शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कपच्या निमित्तान

By admin | Updated: June 12, 2016 05:02 IST

सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा

- सत्यजीत भटकळेसत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा वरुणराजा आपल्याला पावसाच्या रूपात किती पाणी देतो हे आधी पाहणे गरजेचे आहे. २०१५-१६ च्या भयानक दुष्काळातही मराठवाड्यात ४०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. १००० हेक्टर एवढे क्षेत्रफळ असलेल्या गावात जर ४०० मिलीमीटर पाऊस पडला तर त्या गावाला पावसाचे केवढे पाणी मिळाले असेल?पावसाचे पाणी (घ.मी.) = गावाचे क्षेत्रफळ (१ हेक्टर = १०,००० चौरस मी.) ७ सरासरी पाऊस (मी.) = ४ कोटी घनमीटर पाणी.जरा विचार करा, दुष्काळी वर्षातही दुष्काळी क्षेत्रातील या गावात ४ कोटी घनमीटर म्हणजेच ४०० कोटी लीटर म्हणजेच ४ लाख टँकर एवढे पाणी पावसाच्या रूपात पडले! मग या पाण्याचे नेमके काय झाले? पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते पाणी ४ मुख्य ठिकाणी पोहोचते. १. ते बाष्पीभवनामार्फत हवेत उडून जाते. २. मातीत ओलावा पोहोचवते.३. अपधावाच्या (फ४ल्ल ङ्माा) रूपात ते नदी-नाल्यांतून वाहून जाते.४. भूगर्भात मुरून तेथील पाण्याला रिचार्ज करते.पाणलोट विकासाच्या कामांनी आपण मुख्यत: पाण्याचा अपधाव कमी करून जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे हे पाणी बाष्पीभवनापासूनही वाचते आणि पाऊस संपल्यानंतर ते विहिरींमार्फत कामात येते.अपधावाने वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण जर संपूर्ण महाराष्ट्रात ४० टक्के एवढे ग्राह्य धरले तर उदाहरणादाखल घेतलेल्या वरील गावात १.६ लाख टँकर एवढे पाणी गावातून वाहून गेले, हे आपल्याला लक्षात येईल. या अपधावाचा जरी अर्धा भाग आपण गावातच अडवून भूगर्भात जिरवला तर त्या गावाला ८ लाख घनमीटर म्हणजेच ८०,००० टँकर पाणी उपलब्ध होईल. थोडक्यात दुष्काळी वर्षातही वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. आपल्यासमोर आव्हान आहे, पाणी जास्तीत जास्त भाग भूगर्भात पोहोचवण्याचे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा नेमकी याच कामाला उत्तेजन देते. जे गाव सर्वात जास्त पाणीसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल त्या गावाला सर्वात जास्त मार्क देण्यात येतील. स्पर्धेच्या काळात स्पर्धक गावांनी सीसीटी, मातीचे बंधारे, दगडी बंधारे असे अनेक लहान लहान उपचार तयार केले आहेत. ज्यामार्फत पाण्याचा अपधाव कमी होईल व जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरेल. या उपचारांची किमया ही पहिल्या पावसातच दिसू लागली आहे. अनेक दुष्काळग्रस्त गावांतील विहिरींच्या पातळीत पहिल्या पावसातच चमत्कारिक वाढ झाली आहे. ही गावे पाण्याच्या बाबतीत कायमची स्वावलंबी होतील हे निश्चित!यात सर्वात कौतुकास्पद बाब ही की हे काम ग्रामस्थांनी एक होऊन स्वत:च्या ताकदीने केले आहे. रणरणत्या उन्हात श्रमदान करून ही कामे केली आहेत. या मेहनतीला जोड होती ती प्रशिक्षणाची. ते प्रशिक्षण नेमके काय होते आणि त्यामुळे किती फरक पडला ते पुढील लेखात पाहू. तूर्त लक्षात ठेवूया की वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. त्या पाण्याचा आदर केल्यास आपण कायमचे दुष्काळमुक्त होऊ शकू.(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)