शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

नकार होकार नकार

By admin | Updated: February 4, 2016 03:19 IST

अभिनेता अनुपम खेर यांच्या प्रस्तावित पाकिस्तान यात्रेच्या कथेला अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित वळणे मिळत मिळत अखेर या कथेचा क्लायमॅक्स खुद्द खेर यांनी स्वत:च लिहून आपली

अभिनेता अनुपम खेर यांच्या प्रस्तावित पाकिस्तान यात्रेच्या कथेला अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित वळणे मिळत मिळत अखेर या कथेचा क्लायमॅक्स खुद्द खेर यांनी स्वत:च लिहून आपली पाक यात्रा गुंडाळून टाकल्याचे जाहीर केले आहे. मुळातच भारत-पाक दरम्यानचे संबंध फारसे मधुर नसले तरी ते मधुर व्हावेत म्हणून उभय बाजूचे लोक वरकरणी तरी तशी इच्छा बोलून दाखवित असतात पण हे बोलणे कृतीत कसे उतरत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणून खेर यांना पाकिस्तानने दिलेल्या नकाराकडे बघता येईल. कराची येथील नियोजित ग्रंथ मेळाव्यासाठी भारतातील ज्या अठरा लोकाना संबंधित आयोजकांनी निमंत्रण दिले होते त्यात खेर यांचाही समावेश होता. त्यातील खेर वगळता बाकीच्यांना पाकी सरकारने ‘प्रवास परवाना’ (व्हिसा नव्हे) जारी केला. त्याचवेळी खेर यांना तो मागूनही मिळणार नाही म्हणून त्यांना तसा अर्जच करायला सांगू नका असे दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासाने म्हणे आयोजकांना कळविले. त्यावर आपल्याला पाकिस्तानने प्रवेश नाकारला आणि नाकारण्याची ही तिसरी वेळ आहे असे जाहीर करुन खेर यांनी त्याचे भांडवल करण्यास सुरुवात केली. तसे करताना आपण काश्मीरी पंडित आहोत, मोदी समर्थक आहोत, वाढत्या असहिष्णूतेसंबंधी बोलणाऱ्यांना आपण विरोध केला वगैरे वगैरे कारणे सांगून त्यापायीच आपल्याला पाकने व्हिसा नाकारला असावा असे अनुमान त्यांनी काढले. वास्तविक पाहाता ज्या कारणांपायी व्हिसा नाकारला गेला असे त्यांना वाटत होते त्यातील कशाचाही थेट पाकिस्तानशी काही संबंध नव्हता. अलीकडेच भारत सरकारने पद्मभूषण जाहीर करुन ज्यांचा गौरव केला आणि अभिनय क्षेत्रात ज्यांची कामगिरी खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे अशा अनुपम खेर यांच्यासाठी पाकिस्तानने आपले दरवाजे बंद करण्याचे वृत्त प्रसारित होताच खळबळ माजणे स्वाभाविकच होते. तशी ती माजलीदेखील. त्यानंतर मात्र पाकिस्तानचे दिल्लीतील राजदूत अब्दुल बासीत यांनी म्हणे जातीने खेर यांना दूरध्वनी केला आणि नंतर ट्विटदेखील केले आणि खेर यांचे पाकिस्तानात स्वागत करण्याचे व त्यासाठी त्यांना व्हिसा देण्याचे निमंत्रण दिले. तेच आता खेर यांनी नाकारले आहे. काश्मीर समस्या सुटेल तेव्हां सुटेल पण तोवर दोन्ही देशांदरम्यानचे किमान सांस्कृतिक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने तरी प्रयत्न केले गेले पाहिजेत या भूमिकेला शिवसेनेसारख्या संघटनेने हरताळ फासणे वेगळे पण अनुपम खेर प्रकरणात हरताळ फासण्याचे काम खुद्द त्या देशाच्या दिल्लीतील दूतावासानेच केल्याचे या प्रकरणात दिसून आल्याने पाकी गझल गायक गुलाम अलि यांना दिल्या गेलेल्या वागणुकीचा बदला म्हणून खेर यांना तशाच प्रकारची अवमानकारक वागणूक दिली गेली असल्यास दोन्ही देशांमधील संबंध किती नासले गेलेले आहेत याचे दर्शन पुन्हा एकदा घडून आले, इतकेच