शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या राज्यात रस्त्यांचे घोटाळे

By admin | Updated: May 2, 2016 02:15 IST

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाही सोबतीला आहे. महापालिका निवडणुकीला एक वर्ष उरले असताना कोट्यवधी रुपयांचा रस्ता घोटाळा समोर आल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे.

- यदु जोशीमुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाही सोबतीला आहे. महापालिका निवडणुकीला एक वर्ष उरले असताना कोट्यवधी रुपयांचा रस्ता घोटाळा समोर आल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत केवळ ३४ रस्त्यांच्या दुरुस्ती कामांमध्ये तब्बल ३५२ कोटी २० लाख रुपयांचा घोटाळा समोर यावा ही शिवसेनेसाठी लाजिरवाणी बाब आहे. याप्रकरणी कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि होईलही; पण सत्तापक्षाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. ‘पैशांच्या भानगडी मातोश्रीवर चालत नाहीत’ असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत ठणकावून सांगितले होते. त्याच मातोश्रीची सत्ता महापालिकेत असताना घोटाळे व्हावेत हे भूषणावह नक्कीच नाही. सत्तापक्षाचा प्रशासनावर नीट अंकुश नाही किंवा परस्पर सामंजस्याने सगळे चालते असाही त्याचा अर्थ निघू शकतो. शिवाय, मुंबई महापालिकेत पदाधिकारी, नगरसेवकांचे कंत्राटदारांशी असलेले साटेलोटे लपून राहिलेले नाही. रस्ते घोटाळ्यातही तसेच काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका निवडणुकीला एक वर्ष उरले असताना असे घोटाळे समोर येणे शिवसेनेच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. या निमित्ताने शिवसेनेवर शरसंधान साधण्याची आयती संधी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सत्तेत असूनही सोयीनुसार मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाचीही भूमिका बजावणाऱ्या भाजपाला मिळाली आहे. राज्य सरकारमध्ये काही घोटाळे झाले तर त्याचा मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची खाती असलेल्या भाजपाकडे जातो. हेच सूत्र मुंबई महापालिकेत शिवसेनेला लागू होते. खड्डेमुक्त मुंबईचे आश्वासन शिवसेना देत आली आहे; पण खड्ड्यांपासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही आणि होणारही नाही. सेनाभवन, मातोश्रीजवळचे रस्ते खड्डेमुक्त नाहीत तर बाकीच्यांची काय कथा? या घोटाळ्यांमध्ये सहा कंत्राटदारांची नावे समोर आली आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, हा विषय एवढ्यावरच मर्यादित न राहता या दोन्हींच्या संपत्तीचीही तसेच, कंत्राटदारांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना काही आर्थिक लाभ पोहोचविण्यात आला होता का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. जो घोटाळा झाला त्यातील पैसा हा सर्वसामान्य माणसांनी भरलेल्या करांमधून आला आहे. त्यामुळे त्याचा जाब विचारण्याचा अधिकार प्रत्येक मुंबईकराला पोहोचतो. जे काम झालेच नाही ते झाल्याचे दाखविण्यात आले, उपअभियंते, सहाय्यक अभियंते, कार्यकारी अभियंत्यांपासून एकाही अधिकाऱ्याने काम निकृष्ट झाल्याचा अहवाल कुठेही दिलेला नाही. ही बाब त्यांचे कंत्राटदारांशी संगनमत होते हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्यानेच कंत्राटदारांचे फावले, असे मेहतांच्या अहवालात म्हटले आहे. या रस्त्यांबाबत जे थर्ड पार्टी आॅडिटर्स नेमले होते त्यांनी खोटी प्रमाणपत्रे दिली. महापालिकेच्या दक्षता विभागाने त्यांची खातरजमा केली नाही याचा अर्थ पाणी तिथेही मुरले का हे तपासले पाहिजे. आणखी २०० रस्त्यांच्या दुरुस्तीची एक हजार कोटी रुपयांची कामे झाली. त्याची चौकशी या आठवड्यापासून सुरू होत असून ती अशीच नि:पक्षपातीपणे होऊन मुंबईकरांना खड्डयात घालणाऱ्या सगळ्यांची लक्तरे गेट वे आॅफ इंडियावर टांगली जाण्याची आवश्यकता आहे. रस्ते दुरुस्तीची कामे करताना त्याचे ढिगारे आम्ही पनवेल तालुक्यातील कोळके गावानजीक टाकले असे एका कंत्राटदाराने म्हटले होते. मेहता यांची चौकशी यंत्रणा तिथे गेली तर काहीही दिसले नाही. एकच काम अनेकवेळा केल्याचे दाखविण्यात आले. नाईट लाईफ वगैरेचे ठीक आहे पण शिवसेनेने दिव्याखालचा अंधार घालविला तर मुंबईचे हित होईल.जे कोणी कंत्राटदार आणि अधिकारी घोटाळेबाज आहेत त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय जरब बसणार नाही. वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद, ठाण्यातील नागरी सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणून भावनिक राजकारण करता येते प्रश्न सुटत नाहीत.केंद्रापासून मुंबईपर्यंत अजूनतरी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाची नागपुरात सत्ता आहे. गडकरी-फडणवीसांच्या या शहरातील रस्ते अतिशय सुंदर आहेत. तेही एकदा बघायला हरकत नाही. नागपूरच्या गडकरींनी मुंबईत पूल बांधले. शिवसेनेला मुंबईतल्या मुंबईत खड्डेमुक्त रस्ते देता येऊ नयेत?