शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

वॉटर कपच्या निमित्तान

By admin | Updated: June 12, 2016 05:02 IST

सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा

- सत्यजीत भटकळेसत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा वरुणराजा आपल्याला पावसाच्या रूपात किती पाणी देतो हे आधी पाहणे गरजेचे आहे. २०१५-१६ च्या भयानक दुष्काळातही मराठवाड्यात ४०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. १००० हेक्टर एवढे क्षेत्रफळ असलेल्या गावात जर ४०० मिलीमीटर पाऊस पडला तर त्या गावाला पावसाचे केवढे पाणी मिळाले असेल?पावसाचे पाणी (घ.मी.) = गावाचे क्षेत्रफळ (१ हेक्टर = १०,००० चौरस मी.) ७ सरासरी पाऊस (मी.) = ४ कोटी घनमीटर पाणी.जरा विचार करा, दुष्काळी वर्षातही दुष्काळी क्षेत्रातील या गावात ४ कोटी घनमीटर म्हणजेच ४०० कोटी लीटर म्हणजेच ४ लाख टँकर एवढे पाणी पावसाच्या रूपात पडले! मग या पाण्याचे नेमके काय झाले? पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते पाणी ४ मुख्य ठिकाणी पोहोचते. १. ते बाष्पीभवनामार्फत हवेत उडून जाते. २. मातीत ओलावा पोहोचवते.३. अपधावाच्या (फ४ल्ल ङ्माा) रूपात ते नदी-नाल्यांतून वाहून जाते.४. भूगर्भात मुरून तेथील पाण्याला रिचार्ज करते.पाणलोट विकासाच्या कामांनी आपण मुख्यत: पाण्याचा अपधाव कमी करून जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे हे पाणी बाष्पीभवनापासूनही वाचते आणि पाऊस संपल्यानंतर ते विहिरींमार्फत कामात येते.अपधावाने वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण जर संपूर्ण महाराष्ट्रात ४० टक्के एवढे ग्राह्य धरले तर उदाहरणादाखल घेतलेल्या वरील गावात १.६ लाख टँकर एवढे पाणी गावातून वाहून गेले, हे आपल्याला लक्षात येईल. या अपधावाचा जरी अर्धा भाग आपण गावातच अडवून भूगर्भात जिरवला तर त्या गावाला ८ लाख घनमीटर म्हणजेच ८०,००० टँकर पाणी उपलब्ध होईल. थोडक्यात दुष्काळी वर्षातही वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. आपल्यासमोर आव्हान आहे, पाणी जास्तीत जास्त भाग भूगर्भात पोहोचवण्याचे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा नेमकी याच कामाला उत्तेजन देते. जे गाव सर्वात जास्त पाणीसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल त्या गावाला सर्वात जास्त मार्क देण्यात येतील. स्पर्धेच्या काळात स्पर्धक गावांनी सीसीटी, मातीचे बंधारे, दगडी बंधारे असे अनेक लहान लहान उपचार तयार केले आहेत. ज्यामार्फत पाण्याचा अपधाव कमी होईल व जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरेल. या उपचारांची किमया ही पहिल्या पावसातच दिसू लागली आहे. अनेक दुष्काळग्रस्त गावांतील विहिरींच्या पातळीत पहिल्या पावसातच चमत्कारिक वाढ झाली आहे. ही गावे पाण्याच्या बाबतीत कायमची स्वावलंबी होतील हे निश्चित!यात सर्वात कौतुकास्पद बाब ही की हे काम ग्रामस्थांनी एक होऊन स्वत:च्या ताकदीने केले आहे. रणरणत्या उन्हात श्रमदान करून ही कामे केली आहेत. या मेहनतीला जोड होती ती प्रशिक्षणाची. ते प्रशिक्षण नेमके काय होते आणि त्यामुळे किती फरक पडला ते पुढील लेखात पाहू. तूर्त लक्षात ठेवूया की वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. त्या पाण्याचा आदर केल्यास आपण कायमचे दुष्काळमुक्त होऊ शकू.(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)