शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

‘निर्भया’ पथके व भ्रष्ट समाज

By admin | Updated: August 12, 2016 03:29 IST

कोल्हापूर पोलीस दलाने मुली आणि महिलांच्या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरासह प्रमुख तालुका शहरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांना पकडण्यासाठी दहा

कोल्हापूर पोलीस दलाने मुली आणि महिलांच्या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरासह प्रमुख तालुका शहरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांना पकडण्यासाठी दहा ‘निर्भया’ पथकांची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन करताना राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले भाषण डोळ्यात अंजन घालणारे आहे. ते म्हणाले, ‘कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिभेचे प्रतीक आणि मुख्य केंद्र आहे. त्या शहरातील महिला सुरक्षित नाहीत, म्हणून पोलीस दलाला खास ‘निर्भया’ पथके निर्माण करावी लागतात. ही खेदजनक गोष्ट आहे, भूषणावह नाही’.खूप कमी राजकारणी स्पष्ट बोलतात आणि त्यापेक्षा खूपच कमी अधिकारी आपल्याला मिळालेल्या प्रशासकीय यंत्रणेचा समाजाला वळण लावण्यासाठी वापर करतात. चंद्रकांतदादा पाटील यांचे परखड मत दखल घेण्याजोगे आहे. मात्र, त्याचवेळी पोलिसांना हे पाऊल उचलावे लागते, दंडुकेशाहीच्या मार्गाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी पाऊल उचलावे लागते, हे समाजाचे अपयश आहे. त्यासाठी समाज बदलण्याची जबाबदारी घेणाऱ्यांनी गंभीर होण्याची गरज आहे.आजच्या परिस्थितीत खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हाती घेतलेली ही मोहीम नवी दिशा देणारी आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे आणि त्यांना शुभेच्छाही द्यायला हव्यात.शहराच्या वर्दळीच्या भागात तसेच महाविद्यालये, विद्यामंदिरे आदि ठिकाणी मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर गुप्तपणेही ‘निर्भया’ पथके लक्ष ठेवणार आहेत. त्यांना संपूर्ण यंत्रणा दिली आहे. या पथकाच्या प्रमुख उत्तम प्रशिक्षित महिला कर्मचारी असणार आहेत. तरुण तसेच विवाहित पुरुषांना महिलांची छेडछाड करताना रंगेहात पकडले जाणार आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणले जाईल. आई-वडिलांना बोलावले जाईल. विवाहित पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला पाचारण केले जाईल आणि त्यांच्या कारनाम्याचा पाढा वाचला जाईल. सोबत गुप्तपणे चित्रीकरण केलेली फीत असेल. जेणेकरून आरोपीसह गुन्हा नाकारण्याची संधीच मिळणार नाही. तक्रार द्यायला कोणी महिला किंवा मुलगी समोर आली नाही तरी बेहत्तर, पोलीसच स्वत: या प्रकरणाची फिर्याद देणार आहेत.नांगरे-पाटील यांनी हैदराबादच्या धर्तीवर अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम कोल्हापुरात सुरू केला आहे. वास्तविक कोल्हापूर शहरात किंवा इचलकरंजी, कागल, गारगोटी, गडहिंग्लज आदि शहरांत दिवसाढवळ््या राजरोसपणे विद्यामंदिरात किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना हात घातला जात आहे. यावर आता अशा स्वरूपांच्या मोहिमांची खरंच गरज आहे. एक तर सामाजिक धाक संपत चालला आहे. जी मुले छेडछाड करतात ती कोठून स्थलांतरित होऊन आलेली नाहीत. याच शहरात ती राहातात, त्यांनाही आया-बहिणी आहेत. त्यांच्यावर धाक दाखविणारा सामाजिक दबावच राहिलेला नाही. पोलीस यंत्रणाही कुचकामी होती. या सर्वांना विश्वास नांगरे-पाटील यांनी छेद दिला आहे. या मोहिमेत किती जणांवर कारवाई होईल किंवा झाली याचा हिशेब नंतर करू, पण आपण कशीही मोगलाई करू, असे जे वातावरण संपूर्ण भ्रष्ट, नीतीनष्ट समाज बदलाने झाले आहे, त्याला आळा बसेल. नांगरे-पाटील यांच्यासारख्या नीतीमान अधिकाऱ्याकडे हे समाजाला ठणकावून सांगण्याचे बळ आज आहे. अशाच पद्धतीने पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणेने काम करायला हवे, ते कष्टाने उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व आज एक नैतिक धाक निर्माण करीत आहे. त्याला बळ द्यायला हवे.- वसंत भोसले