शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

रामलीला-मोदींची आणि रा.स्व. संघाची

By admin | Updated: October 1, 2014 01:39 IST

आपल्या प्रभावास मोदी आव्हान देणार नाहीत असे संघ नेतृत्वाला वाटते. पण ते जितके जास्त काळ सत्तेवर राहतील तितके ते रा.स्व. संघाला ते कमी लेखतील. मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाने हेच दाखवून दिले आहे.

आपल्या प्रभावास मोदी आव्हान देणार नाहीत असे संघ नेतृत्वाला वाटते. पण ते जितके जास्त काळ सत्तेवर राहतील तितके ते रा.स्व. संघाला ते कमी लेखतील. मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाने हेच दाखवून दिले आहे.
 
त्या विजयदशमीच्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आकाशवाणीवरून राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. हा सण हिंदू समाज सत्प्रवृत्तींचा दुष्प्रवृत्तींवर विजय या स्वरूपात साजरा करीत असतो. गेल्या 9क् वर्षापासून दसरा हा दिवस राजकीय दिनदर्शिकेत महत्त्वाचे स्थान मिळवून बसला आहे. कारण याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे नागपूर या संघाच्या मुख्यालयातून दस:याचे भाषण देत आले आहेत. रा.स्व. संघाशी जुळलेले लोकच हे भाषण पूर्वी ऐकत असत. पण विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीची चळवळ 198क् नंतर सुरू केल्यापासून सांस्कृतिक राष्ट्रीयता ही मुख्य प्रवाहाचा भाग बनली त्यामुळे सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण मीडियाचे आकर्षण केंद्र ठरू लागले. या भाषणातूनच भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची दिशाही ठरू लागली. रा.स्व. संघाच्या परिवाराच्या कार्यक्रमाचे स्वरूप याच भाषणाच्या आधारे ठरू लागले.
रा.स्व. संघाच्या सरसंघचालकांचे भाषण विजयादशमीला होण्यापूर्वी आपले राष्ट्राला उद्देशून असलेले भाषण रेडिओतून प्रसारित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना आहे. त्यामुळे हे भाषण सरसंघचालकांच्या भाषणाचे महत्त्व कमी करील असे वाटते. मोदींचे दस:याचे भाषण हे राजकीय उद्दिष्टाने प्रेरित राहणार असल्याने ते लोकांच्या अधिक आकर्षणाचे केंद्र बनेल असे वाटते. त्यामुळे मीडियाकडून आणि लोकांकडूनही पंतप्रधानांच्या आणि सरसंघचालकांच्या भाषणाची तुलना केली जाईल का? कुणाला टी.आर.पी. जास्त मिळेल, 
या कार्यक्रमातून रा.स्व. संघापेक्षा मोदी मोठे होतील का?
अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असताना त्यांचे अस्तित्व हे रा.स्व. संघासाठी कधीच आव्हानात्मक ठरले नाही. त्यांनी कधीही रा.स्व. संघाच्या नेतृत्वाची जागा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट संघाने अनेकदा सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढल्याने रा.स्व. संघाच्या महत्त्वाला कधी बाधा पोचली नाही. रा.स्व. संघाने भाजपाची राजकीय ओळख स्वतंत्र ठेवण्याचाच प्रय} केला. पण मोदी मात्र संघाला अशी संधी देताना दिसत नाहीत. 
नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान बनण्याची आपली आकांक्षा 2क्11 मध्ये पहिल्यांदा प्रकट केली. तेव्हापासून ते आणि सरसंघचालक यांची एकमेकांवर मात करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या आणि संघाच्या संबंधात कटुता निर्माण झाली होती. गुजरात रा.स्व. संघाच्या प्रांतप्रचारकांपेक्षा मोदी श्रेष्ठ आहेत का, असा वाद तेव्हा निर्माण झाला होता. तेव्हापासूनच राजनाथसिंह, सुषमा स्वराज किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदींना मान्यता मिळेल का याचा विचार सुरू झाला होता. अखेर संघाने मोदींची निवड केली, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला विजय मिळू शकेल असे परिवाराला वाटू लागले होते. संघाच्या कार्यक्रमापाससून मोदी हे विचलित होणार नाहीत असा परिवाराला त्यांच्याविषयी विश्वास वाटत होता. सरकारात असल्याने काही गोष्टी मान्य कराव्या लागतील अशी परिवाराने स्वत:ची समजूत करून घेतली होती आणि संघ स्वयंसेवकांचीही तशी समजूत करून देण्यात आली होती. मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाची रा.स्व. संघाच्या नेत्यांना पूर्ण कल्पना होती. मोदींना पर्यायी सत्ताकेंद्र नको असते हे परिवाराला ठाऊक होते. पण आपला अजेंडा राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी संघाने मोदींना पत्करले.
रा.स्व. संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यात एक मूलभूत फरक आहे. मोदींच्या सगळ्या हालचाली त्यांचा स्वत:चा प्रभाव वाढविण्यासाठी सुरू असतात. तर संघाकडून संघाच्या विचारांचा प्रभाव राष्ट्रीय पातळीवर वाढविण्याचे प्रयत्न सुरू असतात. संस्थाचालक निर्माण करणो हे मोदींच्या स्वभावात नाही. आपल्यानंतर कारभार हाती घेण्यासाठी त्यांनी गुजरातमधील नेत्यांना तयार केले नाही. त्यामुळे गुजरातमधून मोदी निघून जाताच राज्यात झालेल्या नऊ पोटनिवडणुकांपैकी तीन निवडणुकात भाजपाला पराभव पाहावा लागला. मोदींचा प्रभाव देशात वाढला, पण राज्यात मात्र तो घटला हेच यावरून दिसून येते. त्यामुळे राज्यातील भाजपामध्ये पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
हे सर्व पाहता दस:याच्या भाषणातून मोदी हे रा.स्व. संघाचा प्रभाव निश्चितपणो कमी करतील असे दिसते. आगामी वर्षात हाच प्रकार सुरू राहील अशी चिन्हे दिसत आहेत. मोदी नावाच्या वादळाचा मुकाबला करण्यासाठी रा.स्व. संघाकडून कोणते डावपेच आखण्यात येतात हेच आता पाहायचे. आपल्या प्रभावास मोदी आव्हान देणार नाहीत असे संघ नेतृत्वाला वाटते. पण ते जितके जास्त काळ 
सत्तेवर राहतील तितके ते रा.स्व. संघाला कमी लेखतील. मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाने हेच दाखवून दिले आहे. पंतप्रधानांनी धार्मिक सणाचा वापर 
राष्ट्राला उद्देशून भाषण करण्यासाठी करावा का या विषयावर राष्ट्रीय चर्चा सुरू होऊ शकते. रा.स्व. संघाला हे स्वातंत्र्य जसे होते, तसेच मुस्लीम सणांच्या 
बाबतीत शाही इमामांनाही असे स्वातंत्र्य असते पण पंतप्रधानांनीे विजयादशमीला राष्ट्राला उद्देशून भाषण देणो कितपत योग्य आहे? मोदींनी आपल्या आकाशवाणीवरील भाषणासाठी दुसरा दिवस निवडला असता तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता. पण मग टी.आर.पी. जास्त कुणाचा- मोदींचा की भागवतांचा हाही प्रश्न निर्माण झाला नसता. मोदींनी याच दिवसाची निवड करून संघाला स्पष्ट संकेत दिले आहेत. आपण ते जाणून घ्यायचे की नाही ते ज्याने त्याने ठरवायचे आहे.
 
नीलांजन मुखोपाध्याय
ज्येष्ठ पत्रकार व लेखक