शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नवा वर्चस्ववाद

By admin | Updated: September 8, 2016 23:51 IST

देशातील न्यायव्यवस्था विरुद्ध संसद आणि सरकार यांच्यातील वर्चस्ववादाचा तिढा सुटण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसताना आता आणखी एका वर्चस्ववादाने आपले डोके वर काढले आहे

देशातील न्यायव्यवस्था विरुद्ध संसद आणि सरकार यांच्यातील वर्चस्ववादाचा तिढा सुटण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसताना आता आणखी एका वर्चस्ववादाने आपले डोके वर काढले आहे. हा वाद केन्द्र सरकार आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्यात निर्माण झाला असून त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय पंचाची भूमिका बजावत असले तरी त्याची भूमिका आयोगाच्या संबंधात काहीशी पक्षपाती असल्याचे सकृतदर्शनी तरी जाणवते आहे. जिथे जिथे मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे कोणालाही आढळून येते तिथे त्या व्यक्ती वा संस्थेने सदरच्या आयोगाकडे दाद मागावी आणि आयोगाने समग्र चौकशी करुन आपला अहवाल संबंधित केन्द्र अथवा राज्य सरकारला सादर करावा अशी संसदेनेच मंजूर केलेल्या कायद्याची अपेक्षा आहे. अलीकडच्या काळात अशा तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या तक्रारी प्राय: लष्कर वा सुरक्षा यंत्रणांच्या विरोधातल्या आहेत. काश्मीर आणि ईशान्येकडील ज्या काही राज्यांमध्ये लष्कराला विशेष अधिकार प्राप्त आहेत, तिथे लष्कराचे जवान बनावट चकमकी घडवून आणून नागरिकांची हत्त्या करीत असतात, अशा स्वरुपाच्या या तक्रारी आहेत. अशा अनेक तक्रारींची दखल घेऊन आणि त्रयस्थपणे चौकशी करुन आयोगाने संसदेला जो अहवाल सादर केला व ज्याद्वारे काही शिफारसी केल्या, त्यांची अंमलबजावणी अनिवार्य असावी असा आयोगाचा आग्रह आहे पण सरकारला तो मान्य नसल्याचे महाभिवक्ता मुकुल रोहटगी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणजे सरकारच्या मते मानवाधिकार आयोगाचे स्वरुप केवळ चौकशी करुन अहवाल सादर करण्यापुरते मर्यादित आहे. त्याच्या अहवालातील शिफारसी अंमलात आणण्याचा आग्रह आयोग धरु शकत नाही आणि केवळ तितकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयदेखील सरकारला तसे करण्यास बाध्य करु शकत नाही. आयोगाच्या अहवालावर संसद चर्चा करील आणि त्यानंतर सरकारला काही आदेश देईल वा सूचना करील कारण आयोगाच्या अहवालाचे काय करायचे याचा अधिकार केवळ संसदेलाच आहे, असेही रोहटगी यांनी सांगून टाकले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करताना असे म्हटले आहे की, ज्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त सरन्यायाधीश निवडला जातो, त्याच्या शिफारसींना काही महत्व निश्चितच असते. तरीही सरकार त्या स्वीकारीत नसेल त्यामागे तसेच काही गंभीर कारण असावे लागते. आमच्या मते या शिफारसी पूर्णपणे स्वीकारल्या जाऊन त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे अन्यथा आयोगाच्या अस्तित्वालाच काही अर्थ उरणार नाही. पण तरीही सरकार हे स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाही आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करता तिच्या मनातही या आयोगाविषयी फार आदराची वा आपुलकीची भावना आहे, असे नाही.