शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

नांगरणी

By admin | Updated: May 30, 2016 03:04 IST

समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे.

समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एक कथा या संदर्भात विलक्षण बोलकी ठरते. पावसाळा तोंडावर आल्याने पेरणीची लगबग सर्वत्र सुरू असताना बुद्ध एका शेताच्या मेरेवरून चालले होते. रानात शेतकऱ्याने औत धरले होते. मन लावून शेतकरी औत हाकत होता. मात्र औताचा तास तिरकाच पडत राहिल्याचे बुद्धांच्या ध्यानात आले. ‘‘अरे, तुझा तास सरळ नाही तर तिरका आहे,’’ असे बुद्धांनी टोकताच, नाही म्हटले तरी शेतकरी वरमलाच. ‘‘अहो संन्यासीबाबा, औत हाकण्यातले आपल्याला काय कळते? आपण काय शेतकरी आहात का?’’ शेतकऱ्याने भगवान बुद्धांना अंमळ त्रासूनच प्रश्न केला. मुखावरची शांती आणि हासू कणभरही ढळू न देता बुद्ध उत्तरले, ‘‘होय, मीसुद्धा तुझ्यासारखा एक शेतकरीच आहे.’’ आता अचंबित होण्याची पाळी होती शेतकऱ्याची! ‘‘महाराज आपण कधी शेती केलीत? कोठे आहे तुमचे शेत?’’ तो शेतकरी विचारता झाला. बुद्ध हसले. म्हणाले, ‘‘अरे, हे माझे शरीर दिसते आहे ना तेच माझे शेत. यातील मन हेच माझे वावर. त्याची नांगरणी करण्यासाठी विवेकाचा नांगर मी त्यांत घालतो. अनिष्ट विचार आणि कुवासनांची धसकटे वेचून काढतो. वैराग्यरूपी अग्नीने राब जाळतो. सद्विचारांचे बीज पेरतो. निर्मळ प्रज्ञेचे सिंचन पुरवतो आणि त्या माझ्या वावरातून निर्वाणाचे अमूप पीक मी पदरात पाडून घेतो.’’ एवढं उत्तर देऊन भगवान आपल्या वाटेने शांतपणे निघून गेले! समाजरूपी शेताची निगराणी संतविचार याच भूमिकेतून करत आलेले आहे. विवेकाचा आग्रह ही परंपरा प्रकर्षाने धरते त्याचसाठी. विवेकाच्या नांगराने आपण आपल्या मनाची भूमी सतत नांगरायची असते. या नांगरणीमध्ये खंड पडता कामा नये. परंतु, विवेकाचा नांगर हाती पेलून मनरूपी शेताची नांगरट अविरत चालू ठेवणे, हे विलक्षण धैर्याचे काम होय. कारण, विवेकाच्या आधारे जीवनाची वाटचाल सुरू राखणे, हे असिधारा व्रतच जणू! म्हणूनच की काय, पण, ‘देह’गाव वसवण्याचे कौलपत्र सुपूर्त केलेल्या ‘जिवा’जीपंत ठाणेदाराला ‘आत्मा’रामपंत कमाविसदार एक मोठा सावधगिरीचा इशारा देऊन ठेवतात. एकनाथांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला समाजमनस्क संत या ठिकाणी आपल्याला अतिशय ठसठशीतपणे प्रतीत होतो. ‘आत्मा’रामपंत ‘जिवा’जीपंतांना बजावतात, ‘‘धैर्याचा नांगर धरून। शेतांमधील खडे काढून। वासनेच्या पालव्या तोडून। संशयाच्या काशा गोळा करून।’’ गावची लावणी करणे. संतपरंपरेने आपल्याला परोपरीने केलेल्या या बोधाचाच नेमका विसर आज पडतो आहे का? विवेकाचा नांगर आपण गुंडाळून अडगळीत फेकून दिलेला आहे का? मनरूपी शेताची मशागत जागृतीने करण्यासाठी ‘विवेकाचा नांगर धरा’ या आवाहनाचा विचार आपण केव्हा करणार? या नांगरणीला आपण अजून किती उशीर लावणार?-अभय टिळक