शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आता औषध कंपन्या

By admin | Updated: May 11, 2015 05:19 IST

कॅगची वक्रदृष्टी देशातील औषध कंपन्यांकडे वळल्यानंतर आता त्यांच्यातील आर्थिक गैरव्यवहारही उघडकीस आले असून, या गैरव्यवहारात संबंधित कंपन्यांनी डॉक्टर मंडळींना तर सामील करून घेतले.

सरकारी कारभारातील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार यांच्यावर बारीक लक्ष ठेवणारी आणि भल्याभल्यांना घाम फोडणारी ‘कॅग’ म्हणजे महालेखापाल ही संस्था आता देशातील सर्वसामान्यांनाही चांगलीच ज्ञात झाली आहे. संपुआच्या काळातील राष्ट्रकुल संघाच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातील भ्रष्टाचारापासून तो कोळसा खाणींच्या वाटपातील भ्रष्टाचारापर्यंत सरकारी पातळीवरील सारे गडबडगुंडे याच कॅगने हुडकून काढले आणि अनेकांसाठी कारागृहाचे दरवाजे उघडून दिले. याच कॅगची वक्रदृष्टी देशातील औषध कंपन्यांकडे वळल्यानंतर आता त्यांच्यातील आर्थिक गैरव्यवहारही उघडकीस आले असून, या गैरव्यवहारात संबंधित कंपन्यांनी डॉक्टर मंडळींना तर सामील करून घेतलेच, पण त्याशिवाय आयकर विभागानेही औषध कंपन्यांच्या आयकर विवरणपत्रांची काटेकोर छाननी व तपासणी केली नाही, असे ताशेरे कॅगने ओढले आहेत. वैद्यकीय व्यवसायातील लोक म्हणजेच डॉक्टरांवर व्यवसाय वृद्धीसाठी आणि कंपनीच्या अंतर्गत संशोधन कामासाठी केलेला अवाढव्य खर्च संबंधित कंपन्या ‘खर्च खाती’ दाखवून आयकरातून सूट पदरात पाडून घेतात, असे कॅगला जेव्हा आढळून आले तेव्हा तिने आयकर विभागाकडे यासंदर्भात चौकशी सुरू केली. देशातील सर्व औषध कंपन्यांची आयकराची विवरणपत्रे सादर करा, असा हुकूम कॅगने सोडला. पण आयकर विभाग पूर्ण तीन हजार विवरणपत्रेही सादर करू शकला नाही. त्यांचीच सखोल चिकित्सा केली असता, सुमारे अडीचशे विवरणपत्रांद्वारे तब्बल साडेतेराशे कोटी रुपयांच्या आयकराची लूट कॅगला आढळून आली. अधिक चौकशी करता, डॉक्टरांनी आपण उत्पादिलेली औषधेच रुग्णांना घ्यायला सांगावीत यासाठी सदर कंपन्या या डॉक्टरांना महागड्या भेटवस्तू देतात आणि त्या खर्चाची विवरणपत्राद्वारे वजावट मागतात, असे कॅगला आढळून आले. तथापि, डॉक्टरांनी अशा भेटी स्वीकारू नयेत असा दंडक मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने फार पूर्वीच लागू केला असून, डॉक्टरांवर केलेल्या अशा प्रकारच्या खर्चाची वजावट करता येणार नाही, असे स्पष्टीकरण सुमारे तीन वर्षांपूर्वीच प्रत्यक्ष कर मंडळाने संबंधितांकडे केले होते, हे येथे उल्लेखनीय. गुजरातेतील एका औषध कंपनीने डॉक्टरी व्यवसायातील दांपत्यांचा परदेश प्रवास आणि भेटवस्तू यावर तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवून आयकरातून अडीच कोटींची सूट पदरात पाडून घेतली, असे एक मासलेवाईक उदाहरणदेखील कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याशिवाय संशोधन वगैरे काहीही न करता, संशोधनावरील भरमसाठ खर्च दाखवून कंपन्यांनी सुमारे सहाशे कोटी रुपयांना आयकर विभागास ठकविल्याचेही हा अहवाल सांगतो. पण म्हणून आपल्या पावित्र्याचा सतत टेंभा मिरवित राहणाऱ्या वैद्यकीय व्यवसायावर कॅगच्या या अहवालाची काही मात्रा चालेल, असा विश्वास बाळगण्यात मात्र काही अर्थ नाही.

------------------------

ग्राहक चळवळीचे अध्वर्यूग्राहक हा राजा आहे, असे केवळ कागदावरच म्हणण्याची प्रथा होती़ प्रत्यक्षात त्याबाबत हिणविले जात असे़ या राजाला खरा मानसन्मान देण्यासाठी आपले आयुष्य व्यतीत करण्याचे कार्य बिंदूमाधव जोशी यांनी केले़ दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात जोशी यांचा सक्रिय सहभाग होता़ त्यानंतर त्यांनी ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या कामाकडे आपले सर्व लक्ष केंद्रित केले़ १९७२ मध्ये त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना केली़ ग्राहकाला त्याच्या हक्काविषयी तेव्हा अजिबात जाणीव नव्हती़ त्यांनी देशभर फिरुन त्याविषयी जनजागृती केली़ केंद्र सरकारला सातत्याने पत्र, निवेदने सादर करुन, त्याचा पाठपुरावा करून त्याविषयी कायदा करण्यासाठी प्रयत्न केले़ ग्राहक चळवळ उभारली़ त्याच्या देशभर शाखा स्थापन केल्या़ त्यांच्या या प्रयत्नांची शेवटी केंद्र शासनाने दखल घेऊन १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत केला़ त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण मंचची स्थापना करण्यात आली़ जोशी यांच्या या कार्याची दखल राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आली, तेव्हा घेण्यात आली़ १९९५ मध्ये स्वतंत्र मंत्रालय तयार करुन ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपद देण्यात येऊन तिला कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला़ स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट निर्मितीसाठी सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या सह निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले़ त्यांनीच स्थापन केलेल्या व ते संस्थापक असलेल्या ग्राहक पंचायतमधील कार्यकर्त्यांशी त्यांचे मतभेद झाले़ त्यातूनच जोशी यांनाच ग्राहक पंचायतचे बोधचिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली़ अशा विपरित परिस्थितीतही ते डगमगले नाहीत़ त्यांनी ग्राहक राजासाठी आपले संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न केले़ आज ग्राहक, ग्राहक चळवळ आणि ग्राहकांच्या म्हणण्याला जो प्रतिसाद, मान दिला जातो, त्यासाठी वातावरण, कायदा करण्याचा महत्त्वपूर्ण पाया बिंदूमाधव जोशी यांनी घातला आहे़ देशभरात ग्राहक चळवळ आहे, तोपर्यंत त्यांचे हे कार्य लक्षात ठेवले जाईल़