शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉरच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार अत्यावश्यक

By admin | Updated: June 12, 2016 05:33 IST

सेन्सॉर बोर्ड हे नेहमीच वादाचा विषय राहिले आहे. किंबहुना, सेन्सॉर बोर्ड हवेच कशाला, असेही मानणारा एक वर्ग आहे. तथापि, सेन्सॉर बोर्डचे प्रयोजन संपूर्णत: रद्द ठरवण्याइतका आपला समाज प्रबुद्ध झाला

- गिरीश कुलकर्णी, अभिनेतासेन्सॉर बोर्ड हे नेहमीच वादाचा विषय राहिले आहे. किंबहुना, सेन्सॉर बोर्ड हवेच कशाला, असेही मानणारा एक वर्ग आहे. तथापि, सेन्सॉर बोर्डचे प्रयोजन संपूर्णत: रद्द ठरवण्याइतका आपला समाज प्रबुद्ध झाला आहे काय, हाही एक मूलभूत प्रश्न आहे आणि त्याचे विश्लेषण परखडपणाने व्हायला हवे आहे. सेन्सॉर बोर्ड आवश्यकच आहे, हे घटकाभर गृहीत धरले, तरी नव्या संवेदनांना आणि जाणिवांना कात्री लावण्याचे काम मात्र, या यंत्रणेकडून खचितच अपेक्षित नाही. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार होणे अत्यावश्यक आहे.देशात सर्व महत्त्वाच्या भाषांमध्ये मिळून जवळपास सोळाशे चित्रपट दरवर्षी बनतात आणि केंद्रीय सेन्सॉर बोर्ड त्या बारकाईने बघून त्याला प्रसंगी कात्री लावत असते. सेन्सॉर बोर्डाने लावलेली कात्री, सुचवलेले बदल आणि केलेली वर्गवारी ही अंतिम मानली जाते, परंतु गेली कित्येक वर्षे हाच वादाचा मुद्दा राहिला आहे. सेन्सॉर बोर्डाची वाढती मनमानी आणि तेथील राजकारण हे मनोरंजनाच्या क्षेत्रात तर अनेकदा वादाचा विषय ठरत आले आहेत. सेन्सॉर बोर्डाकडून वारंवार होणाऱ्या या चुकांवर नियंत्रण असले पाहिजे. एखाद्या चित्रपटातील दृश्यांना कात्री लावणे, भाषेवर आक्षेपण घेणे हे मुळातच कायद्यात बसणारे नाही, या प्रक्रियेचा पुन्हा विचार झाला पाहिजे. सेन्सॉर बोर्डावर असलेल्यांकडून अशा प्रकारे सत्ता लादण्याची हे फिल्ममेकर्सचे खच्चीकरण केल्यासारखे आहे. या हुकूमशाही सत्तेवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने न्यायव्यवस्थेकडे दाद मागायची वेळ आली आहे. सध्या ‘उडता पंजाब’च्या बाबतीत जे घडतेय, ते बऱ्याचदा मराठी, हिंदी वा इतरही कलाकारांच्या वाट्याला येतेच, पण त्यावर आता कृतिशील पाऊल उचलले पाहिजे. प्रशासन स्तरावर कोणीच दखल घेत नाही, म्हणूनच दिग्दर्शक अनुराग कश्यपला न्यायालयाची पायरी चढणे भाग पडले. न्यायव्यवस्था तात्कालिक निकाल सांगत नाही, त्यामुळे न्यायालयाची या विषयची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. सेन्सॉरच्या मनमानी कारभारासोबतच ‘एजंटगिरी’वर बंदी घातली पाहिजे. या एजंट्समुळे बऱ्याचदा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून फिल्ममेकर्सला जावे लागते. त्यामुळे या दलालांवरही नियंत्रण असणारी घटकव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. या पलीकडे सध्या सोशल मीडियाच्या व्यासपीठांवरून व्हायरल होणाऱ्या गैरसमजुतींवर बंधन आले पाहिजे. केवळ ‘पोळी भाजून घ्यायची’ अशा भूमिकेने व्हायरल होणाऱ्या बऱ्याच गोष्टी या चुकीच्या समजुतींना खतपाणी घालतात. चित्रपटांमुळे सामाजिक नीतिमत्ता सुधारत किंवा बिघडत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आजकाल इंटरनेटच्या प्रसारामुळे घरबसल्या हवे नको ते पाहता येते. आजची पिढी सुबुद्ध व विचारवंत आहे. चांगल्या-वाईटाचीही त्यांना जाण आहे. त्यामुळे चित्रपटांवर कडक निर्बंध घालून काही होणार नाही. याउलट, सेन्सॉर बोर्डाने कुठल्याच चित्रपटाला कात्री लावू नये, किंबहुना, चित्रपटांची वर्गवारी आणि दिग्दर्शक- निर्मात्यांना ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगणारी ही एक मार्गदर्शक संस्था असावी. (शब्दांकन : स्नेहा मोरे)‘उडता पंजाब’ या चित्रपटाबाबत न्यायालय सोमवारी म्हणजेच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार दिवस आधी निर्णय देणार आहे.या चित्रपटात पंजाबमधील सध्याची तरुणाई अमली पदार्थांच्या जाळ्यात कशी अडकलीय, हे दाखवले आहे. या चित्रपटात ड्रग्जचा व्यवसाय कसा फोफावला आहे, या भाष्य केले आहे.चित्रपटाच्या नावातून ‘पंजाब’ शब्द वगळण्याचीही सूचना केली, असे बोर्डाने न्यायालयात सांगितले.शाहिद कपूर याच्या भूमिकेबाबत व त्याच्या शब्दफेकीवर सेन्सार बोर्डाने आक्षेप घेतला आहे.