शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

अटकेपार झेंडे

By admin | Updated: June 15, 2015 00:33 IST

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एक पाय सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर एकामागून एक गुन्हे दाखल होत आहेत. बांधकाम खात्यातील कोट्यवधी

यदु जोशी -

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एक पाय सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर एकामागून एक गुन्हे दाखल होत आहेत. बांधकाम खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अनेक जण अडकले आहेत. इतिहासात मराठी माणसांनी अटकेपार झेंडे लावले होते. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर घोटाळ्यांचा झेंडा फडकवला. उद्या कायद्याच्या लढाईत भुजबळ हरतील वा सुटतील; पण सत्ता अनिर्बंधपणे वापरली तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही अशा थाटात ती राबविणाऱ्या सर्वांनीच यानिमित्ताने धडा घ्यायला हरकत नाही. सध्याच्या काही मंत्र्यांनीदेखील ‘मागच्याला ठेच पुढचा शहाणा’ या म्हणीनुसार कारभारात पारदर्शकता आणायची गरज आहे. फुले-आंबेडकर-शाहूंच्या नावाने कारभार करणाऱ्यांच्या तीन हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा तपशील सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतोय. काय दिवस आहेत पहा, वेशांतर करून अमरावती जिल्ह्यात फिरणारे शिवसैनिक भुजबळ, अशाच पद्धतीने बेळगावला धडक देणारे रॉबिनहूड, शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांची प्रचंड दहशत असतानाच्या काळात शिवसेना सोडण्याची हिंमत दाखविणारे भुजबळ, शिवसेनाप्रमुखांना अटक करून दाखविण्याची हिंमत करणारे भुजबळ आणि आताचे भुजबळ! आज ही परिस्थिती आहे की त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्यांना साथ द्यायला तयार नाही. मोठे साहेब क्रिकेटच्या राजकारणात गुंतले असून, आपल्या पक्षासाठी अनेकदा दमदार खेळी केलेल्या भुजबळांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. खराब फॉर्म असलेला खेळाडू बेदखल होतो हा क्रिकेटमधील नियम पवारांनी भुजबळांसाठी लावला असावा कदाचित! सत्तेतून पैसा आणि पैशांतून पुन्हा सत्ता हे राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांचे तंत्र होते. त्यापैकी किती जणांना हात लावण्याची हिंमत फडणवीस सरकार दाखविणार आहे? की केवळ भुजबळांवरच प्रकरण संपेल? अशी शंका सामान्यांच्या मनात आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अद्याप एकालाही अटक झालेली नाही हे कशाचे लक्षण मानायचे? भुजबळांसोबत घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चक्रावून टाकणारे घबाड सापडले. इतरही अनेक अधिकारी आहेत ज्यांच्याकडे छापे टाकले तर कोट्यवधींची अपसंपदा सापडेल. मराठे, देशपांडे, शहा यांचा खात्यात काय दरारा होता; पण खात्याला भ्रष्टाचाराच्या मार्गावर नेणाऱ्यांसोबत त्यांनी सामील का व्हावे? अनिलकुमार गायकवाड यांचा दरबार तर मंत्र्यांना लाजवेल असा असतो. त्यांचाही पाय आता खोलात आहे. एखादा निर्णय चुकीचा, कंत्राटदारधार्जिणा, विशिष्ट व्यक्तींना लाभ पोहोचविणारा आहे आणि राज्याचे अहित करणारा आहे हे ठणकावून सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची उणीव असणे हा प्रशासनाच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. अधिकाऱ्यांच्या संघटनांनी याबाबत आत्मपरीक्षण केले पाहिजे. मंत्र्यांच्या दबावाला झुगारून चांगल्या गोष्टींची पाठराखण करण्याची हिंमत किती शासकीय अधिकारी दाखवतात? भष्ट बनू पाहणाऱ्या राजकीय व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्थेने लगाम घालणेच अपेक्षित आहे. राज्यकर्त्यांच्या हो ला नाही म्हणण्याची हिंमत दाखविली पाहिजे. सगळे ‘लष्कर-ए होयबा’ बनले तर अपेक्षा कोणाकडून करायची? सध्याच्या सरकारमध्ये मंत्री विरुद्ध सचिव असा संघर्ष घडतोय तो मंत्र्यांच्या मनमानी निर्णयाला चाप लावण्याच्या सचिवांच्या हिंमतीमुळेच. ही हिंमत वाढणे राज्याच्या हिताचे आहे. या हिमतीची किंमत त्यांना एखादवेळी मोजावी लागेल. पण राज्यहिताच्या दृष्टीने त्याचीही तयारी ठेवली पाहिजे. तुलनेने नवख्या असलेल्या सध्याच्या राज्यकर्त्यांकडे बघता प्रशासनाची या बाबतची जबाबदारी वाढली आहे. कठोर निर्णय घेणारे अधिकारी मंत्र्यांना खटकतील पण सामान्यांना आवडतात याचे अनेक दाखले आहेत. चुकीच्या वा अनाठायी वित्तीय निर्णयांना विरोध करणारे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष न करता संयमाने काही गोष्टी ठामपणे पटवून देता येतात याचे ते उत्तम उदाहरण आहेत.