शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

‘निर्भया’ पथके व भ्रष्ट समाज

By admin | Updated: August 12, 2016 03:29 IST

कोल्हापूर पोलीस दलाने मुली आणि महिलांच्या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरासह प्रमुख तालुका शहरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांना पकडण्यासाठी दहा

कोल्हापूर पोलीस दलाने मुली आणि महिलांच्या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरासह प्रमुख तालुका शहरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांना पकडण्यासाठी दहा ‘निर्भया’ पथकांची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन करताना राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले भाषण डोळ्यात अंजन घालणारे आहे. ते म्हणाले, ‘कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिभेचे प्रतीक आणि मुख्य केंद्र आहे. त्या शहरातील महिला सुरक्षित नाहीत, म्हणून पोलीस दलाला खास ‘निर्भया’ पथके निर्माण करावी लागतात. ही खेदजनक गोष्ट आहे, भूषणावह नाही’.खूप कमी राजकारणी स्पष्ट बोलतात आणि त्यापेक्षा खूपच कमी अधिकारी आपल्याला मिळालेल्या प्रशासकीय यंत्रणेचा समाजाला वळण लावण्यासाठी वापर करतात. चंद्रकांतदादा पाटील यांचे परखड मत दखल घेण्याजोगे आहे. मात्र, त्याचवेळी पोलिसांना हे पाऊल उचलावे लागते, दंडुकेशाहीच्या मार्गाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी पाऊल उचलावे लागते, हे समाजाचे अपयश आहे. त्यासाठी समाज बदलण्याची जबाबदारी घेणाऱ्यांनी गंभीर होण्याची गरज आहे.आजच्या परिस्थितीत खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हाती घेतलेली ही मोहीम नवी दिशा देणारी आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे आणि त्यांना शुभेच्छाही द्यायला हव्यात.शहराच्या वर्दळीच्या भागात तसेच महाविद्यालये, विद्यामंदिरे आदि ठिकाणी मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर गुप्तपणेही ‘निर्भया’ पथके लक्ष ठेवणार आहेत. त्यांना संपूर्ण यंत्रणा दिली आहे. या पथकाच्या प्रमुख उत्तम प्रशिक्षित महिला कर्मचारी असणार आहेत. तरुण तसेच विवाहित पुरुषांना महिलांची छेडछाड करताना रंगेहात पकडले जाणार आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणले जाईल. आई-वडिलांना बोलावले जाईल. विवाहित पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला पाचारण केले जाईल आणि त्यांच्या कारनाम्याचा पाढा वाचला जाईल. सोबत गुप्तपणे चित्रीकरण केलेली फीत असेल. जेणेकरून आरोपीसह गुन्हा नाकारण्याची संधीच मिळणार नाही. तक्रार द्यायला कोणी महिला किंवा मुलगी समोर आली नाही तरी बेहत्तर, पोलीसच स्वत: या प्रकरणाची फिर्याद देणार आहेत.नांगरे-पाटील यांनी हैदराबादच्या धर्तीवर अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम कोल्हापुरात सुरू केला आहे. वास्तविक कोल्हापूर शहरात किंवा इचलकरंजी, कागल, गारगोटी, गडहिंग्लज आदि शहरांत दिवसाढवळ््या राजरोसपणे विद्यामंदिरात किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना हात घातला जात आहे. यावर आता अशा स्वरूपांच्या मोहिमांची खरंच गरज आहे. एक तर सामाजिक धाक संपत चालला आहे. जी मुले छेडछाड करतात ती कोठून स्थलांतरित होऊन आलेली नाहीत. याच शहरात ती राहातात, त्यांनाही आया-बहिणी आहेत. त्यांच्यावर धाक दाखविणारा सामाजिक दबावच राहिलेला नाही. पोलीस यंत्रणाही कुचकामी होती. या सर्वांना विश्वास नांगरे-पाटील यांनी छेद दिला आहे. या मोहिमेत किती जणांवर कारवाई होईल किंवा झाली याचा हिशेब नंतर करू, पण आपण कशीही मोगलाई करू, असे जे वातावरण संपूर्ण भ्रष्ट, नीतीनष्ट समाज बदलाने झाले आहे, त्याला आळा बसेल. नांगरे-पाटील यांच्यासारख्या नीतीमान अधिकाऱ्याकडे हे समाजाला ठणकावून सांगण्याचे बळ आज आहे. अशाच पद्धतीने पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणेने काम करायला हवे, ते कष्टाने उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व आज एक नैतिक धाक निर्माण करीत आहे. त्याला बळ द्यायला हवे.- वसंत भोसले