शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

वॉटर कपच्या निमित्तान

By admin | Updated: June 12, 2016 05:02 IST

सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा

- सत्यजीत भटकळेसत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा वरुणराजा आपल्याला पावसाच्या रूपात किती पाणी देतो हे आधी पाहणे गरजेचे आहे. २०१५-१६ च्या भयानक दुष्काळातही मराठवाड्यात ४०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. १००० हेक्टर एवढे क्षेत्रफळ असलेल्या गावात जर ४०० मिलीमीटर पाऊस पडला तर त्या गावाला पावसाचे केवढे पाणी मिळाले असेल?पावसाचे पाणी (घ.मी.) = गावाचे क्षेत्रफळ (१ हेक्टर = १०,००० चौरस मी.) ७ सरासरी पाऊस (मी.) = ४ कोटी घनमीटर पाणी.जरा विचार करा, दुष्काळी वर्षातही दुष्काळी क्षेत्रातील या गावात ४ कोटी घनमीटर म्हणजेच ४०० कोटी लीटर म्हणजेच ४ लाख टँकर एवढे पाणी पावसाच्या रूपात पडले! मग या पाण्याचे नेमके काय झाले? पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते पाणी ४ मुख्य ठिकाणी पोहोचते. १. ते बाष्पीभवनामार्फत हवेत उडून जाते. २. मातीत ओलावा पोहोचवते.३. अपधावाच्या (फ४ल्ल ङ्माा) रूपात ते नदी-नाल्यांतून वाहून जाते.४. भूगर्भात मुरून तेथील पाण्याला रिचार्ज करते.पाणलोट विकासाच्या कामांनी आपण मुख्यत: पाण्याचा अपधाव कमी करून जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे हे पाणी बाष्पीभवनापासूनही वाचते आणि पाऊस संपल्यानंतर ते विहिरींमार्फत कामात येते.अपधावाने वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण जर संपूर्ण महाराष्ट्रात ४० टक्के एवढे ग्राह्य धरले तर उदाहरणादाखल घेतलेल्या वरील गावात १.६ लाख टँकर एवढे पाणी गावातून वाहून गेले, हे आपल्याला लक्षात येईल. या अपधावाचा जरी अर्धा भाग आपण गावातच अडवून भूगर्भात जिरवला तर त्या गावाला ८ लाख घनमीटर म्हणजेच ८०,००० टँकर पाणी उपलब्ध होईल. थोडक्यात दुष्काळी वर्षातही वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. आपल्यासमोर आव्हान आहे, पाणी जास्तीत जास्त भाग भूगर्भात पोहोचवण्याचे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा नेमकी याच कामाला उत्तेजन देते. जे गाव सर्वात जास्त पाणीसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल त्या गावाला सर्वात जास्त मार्क देण्यात येतील. स्पर्धेच्या काळात स्पर्धक गावांनी सीसीटी, मातीचे बंधारे, दगडी बंधारे असे अनेक लहान लहान उपचार तयार केले आहेत. ज्यामार्फत पाण्याचा अपधाव कमी होईल व जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरेल. या उपचारांची किमया ही पहिल्या पावसातच दिसू लागली आहे. अनेक दुष्काळग्रस्त गावांतील विहिरींच्या पातळीत पहिल्या पावसातच चमत्कारिक वाढ झाली आहे. ही गावे पाण्याच्या बाबतीत कायमची स्वावलंबी होतील हे निश्चित!यात सर्वात कौतुकास्पद बाब ही की हे काम ग्रामस्थांनी एक होऊन स्वत:च्या ताकदीने केले आहे. रणरणत्या उन्हात श्रमदान करून ही कामे केली आहेत. या मेहनतीला जोड होती ती प्रशिक्षणाची. ते प्रशिक्षण नेमके काय होते आणि त्यामुळे किती फरक पडला ते पुढील लेखात पाहू. तूर्त लक्षात ठेवूया की वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. त्या पाण्याचा आदर केल्यास आपण कायमचे दुष्काळमुक्त होऊ शकू.(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)