्वज्ञात आहे. पण त्याची प्रचिती त्यांनाच येते, जी माणसे ते संतवचन प्रत्यक्षात तसे जगण्याचा प्रयत्न करतात.

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हे संतवचन सर्वज्ञात आहे. पण त्याची प्रचिती त्यांनाच येते, जी माणसे ते संतवचन प्रत्यक्षात तसे जगण्याचा प्रयत्न करतात. पेरलेच नाही तर उगवेल कसे? यासाठी आधी कोणीतरी पेरायची तयारी करायला हवी. याचा अर्थ याआधी कुणी पेरलेच नाही असा होत नाही. आख्खे आयुष्य पणाला लावून आणि हाडाची काडे करून ओल्या मातीत सृजनाचा नवा आविष्कार पाहण्यासाठी बळीराजा नावाचा एक सोशिक, भोळा-भाबडा प्राणी याच मातीत राबराब राबतोय, जगाच्या अन्नाची सोय करतोय आणि एक वेळ आज अशी आली आहे की, तो दाताच आता काही ठिकाणी एकवेळच्या अन्नाला मौताज झाला आहे. ही परिस्थिती का उद्भवली, हे दुखणे कायमचे नष्ट होण्यासाठी काय करायला हवे याविषयी कोणीच काही बोलायला तयार नाही. केवळ संपुटामागून संपुटांचे वाटप करूनही हा प्रश्न निकाली निघू शकत नाही. कारण एकदा मंजूर झालेल्या संपुटांचे नंतर काय होते ते साऱ्यांनाच ठाऊक असते. त्यामुळे संपुटांच्या वाटपानंतरही आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. किरकोळ रकमेपायी शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागू नयेत यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोन अभिनेते एकत्र येतात, ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना करतात आणि गावोगावी जाऊन आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रारंभी पदरमोड करून मदतीचे धनादेश देतात. या मदतीतूनही हा प्रश्न निकाली निघणार नाही हे नानालाही ठाऊक आहे, पण त्यांची फाटकी परिस्थिती सांधण्यासाठी काहीसा हातभार तरी लावेल या भावनेने नानाने उचललेले पाऊल सर्वच स्तरावर कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरले आहे. ‘आपण समाजाचे सतत काही ना काही देणे लागतो. आपल्याला देवाने दोन हात दिलेले आहेत त्याचे कारण आपल्याला ते दोन हात पुरेसे आहेत. त्या दोन हातामध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला पुरेसे आहे. ते दोन हात भरल्यानंतर ते मातीत पडण्याआधी लोकांना देऊन टाका तुम्ही, नाहीतर ते जाणारच आहे...’ असा विचार नानाने एका कार्यक्रमातून मांडला होता. त्या विचारांची अंमलबजावणी ‘नाम’च्या माध्यमातून करून ‘बोले तैसा चाले’ची प्रचिती नानाने दिली आहे. जे पुढाऱ्यांना जमले नाही ते काम नाना करतोय. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांकडून मदतीचा हातही मिळतोय. आता पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करण्याचा आणि आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पशुपालन व शिवणकामाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा संकल्प ‘नाम’ने केला आहे. ‘नाम’च्या कामाला सलामचा करायला हवा. अशा चांगल्या विचारांची पेरणी होण्याची गरज निर्माण झाली आहे.