शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

‘नाम’ तुझे सलाम

By admin | Updated: February 8, 2016 03:36 IST

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हे संतवचन सर्वज्ञात आहे. पण त्याची प्रचिती त्यांनाच येते, जी माणसे ते संतवचन प्रत्यक्षात तसे जगण्याचा प्रयत्न करतात.

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हे संतवचन सर्वज्ञात आहे. पण त्याची प्रचिती त्यांनाच येते, जी माणसे ते संतवचन प्रत्यक्षात तसे जगण्याचा प्रयत्न करतात. पेरलेच नाही तर उगवेल कसे? यासाठी आधी कोणीतरी पेरायची तयारी करायला हवी. याचा अर्थ याआधी कुणी पेरलेच नाही असा होत नाही. आख्खे आयुष्य पणाला लावून आणि हाडाची काडे करून ओल्या मातीत सृजनाचा नवा आविष्कार पाहण्यासाठी बळीराजा नावाचा एक सोशिक, भोळा-भाबडा प्राणी याच मातीत राबराब राबतोय, जगाच्या अन्नाची सोय करतोय आणि एक वेळ आज अशी आली आहे की, तो दाताच आता काही ठिकाणी एकवेळच्या अन्नाला मौताज झाला आहे. ही परिस्थिती का उद्भवली, हे दुखणे कायमचे नष्ट होण्यासाठी काय करायला हवे याविषयी कोणीच काही बोलायला तयार नाही. केवळ संपुटामागून संपुटांचे वाटप करूनही हा प्रश्न निकाली निघू शकत नाही. कारण एकदा मंजूर झालेल्या संपुटांचे नंतर काय होते ते साऱ्यांनाच ठाऊक असते. त्यामुळे संपुटांच्या वाटपानंतरही आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. किरकोळ रकमेपायी शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागू नयेत यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोन अभिनेते एकत्र येतात, ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना करतात आणि गावोगावी जाऊन आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रारंभी पदरमोड करून मदतीचे धनादेश देतात. या मदतीतूनही हा प्रश्न निकाली निघणार नाही हे नानालाही ठाऊक आहे, पण त्यांची फाटकी परिस्थिती सांधण्यासाठी काहीसा हातभार तरी लावेल या भावनेने नानाने उचललेले पाऊल सर्वच स्तरावर कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरले आहे. ‘आपण समाजाचे सतत काही ना काही देणे लागतो. आपल्याला देवाने दोन हात दिलेले आहेत त्याचे कारण आपल्याला ते दोन हात पुरेसे आहेत. त्या दोन हातामध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला पुरेसे आहे. ते दोन हात भरल्यानंतर ते मातीत पडण्याआधी लोकांना देऊन टाका तुम्ही, नाहीतर ते जाणारच आहे...’ असा विचार नानाने एका कार्यक्रमातून मांडला होता. त्या विचारांची अंमलबजावणी ‘नाम’च्या माध्यमातून करून ‘बोले तैसा चाले’ची प्रचिती नानाने दिली आहे. जे पुढाऱ्यांना जमले नाही ते काम नाना करतोय. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांकडून मदतीचा हातही मिळतोय. आता पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करण्याचा आणि आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पशुपालन व शिवणकामाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा संकल्प ‘नाम’ने केला आहे. ‘नाम’च्या कामाला सलामचा करायला हवा. अशा चांगल्या विचारांची पेरणी होण्याची गरज निर्माण झाली आहे.