शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

...आता पैशाच्या जोडीला माणसंही खाऊ लागले!

By admin | Updated: July 8, 2015 23:11 IST

आपल्या देशातील राजकारणात काही विषय व मुद्दे असे आहेत की, त्यांचा नुसता उच्चार जरी झाला, तरी प्रतिक्रि या अगदी नकळत व प्रतिक्षिप्तपणं उमटते.

प्रकाश बाळआपल्या देशातील राजकारणात काही विषय व मुद्दे असे आहेत की, त्यांचा नुसता उच्चार जरी झाला, तरी प्रतिक्रि या अगदी नकळत व प्रतिक्षिप्तपणं उमटते. सध्या गाजत असलेल्या ‘व्यापमं’ घोटाळ्यात हेच नेमकं घडतं आहे.या घोटाळ्याची चौकशी ‘सीबीआय’कडून केली जावी, ही अशीच प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे. सदर केंद्रीय गुन्हे अन्वेषण संघटना म्हणजे सोनेरी पिंजऱ्यातील पोपट असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं होतं. तिचे प्रमुख असलेले रणजित सिन्हा, त्यांच्या कार्यकाळात ‘टू जी’ घोटाळ्यातील आरोपींना आपल्या घरी बोलावून त्यांच्याशी खलबतं करीत असत, असा आरोप आहे. त्याबद्दल आता सर्वोच्च न्यायालयानं या संघटनेच्या एका माजी संचालकाच्या नेतृत्वाखाली खास तपास पथक नेमण्याचा निर्णय अगदी कालपरवा घेतला आहे. अशा खास तपास पथकामुळं खरोखर गुन्ह्यांचा छडा लागतो, हाही एक भ्रम पद्धतशीररीत्या जोपासला गेला आहे. सत्तेत असलेल्या राजकारण्यांनी जर ठरवलं, तर सर्व पुरावे नष्ट वा नाहीसे करून कसे टाकले जातात, हे गुजरातेतील नरसंहाराच्या काळातील ऐहसान जाफरी यांच्या हत्त्येच्या प्रकरणात जसं दिसून आलं, तसंच ते अमित शहा याच्यावरील खोट्या चकमकीबाबतच्या आरोपांच्या संदर्भातही स्पष्ट झालं आहे. बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी असेच सुटले होते आणि हवाला प्रकरणात अडवाणी यांनाही अशीच ‘क्लीन चिट’ मिळाली होती. गुजरातेतील नरसंहार हा संघ परिवारानं केला आणि त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी होते, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. तरीही सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या विशेष तपास पथकाला मोदी यांच्या विरोधात काहीही पुरावा मिळाला नाही.‘९९ गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये’, या तत्वावर आपली न्यायव्यवस्था चालते. आरोपीला निर्विवादपणं दोषी ठरविण्याएवढा सबळ पुरावा न्यायालयासमोर यावा लागतो. तसा तो न्यायालयापुढं ठेवता आला नाही, तर सबळ पुराव्याअभावी आरोपी सुटतो. नोकरशाही व पोलीस यंत्रणा या दोन्हींवर ज्यांचं नियंत्रण असते, ते राजकारणीच जर आरोप सिद्ध होऊ नयेत, म्हणून प्रयत्नशील असतील, तर कोणत्याही थराला जाऊन ही मंडळी पुरावे नष्ट करू शकतात. प्रश्न उरतो, तो नोकरशाही व पोलीस यंत्रणेला असलेल्या कायदेशीर अधिकारांचा आणि ते का वापरले जात नाहीत हाच.गेल्या काही दशकात राजकारण्यांनी या दोन्ही यंत्रणा आपल्या वेठीला पूर्णपणं बांधून टाकल्या आहेत. राजकारण्यांच्या संमतीविना या यंत्रणा अजिबात हलत नाहीत आणि राजकारण्यांना फक्त आपल्या हिताचीच कामं करून घेण्यात रस असतो. त्यामुळं या दोन्ही यंत्रणा आता राजकारण्यांच्या बटीक बनल्या आहेत.‘सीबीआय’प्रमाणं असाच दुसरा जो एक मुद्दा नेहमी प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेस कारणीभूत ठरतो, तो म्हणजे दाऊदचा. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांपासून कायम ‘दाऊदला भारतात परत आणा’, अशी एक राजकारणातील ठरून गेलेली मागणी असते. अधून मधून ‘दाऊदला आमच्या हवाली करा’, अशी मागणी पाककडं करण्यासही सरकारला सांगितलं जात असतं. विशेषत: निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात गुन्हेगारीचा व माफिया टोळ्यांचा विषय निघाला की, अशी मागणी राजकारणी मंडळी हमखास करीत असतात. सरकारी यंत्रणाही अधून मधून काही पावलं टाकत असल्याचा देखावा उभा करते. असाच देखावा अंमलबाजावणी संचालनालय सध्या उभा करू पाहत आहे. या संचालनालयानं ब्रिटीश सरकारला एक कायदेशीर विनंतीपत्र (लेटर रोगेटरी) भारत सरकारमार्फत पाठवलं आहे. ब्रिटनमधील लंडन शहर आणि इसेक्स व केंट या दोन परगण्यातील बांधकाम व्यवसायात दाऊदची गुंतवणूक असल्याचा संशय आहे, म्हणून त्या संबंधीची माहिती कळवा, असं या विनंतीपत्रात म्हटलं आहे. ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा हा प्रकार आहे. दाऊद पाकला महत्वाचा वाटतो; कारण त्याचं भारतात साम्राज्य आहे. भारतातील बांधकाम व्यवसायातील बहुतेक सर्व मोठ्या बिल्डरांच्या कंपन्यांत दाऊदची गुंतवणूक आहे. भारतातील शेअर बाजार, वित्तीय कंपन्या इत्यादीत दाऊदचे शेकडो अब्ज रूपये लागलेले आहेत. बॉलीवूडमधून जर दाऊदनं पैसे काढून घेतले, तर हा उद्योग डबघाईला येईल. या उद्योगातील ‘खान’मंडळी दाऊदच्या संपर्कात असतात. ब्रिटनला कायदेशीर विनंतीपत्र पाठवण्याऐवजी हे साम्राज्य उद्ध्वस्त करायला काय हरकत आहे? या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर आहे की, दाऊदच्या या साऱ्या साम्राज्याचे खरे आधारस्तंभ हे देशातील राजकारणी आहेत. कोणत्या पक्षाला दाऊद कसे व किती पैसे देतो, याची जी माहिती खाजगीत बोलताना पोलिसांतील काही माजी वरिष्ठ अधिकारी देतात, त्यातील १० टक्के जरी खरी असली, तरी देश या राजकारण्यांनी कसा आतून पोखरून टाकला आहे, हे लक्षात येऊन भारताच्या भवितव्याबद्दल चिंता वाटण्याविना राहत नाही.आणखी एक असाच अलीकडच्या काळातील प्रतिक्षिप्त मुद्दा म्हणजे मोदी यांच्या मौनाचा. मोदी बोलत नाहीत, ही तक्र ार आहे. पण मोदी ज्यांना माहीत आहेत, त्यांना ते बोलणारच नाहीत, हे पक्कं ठाऊक आहे; कारण मोदी पुढचा विचार करणारे नेते आहेत. बिहारमध्ये आपला करिष्मा चालणार नाही, हे त्यांना दिसत आहे. तेव्हा पराभवाचं खापर पक्षातील विरोधकांच्या डोक्यावर फोडण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून मोदी ‘मौनेन्द्र’ बनले आहेत. अशी परिस्थिती असताना चौकशी ‘सीबीआय’कडं दिल्यावर व्यापम घोटाळ्याची उकल होईल, हा राजकीय भ्रम पद्धतशीररीत्या पसरवला जात आहे. तसा तो पसरवण्यात सगळ्या पक्षांनाच आपलं हित दिसतं आहे. हे लोकाना कळत नाही, असं नाही. त्यामुळंच ‘आतापर्यंत नुसते पैसेच खात होते, आता माणसंही खाऊ लागले आहेत’, अशी सर्वसामान्यांची उद्विग्न प्रतिक्रिया उमटत आहे.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत)